चंद्रकांत पाटलांनी ‘तो’ व्यवसाय सुरु करावा त्यातून ४०० काय ५०० जागाही मिळतील ; संजय राऊतांचा टोला

0
155
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप व महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच एक जोतिष्यवाणी केली. त्यांच्या या ज्योतिष्यवाणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील तुम्ही उद्या निवडणूक घेतल्यातर मोदी ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळतील असे म्हणता. पाटील यांनी जोतिष सांगण्याचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून ४०० काय ५०० जागाही जिंकू शकतात.” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यातील भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. राऊत यांनी सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा टाळत गुजरातचा दौरा करण्याचा निर्णय घेतल्याने यावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री येथील परिस्थिती हाताळण्यात सक्षम आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात सरकार अधिक कमजोर आहेत, अशी टीका केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याना टार्गेट करीत त्यांच्यावर टोलेबाजी केली.

शिवसेनेचे खासदार राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे. राऊत यांच्या टोल्यानंतर त्यांना पाटील आता नेमके काय उत्तर देणार? भाजपमधील प्रत्येक नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीका, आरोप केला जाऊ लागल्यामुळे आघाडीतील नेत्यांकडूनही टीकेला प्रतिउत्तर दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here