दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दररोज किमान एक ते दीड हजार रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा देखील पुरती कोलमडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटी ) व जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटा फुल्ल झाल्या आहेत. परिणामी एकाच खाटावर तीन ते चार रुग्णांवर उपचार केले जात आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. वयाने कमी असलेले लोक देखील मृत्यूमुखी पडत आहे.

या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील ८५ टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत. यामुळे ८५ टक्के रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून देखील उपचार केले जाऊ शकतात. केवळ १५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. असेही पाण्डेय म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment