‘93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा…; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडून केली जात असताना राजीनामा न घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा दंगलीतील आरोपींना वाचवतोय,” अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट केले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “93 च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!!,” असे ट्विट राणे यांनी केले आहे.

राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि नंतर त्यांना झालेली अटक यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारवाईवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच आज भाजप नेत्यांकडून मलिक यांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही नवाब मलिक याच्या अटकेप्रकरणी धरण आंदोलन सुरु केले आहे.

Leave a Comment