“नरेंद्र मोदी कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा कौतुकास्पद आणि आदर तीथ्यपूर्वक बोलले जाते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत बोलताना भाजप नेते तथा खासदार कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. “पाकव्याप्त काश्मीर हा भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही. नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

भाजप नेते कपिल पाटीलयांनी नुकत्याच एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची अशी इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण आशेवर आहोत, असेही पाटील यांनी म्हंटले.

Leave a Comment