मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी म्हणाले, “मग हवं तर मन कि बात पण सांगून टाका…”

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन कि बात’ च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या मोदींच्या ‘मन कि बात’वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींनाम्हंटल आहे कि, ‘बस हर देशवासी तक वैक्सीन पहुँचा दो, फिर चाहे मन की बात भी सुना दो !’ असं म्हंटल आहे.

‘मन कि बात’ मधून पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांनी कोरोनाची लस, घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या अआवाहनापुर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत त्यांना टोला लगावला आहे. “अगोदर देशातील नागरिकांपर्यंत कोरोना पोहचवा, मग हवं तर मन की बात पण सांगा!” असं राहुल गांधी यांनी म्हंटल आहे.

रविवारी लोकांशी साधलेल्या मन कि बात मधील कार्यक्रमात मोदी यांनी म्हंटल आहेत कि, ” कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अगोदर कोरोनाची लस घ्यावी. जेणेकरून कोरोनाला टाळता येईल. कोरोनाला लोकांनी घाबरू नये त्याच्याशी लढण्यासाठी लस घ्यावी, असे आवाहनही यावेळी मोदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here