१७ पर्यंत ‘कोरोना गो’ नाही झाला तर लॉकडाऊन ३०मेपर्यंत वाढावा- रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोनाचा प्रसार वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. लॉकडाउनमुळेच आपण कोरोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.

दरम्यान, भारतात लॉकडाऊन योग्य वेळी लागू केल्यानं मोठी जीवितहानी टळली असल्याचंही आठवले म्हणाले.” कोरोनाने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात ३४ लाख लोक करोनाबाधित झाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार इतकी झाली आहे. महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असता,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केला. त्यानंतर १४ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउन केला. आता तिसऱ्यांदा १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment