जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीये, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळांच खुलं चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असं खुलं चॅलेंज देखील छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केले. त्यामुळे आता त्यांच्या चॅलेंजला जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशातच आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवत ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज याच ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पुण्यातील इंदापूर तालुक्यात पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर सडकून टीका केली.

त्याचबरोबर, यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ असा इशारा जरांगे पाटलांना दिला. तसेच, “मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचं वातावरण पसवरलं जातं. दोन जातीत भांडणं लावली जात असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं जातं. मी फक्त 15 दिवसाने बोलतो. पण एक सौ सुनार की एक लोहार की. त्यामुळे थोडं बोलावं लागतं. सर्वच ऐकून घेण्याची सवय आम्हाला नाही. इथे कुणालाच नाही” असे देखील छगन भुजबळ म्हणाले.