ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं ; पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या  घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी ही टीका केली.

राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला”, अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर आणि राष्ट्रवादीवर टीका केली

एपीआय सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लागला. या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे खूपच खुलले होते, मात्र दिलीप वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद दिलं”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment