मुंबईत दोनशे कोटींचे फ्लॅट कुणाच्या नावे?; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना सवाल

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढणार आहोत. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी वरळीत दोनदोनशे कोटींचे प्लॅट कुणाच्या नावाने आहेत? याचे उत्तर द्यावे, असा सवाल मलिक यांनी अमृता फडणवीसांना विचारला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमृता फडणवीस यांच्याकडून नवाब मलिकांचा एकच उद्देश आहे की, यांना फक्त आपल्या जावयाला आणि काळ्या पैशाला वाचवायचे आहे. त्यामुळेचा हा सर्व आरोपांचा खेळ सुरु आहे. असे म्हंटले जात आहेत. त्यांना एकच सांगतो की, चोर मचाये शोर यांची काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढणार आहोत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1582392868804970

माझ्यावर काळ्या पैशाबाबत होत असलेल्या आरोपाबद्दल सांगायचे झाले तर माझ्या प्रत्येक संपत्तीची ईडी, सीबीआय कडून चौकशी केली जावी. मात्र, मी जो कागद देईन त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here