रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना त्यांचा दुर्देवी अपघात (Accident) झाला. या अपघातात तिघे जण ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली आहे.

अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे, राजेंद्र भाले अशी अपघातात (Accident) ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर संग्राम विक्रम तोरवे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय जत या ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोसारी येथे पहाटे साडे पाच वाजता तिघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोसारी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी कि, कोसारी येथील अजित भोसले व त्यांचे मित्र हे शनिवारी जतला गेले होते. त्यानंतर रात्री उशिरा गावाकडे परतत होते. दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात (Accident) घडला आहे. एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. तर बाकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील मोहित तोरवे, राजेंद्र भाले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर संग्राम विक्रम तोरवे याच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

Leave a Comment