Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 347

पुण्यात झिका व्हायरसची लागण वाढली; गर्भवती महिलांना जास्त धोका

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण राज्यामध्ये सध्या झिका व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि झिका वायरसच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाची चिंता देखील आता वाढली आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत झिका व्हायरसचे 140 रुपये सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 109 रुग्ण आहेत आणि या रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती महिलांना झिका वायरसची लागण झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केलेल्या आहेत.

राज्यातील जवळपास 2068 संशयित झिका रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. या रुग्णांपैकी 140 जणांचे झिकाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. ज्या परिसरात या झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. तेथील जवळपास तीन ते पाच किलोमीटर परिसरात सगळ्या लोकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून सुरू झालेले आहे. झिका व्हायरसची लागण एडीस इजिप्ती डास चावल्यामुळे होत असतो. यासाठी कीटकनाशके फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाय योजना देखील चालू आहेत. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत.

झिका वायरसची लक्षणे

भिका व्हायरसची लागण झाल्यावर सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थपणा वाटणे यांसारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे झीका व्हायरसच्या पाच पैकी एक रुग्णांमध्ये दिसतात. तर काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल चट्टे दिसतात. अशी लक्षणे दिसतात.

गर्भवती महिलांना अधिक धोका

झिका वायरसची लागण गर्भवती महिलांना झाली, तर गर्भातील बाळाला मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर झिका व्हायरस ची लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अन्यथा त्याची लागण लहान मुलांना देखील होऊ शकते.

झिका व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल, तर तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवा. तसेच घराच्या आत डास येऊ देऊ नका. घराच्या खिडक्यांना तसेच दरवाजांना जाळी लावा. जर दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ताप राहिला, तर लगेच डॉक्टरांची संपर्क साधून उपचार चालू करा.

डिसेंबर आणि जानेवारीच्या सुट्ट्यांमध्ये सुंदर ठिकाणांना भेट द्या, IRCTC ने आणले अप्रतिम पॅकेज

IRCTC india

IRCTC चे पहिले पॅकेज डिसेंबर महिन्यात आहे, हे राजस्थानचे पॅकेज आहे. हे पॅकेज 19 डिसेंबरला सुरू होते आणि 26 डिसेंबरपर्यंत आहे. या पॅकेजची बुकिंग 39,500 रुपयांपासून सुरू झाली आहे. यामध्ये तुम्हाला राजस्थानमधील महत्त्वाच्या ठिकाणी नेले जाईल. हा प्रवास रेल्वेने होणार आहे. तेथे कॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तीन तारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल.

गुजरात

IRCTC चे दुसरे पॅकेज गुजरातसाठी आहे, त्याचा प्रवास 21 डिसेंबरला सुरू होईल आणि परतीचा प्रवास 27 डिसेंबरला होईल. त्याची बुकिंग 49,200 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये गुजरातमधील सर्व प्रमुख ठिकाणी नेण्यात येणार असून हा प्रवास विमानाने होणार आहे.

कामाख्या

दर सोमवारी आयआरसीटीसी आयोजित तिसरा प्रवास म्हणजे आसाम म्हणजेच कामाख्याला भेट देणे. तुम्हाला नवीन वर्ष किंवा ख्रिसमसला कामाख्या देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही IRCTC चे 16000 रुपयांचे पॅकेज बुक करू शकता. हा प्रवास रेल्वेने असेल.

इतर पॅकेजेस

याशिवाय आयआरसीटीसीकडून चंदीगड, शिमला, काशी आणि अयोध्या अशी पॅकेजेस आहेत, ती तुम्ही आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटला भेट देऊन पाहू शकता. हे सर्व पॅकेज या वेबसाइटवरूनही बुक करता येईल.

वैष्णोदेवी

याशिवाय, जर तुम्हाला वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे असेल, तर दरवर्षी IRCTC कडून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पॅकेज सुरू केले जाते. तुम्हाला पुढील वर्षी तुमच्या कुटुंबासोबत या प्रवासाला जायचे असेल, तर तुम्ही हा प्रवास आता IRCTC वेबसाइटवरून बुक करू शकता.

इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती क्रेझ ! भारतीय बाजारात 8 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच

electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाड्याची मागणी वाढली आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे विविध नामांकित कंपन्या नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण 8 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्या आहेत. या लाँचमध्ये ओला इलेक्ट्रिक, होंडा, रिव्हर आणि कोमाकी या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. या गाडीच्या फीचर्समुळे ग्राहकवर्ग मोठ्याप्रमाणात आकर्षित होत आहे.

ओला Gig आणि Gig+ –

ओलाने दोन किफायतशीर मॉडेल्स लाँच केली आहेत. ओला या इलेक्ट्रिक गाडीला बाजारात मोठ्याप्रमाणात मागणी असून , यांनी दोन गाड्या लाँच केल्या आहेत. त्यामध्ये पहिली ओला Gig हि असुन , ग्राहकांना ती 39999 किंमतीत मिळणार आहे. या गाडीचे वैशिष्ट असे आहे कि ती सिंगल चार्जमध्ये 112 किमी रेंज जाऊ शकते. तसेच ओलानेच त्यांची Gig+ लाँच केली आहे. ती दोन बॅटरीसह 157 किमी पर्यंत रेंज जाते . या गाडीची किंमत 49999 रुपये आहे.

ओला S1 Z आणि S1 Z+ –

ओला कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सीरीजमध्ये दोन आकर्षक मॉडेल्स ओला S1 Z आणि S1 Z+ लाँच केली आहेत. ओला S1 Z ची किंमत 59999 रुपये आहे आणि ती 146 किमी रेंजसह ड्युअल बॅटरी सिस्टमसह येते, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट पर्याय ठरते. दुसरीकडे ओला S1 Z+ ची किंमत 64999 आहे आणि ती 70 किमी/तासच्या टॉप स्पीडसह आणि 146 किमी रेंजसह येते, ज्यामुळे ती अधिक वेगवान आणि शक्तिशाली अनुभव प्रदान करते.

होंडा ॲक्टिवा E आणि QC1 –

होंडा कंपनीनेही दोन नवीन मॉडेल्स लाँच केली आहेत, होंडा ॲक्टिवा E आणि QC1. ही नवी लाँच केलेली स्कूटर्स आधुनिक डिझाईन आणि कार्यक्षमता यांचा उत्तम संगम म्हणून मानली जातात, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध होतात. ॲक्टिवा E मध्ये 102 किमी ची रेंज आहे, जे विविध राइडिंग मोड्स आणि टॉप स्पीड 80 किमी/तास यासह अतिशय आरामदायक आणि कार्यक्षम अनुभव देतो. या मॉडेलमध्ये तीन राइडिंग मोड्स उपलब्ध आहेत, जे वापरकर्त्याला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये चांगला अनुभव देतात. QC1 हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यात 80 किमी रेंज आहे. यामध्ये टीएफटी स्क्रीन आणि जलद चार्जिंगची सुविधा देखील समाविष्ट आहे.

कोमाकी MG Pro Lithium सीरिज –

कोमाकीने 59999 रुपयांपासून सुरुवात करणारी MG Pro लिथियम सिरीज लाँच केली आहे. सिंगल चार्जमध्ये 150 किमी रेंज मिळणारी ही स्कूटर पार्किंग असिस्ट आणि क्रूझ कंट्रोलसह येते.

रिव्हर इंडी –

बेंगळुरू आधारित रिव्हर कंपनीने 1.43 लाख रुपयांच्या किंमतीत इंडी मॉडेल सादर केले आहे. यात चेन ड्राइव्ह सिस्टम, रिव्हर्स स्विच, आणि सुधारित गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी –

सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांकडे स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे . या स्कूटर्सच्या विविध किंमती व आकर्षक फीचर्समुळे सामान्य लोकही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे बाजारात वाहनांची मागणी वाढलेली आहे.

मुंबई लोकलला जोडणार रायगड, शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरवर अपडेट

panvel karjat railway

मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपाने भेट मिळणार आहे. मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर, जो मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा (MUTP-III) भाग आहे, वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. सुमारे ₹ 2,782 कोटी खर्चून बांधल्या जात असलेल्या या प्रकल्पाचे 67% काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण झाले आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) तयार करत आहे. नवीन कॉरिडॉर पनवेल आणि कर्जत दरम्यान चांगली आणि जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

भूसंपादन पूर्ण

प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 56.82 हेक्टर खाजगी जमीन आणि 4.4 हेक्टर सरकारी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
वनजमिनीसाठी आवश्यक परवानगी (टप्पा-I मंजुरी) प्राप्त झाली आहे आणि उर्वरित प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे.

अभियांत्रिकीचे काम चालू

  • जमिनीचे काम : 20 लाख घनमीटर मातीचा भराव करण्यात आला आहे.
  • बोगदे: तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून अस्तरीकरणाचे काम सुरू आहे.
  • पूल: 47 पुलांपैकी 35 (29 लहान आणि 6 मोठे) पूर्ण झाले आहेत.
  • रोड ओव्हर ब्रिज (ROBs): 4 ROB बांधण्यात आले आहेत आणि मोहोपे आणि किरवली सारख्या महत्वाच्या ठिकाणी काम वेगाने चालू आहे.
  • पुणे एक्सप्रेस वे अंडरपास: त्याचे काम पूर्ण झाले आहे.

स्टेशन बांधकाम

  • पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
  • प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज (FOB) आणि प्रशासकीय इमारती यांसारख्या सुविधांचे कामही प्रगतीपथावर आहे.

पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे फायदे

या कॉरिडॉरमध्ये एकूण ५ स्थानके असतील. नवी मुंबईतील रायगड जिल्ह्याचे क्षेत्र कर्जतला जोडणे आणि एमएमआरचा विस्तार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या नवीन कॉरिडॉरसह मुंबई लोकलला शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल. मालवाहू गाड्यांव्यतिरिक्त, काही लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या सध्याच्या पनवेल, खालापूर आणि कर्जत या कॉरिडॉरवर धावतात. नवीन कॉरिडॉरमध्ये पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. डिसेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, तर नवीन मुदत डिसेंबर 2025 ही ठेवण्यात आली आहे.

हिवाळ्यात ‘या’ व्यवसायाला भारी मागणी ! मिळावा लाखो रुपये

woolen business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना हंगामानुसार व्यवसाय करून लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न असते, त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. आता हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला असून, या हंगामात उबदार कपड्यांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत असते. जॅकेट्स, स्वेटर्स, शाली, हिवाळी इनरवेअर यासारख्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्ग बाजरात प्रचंड गर्दी करताना दिसतात. त्यामुळे हा काळ लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी मोठी संधी ठरू शकते. तुम्ही योग्य नियोजन आखून तसेच त्याच्या जोडीला मार्केटिंगची मदत घेऊन हिवाळी कपड्यांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई करू शकता. तर चला पाहुयात व्यवसाय सुरु करण्याच्या काही टिप्स .

व्यवसाय उंचीवर घेऊन जाण्यासाठी टिप्स

काही महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय उंचीवर घेऊन जाऊ शकता. त्यासाठी तुम्ही बाजाराचा सखोल अभ्यास करणे महत्वाचे असते . म्हणजे आपल्या भागातील हवामान, तापमान आणि ग्राहकांची गरज समजून योग्य उत्पादनांची निवड करावी . कमी तापमानात उबदार कपडे विक्रीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा कपड्यांचे उत्पादन करावे. तुम्ही उत्पादित केलेल्या कपड्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे , म्हणजे ग्राहकवर्ग त्याकडे जास्त आकर्षित होईल. जास्त नफा कमवण्यासाठी तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यापक ग्राहकांपर्यंत पोहचता येते.

