Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2712

Airtel ने 1.17 लाख कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीचा प्लॅन बनवला, जाणून घ्या तुम्हाला काय फायदा होईल

Airtel

नवी दिल्ली । खासगी दूरसंचार कंपनी Airtel ने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना नवीन सुविधा देण्यासाठी मोठी गुंतवणूक योजना आखली आहे. Airtel च्या शेअरहोल्डर्सनीही Google च्या गुंतवणुकीला हिरवा कंदील दिला आहे. Airtel ने शनिवारी आपत्कालीन सर्वसाधारण बैठक (EGM) बोलावली, ज्यामध्ये शेअरधारकांनी Google च्या 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला हिरवा सिग्नल दिला.

कंपनीच्या 99 टक्के भागधारकांनी या गुंतवणूक योजनेला संमती दिली आहे. करारानुसार, Google ला Airtel मध्ये 1.28 टक्के हिस्सा मिळेल. Google ने कंपनीमध्ये 734 रुपये प्रति शेअर या दराने इक्विटी गुंतवणूक केली आहे.

संलग्न संस्था मजबूत करण्यावर भर
Bharti Airtel ने आपल्या सहयोगींना बळकट करण्यासाठी आपल्या भागधारकांसमोर एक गुंतवणूक योजना देखील ठेवली, जी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. कंपनीची दीर्घ मुदतीसाठी 1.17 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. याअंतर्गत Indus Towers, Nxtra आणि Bharti Hexacom या सहयोगी कंपन्यांमध्ये मोठे भांडवल गुंतवले जाणार आहे.

5G पूर्वी मोबाईल टॉवर मजबूत होतील
Airtel ने सुविधा सुरू होण्यापूर्वी देशातील 5G सर्व्हिसेसचा विस्तार आणि टॉवर मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. यामुळेच कंपनी पुढील काही वर्षात Indus Towers कंपनीत 88 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय Datacenter Nxtra मध्ये 15 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर Bharti Hexacom मध्ये सुद्धा 14 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

ग्राहकांना काय फायदा होईल ?
Airtel ने भागधारकांना सांगितले की, कंपनी डिजिटल इंडिया मोहिमेत सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आणि ग्राहकांना 5G सुविधा देण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे. त्यासाठी पुढील चार आर्थिक वर्षांत इंडस टॉवर्समध्ये 17 हजार कोटी आणि 2025-26 पर्यंत 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. गुंतवणुकीचा सर्वात मोठा फोकस 5G सर्व्हिसेसवर असेल. यामुळे ग्राहकांना 5G सर्व्हिस वापरणे सोपे होणार आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्याना ईडीचा दणका; 13 कोटींची संपत्ती जप्त

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास 10 तासांपेक्षा अधिक वेळ प्राजक्त तनपुरेंची चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने कारवाई करत प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

EPF आणि PPF मधील गुंतवणुकीवर मिळते टॅक्स सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

post office

नवी दिल्ली । नोकरदारांच्या पगाराचा काही भाग दरमहा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो. यासोबतच कंपनी त्या फंडात पैसेही जमा करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. ईपीएफ एक रिटायरमेंट बेनिफिट प्रोग्राम आहे.

जे काम करत नाहीत त्यांच्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तयार करण्यात आला आहे. दोन्हीमधील गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स नाही आणि दोन्हीमधील गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी फायदेशीर आहे. तर, एखाद्याने EPF आणि PPF दोन्हीमध्ये गुंतवणूक करावी का? केवळ नोकरदार लोकंच EPF मध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या, EPF वर 8.5 टक्के व्याज दर आहे, तर PPF वर 7.10 टक्के व्याजदर आहे.

गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स नाही
EPF आणि PPF या दोन्हीमधील गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. हे EEE(Exempt-Exempt-Exempt) कॅटेगिरी अंतर्गत येते. त्यात पैसे गुंतवून तुम्हाला टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो. व्याजाचे उत्पन्न देखील पूर्णपणे टॅक्स फ्री आहे, तर मॅच्युरिटी आणि पैसे काढण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. अशा परिस्थितीत, रिटायरमेंट आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दोन्ही उत्तम योजना आहेत.

गुंतवणूक 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास टॅक्स भरावा लागेल
अर्थसंकल्प 2021 मध्ये, सरकारने जाहीर केले होते की, EPF मध्ये 2.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज पूर्णपणे टॅक्स फ्रीअसेल. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागेल. EPF, VPF आणि PPF 2.5 लाखांच्या मर्यादेत समाविष्ट आहेत. EPF किंवा PPF मधील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत कपातीचा लाभ मिळतो, जो 1.5 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे.

सेल्फ इंप्लॉयड असाल तर PPF मध्ये गुंतवणूक करा
जर तुम्ही सेल्फ इंप्लॉयड असाल तर PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. त्याची कमाल मर्यादा फक्त 1.5 लाख रुपये आहे. कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ संपूर्ण गुंतवणुकीवर मिळू शकतो. सध्या PPF वर 7.1 टक्के रिटर्न दिला जात आहे, जो टॅक्सफ्री आहे. अशा प्रकारे नेट रिटर्न जास्त होतो.

रिटर्नच्या दृष्टीने उत्तम योजना
दोन्हीमधील गुंतवणूक मर्यादित असावी, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. रिटर्नच्या दृष्टीने दोन्ही अतिशय चांगल्या योजना आहेत. मात्र , ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक अल्पावधीत वापरता येत नाही. दीर्घ मुदतीसाठी दोन्हीमध्ये थोडी गुंतवणूक करून तुम्ही मोठा नफा कमवू शकता.

परीक्षा काळात वीज आणि बससेवा सुरळीत राहणार

st bus

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचता यावे, तसेच परीक्षा देताना परीक्षा हॉलमध्ये प्रकाश, पंखे सुरू असावेत, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत असावी. यासाठी बससेवा, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यातील केंद्र संचालकांनी महावितरण, एसटी महामंडळ आणि स्थानिक पोलिस स्थानक यांच्याशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना विभागीय मंडळ, शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षण विभाग, शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे. बारावीची लेखी परीक्षा चार; तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. परीक्षेच्या वेळेनुसार बसच्या नियोजनासाठी एस. टी. महामंडळ, परीक्षेवेळी वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरण व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी मुख्य केंद्र संचालकांनी पत्रव्यवहार करून परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाने केंद्र, उपकेंद्रांना दिल्या आहेत. तसेच परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी केंद्र, उपकेंद्रांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे अनुदान बंद करण्यात येणार असून विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून बजावण्यात आले आहे.

परीक्षेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षता समितीची बैठक होणार आहे. औरंगाबाद विभागातील बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून बारावीसाठी एक लाख 65 हजार 809 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यासाठी 408 केंद्र व 1360 उपकेंद्र; तर दहावीसाठी एक लाख 81 हजार 602 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यासाठी 623 केंद्र व 2614 उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला; रशिया-युक्रेन संकटामुळे महागाई वाढणार?

नवी दिल्ली । तेल कंपन्या 1 मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याबाबतचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किंमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत वाढते आणि कमी होते. एलपीजीच्या किंमतीबाबत विशेषत: पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात.

यावेळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणामही या बैठकीवर दिसून येईल. अशा स्थितीत भारतातील सर्वसामान्य जनतेलाही या युद्धाचा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीही वाढू शकतात, असे ऑइल आणि गॅस सेकरत मधील तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होणार आहे.

LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीवर काय परिणाम होईल?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींनुसार तेल आणि एलपीजीच्या किंमती वाढल्या आणि कमी केल्या जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे, याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. तसेच..

गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत नाहीये.

गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणार? रशिया- युक्रेन युद्धाचा फटका बसण्याची चिन्हे

Cashback Offers

नवी दिल्ली । तेल कंपन्या 1 मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याबाबतचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किंमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत वाढते आणि कमी होते. एलपीजीच्या किंमतीबाबत विशेषत: पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात.

यावेळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणामही या बैठकीवर दिसून येईल. अशा स्थितीत भारतातील सर्वसामान्य जनतेलाही या युद्धाचा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीही वाढू शकतात, असे ऑइल आणि गॅस सेकरत मधील तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होणार आहे.

LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीवर काय परिणाम होईल?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींनुसार तेल आणि एलपीजीच्या किंमती वाढल्या आणि कमी केल्या जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे, याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. तसेच..

गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत नाहीये.

शेतकरी आंदोलनाचा उडाला भडका, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा हा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या सात दिवसांपासून माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनस बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही या आंदोलनाची तीव्रता आता वाढत आहे.

याचं प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळेच रविवारी रात्री उशिरा सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबेदिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खक झाले. यावेळी आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. अग्निशमन विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आग विजवत होते. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित…

थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले.

याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे या थकीत कराबाबत ग्रामपंचायतीने वारंवार चर्चेसाठी आमंत्रित करूनही चर्चेस टाळाटाळ करत महावितरणने ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विद्युत कनेक्शन बंद केले. महावितरणच्या अशा कार्यपद्धतीमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी महावितरणचे सबस्टेशनच सील केले. त्यानंतर नाईलाजास्तव ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन पूर्ववत करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी तयार व्हावे लागले.

शुक्रवारी महावितरणने ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन बंद केले. त्यामुळे गावास होणारा पाणी पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या मुजोरीला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय ग्रामपंचायत पधाधिकाऱ्यानी घेतला. त्यानंतर सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, सतीश कदम, अक्षय कोरे यांनी मसूरचे महावितरणचे सबस्टेशन सील केले. अखेर एमएसईबीचे सहाय्यक अभियंता चेतन कुंभार यांनी सांगीतल्या नंतर ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले. व त्यानंतर ग्रामपंचायतीकडून सब स्टेशनचे सिल काढण्यात आले.

छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, राज्यपालांनी जाहीर माफी मागावी

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतानाच भाजपवरही सडकून टीका केली आहे . राज्यपालांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच छत्रपतींचा अपमान होत असताना भाजप नेते गप्प का आहेत असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले, समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते तरीही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करून समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांत जाणीवपूर्वक केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तींना राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, असेही ते म्हणाले.

भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करतो असा आरोप नाना पटोले यांनी केला. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला.

नवाब मलिक यांना एमआयएमचाही पाठिंबा

Nawab Malik

औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दहशतवाद यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक केली. आम्ही पूर्णपणे मलिक यांच्या पाठीशी आहोत. यांच्या समर्थनार्थ महा विकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत होते. त्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही क्रांती चौकात येऊन पाठिंबा दर्शवून शकतो, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवार यांनी या पेक्षा मोठे घोटाळे केले आहेत. त्यांना आज पर्यंत केंद्राच्या ईडिने का अटक केलेली नाही. शरद पवार यांना फक्त नोटीस बजावली होती. तेव्हा संपूर्ण नेते ईडी कार्यालयासमोर आले होते. आजम खान, छगन भुजबळ यांना अटक केली होती. तेव्हा कोणी विरोध दर्शवला नाही. भाजप ज्या पद्धतीने वागत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. मलिक यांनी जमीन कधी खरेदी केली आत्ताच त्यांना अटक करण्यामागे काय कारण आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकासआघाडी मधील तिने पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्र आले. हा निव्वळ देखावा आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे मलिक यांच्या मुलीला भेटणे हा राजकीय नाट्याचा भाग होता, असा आरोप जली यांनी केला. एमआयएम मलिक यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर कधी उतरणार, याची तारीख मात्र त्यांनी जाहीर केली नाही, हे विशेष.