राज्यातील शिंदे-फडणवीसांचे ईडी सरकार मोदी-शाहांचे हस्तक; पटोलेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “राज्यातील जे ईडीचे सरकार आहे. ते मोदी-शहा यांचे हस्तक आहेत. या सरकारला राज्याचं काही देणं घेणं नाही,” अशी टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोपही केले. ते म्हणाली की, महाराष्ट्रात जे काही शिंदे- फडणवीसांचं सरकार आहे. ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच आहे.

या शिंदे, फडणवीस सरकारमुळे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. या सरकारला राज्याचं काही देणं घेणं नाही. त्यामुळं राज्यपालांना सांगून या शिंदे-फडणवीस यांना गुजरातमध्ये पाठविणार असल्याचे पटोले यांनी म्हंटले.