उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मैदानात; राज्यपालांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी कुठलीही निर्णय घेतला नाही. जवळपास दीड महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीचा राज्यपाल निर्णय घेत नसल्यानं शेवटी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतली.

या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ या सर्व मंत्र्यांनी राज्यपाल यांना एकदा उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीच्या मागणीचे पत्र दिले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की, “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे”. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी यासंबंधी ट्विट करत म्हटलं होतं की, “सद्यस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीनं कार्यवाही करावी,या विनंतीचा पुनरुच्चार केला”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment