मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले.

मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. “देशातील करोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेनं एकत्र यायला हवं आणि प्रत्येक प्रौढ (१८ वर्षांवरील) मुंबईकरांचं होईल तितक्या लवकर लसीकरण करायला हवं,” अशी सूचना मिलिंद देवरा यांनी केली आहे.

राज्यात रविवारी दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment