मुंबईतील मृतांचा आकडा लपविण्यात आला; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का लपविण्यात आले आहेत एवढे मोठे दुर्लक्ष का झाले, आणि ज्यांनी असे केले आहे त्यांच्यावर आता सरकार काय कारवाई करणार असे प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. एका पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे विचारले आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिका प्रशासनाने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू करोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू करोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड दाखवली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू करोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने करोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला.

शासनाने हे प्रकरण लपविण्यासाठी एक पत्र पाठवून कोरोनासंदर्भातील सर्व आकडेवारी अपडेट करावी असे म्हंटले आहे. ही  माहिती तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले आहे. असले प्रकार करून झालेला प्रकार लपविला जातो आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आयसीएमआरच्या गाइडलाइन्स डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरविलेले करोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजेत. असे आयसीएमआर ने सांगितले आहे.

विविध रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याची ५०० प्रकरणे आहेत. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणाऱ्यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. करोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे ९५० वर मृत्यू हे मुंबईत करोनामुळे अधिकचे झालेले आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे फडणवीसांनी म्हंटले आहे.

Leave a Comment