Buy 1 Get 1 ऑफर्सचा वापर

हंगामी ऑफर्स जसे की सवलत योजना किंवा Buy 1 Get 1 अशा ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात आणि विक्री वाढवतात. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया जाहिरातिचा वापर करून जास्त फायदा कमाऊ शकता. थेट संपर्क राखण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, प्रदर्शन आणि मेळाव्यांमध्ये स्टॉल्स लावणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे ग्राहकांसोबत विश्वास आणि चांगला संबंध निर्माण होतो.

कमी गुतंवणूकीतून जास्त नफा

जर तुम्हाला छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा असेल, तर 2 ते 3 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. मात्र मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर 5 ते 7 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा हंगामी व्यवसाय सुरु केल्यामुळे तुम्ही व्यवसायात सरासरी 30 % ते 40 टक्के नफा मिळवू शकता . हिवाळ्याच्या या हंगामी व्यवसायातून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर नफा कमावण्याची उत्तम संधी आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनासोबत व्यवसाय सुरू करा आणि थंडीत लाखो रुपये कमवा.

‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन येण्याला का होतोय विलंब ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

vande bharat sleeper

स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसला भारतात मोठी पसंती मिळत आहे. सध्या वंदे भारत च्या कार चेअर कोच अससेल्या गाड्या धावत आहेत. मात्र आता प्रवाशांना वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? वंदे भारत स्लीपर ट्रेनची किती वेळ वाट पाहावी लागेल? अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की स्लीपर ट्रेनच्या निर्मिती प्रक्रियेला डिझाईनशी संबंधित मंजुरीमुळे विलंब होत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्यासाठी निवडलेल्या रशियन कंपनीसाठी डिझाइन हा कधीच मुद्दा नव्हता.

1920 स्लीपर कोच बांधले जातील

काही काळापूर्वी रशियन कंपनी TMH च्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडियामध्ये बातमी आली होती. भारतीय रेल्वेने स्लीपर ट्रेनमध्ये टॉयलेट्स आणि पॅन्ट्री कारची मागणी केल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळे रेल्वेच्या रचनेत बदल करणे गरजेचे झाले आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मीडियाच्या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. रशियन कंपनीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे 1920 स्लीपर कोच बनवायचे आहेत.

21 नोव्हेंबरपर्यंत 136 वंदे भारत गाड्या चालवण्यात आल्या

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की 21 नोव्हेंबरपर्यंत 136 वंदे भारत ट्रेन उत्तम सेवा आणि सुरक्षिततेसह सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये हाय स्पीड, सीलबंद गँगवे, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम शील्ड, आरामदायी राइड, ऑटोमॅटिक प्लग डोअर, हॉट केस, मिनी पॅन्ट्री, डीप फ्रीझर, बॉटल कुलर आणि हॉट वॉटर बॉयलर इत्यादींचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील स्थानकांवर 22 वंदे भारत सेवा चालवल्या जात आहेत.

सरकार करणार EPFO ​​3.0 ची घोषणा ! ATM मधून काढता येणार PF ची रक्कम ? जाणून घ्या

EPFO 3.O

केंद्र सरकार संघटित क्षेत्रातील 6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. EPFO सदस्यांसाठी अनेक नवीन फायदे जाहीर केले जाऊ शकतात. सरकार EPFO ​​3.0 ची घोषणा करू शकते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये मूळ वेतनाच्या 12 टक्के योगदान देण्याची मर्यादा हटवली जाऊ शकते. कर्मचारी त्यांच्या बचत क्षमतेनुसार भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांना हवे तेवढे योगदान देऊ शकतील. याशिवाय खातेदारांना भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले पैसे एटीएममधून काढण्याची सुविधाही दिली जाऊ शकते.

ईपीएफमध्ये अधिक योगदान देण्याचे स्वातंत्र्य

श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार EPFO ​​3.0 आणण्यासाठी गंभीरपणे तयारी करत आहे. ज्यामध्ये EPF सदस्यांसाठी अनेक नवीन घोषणा केल्या जाऊ शकतात. यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या योगदानाची मर्यादा वाढवणे. सध्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये द्यावी लागते. मात्र सरकार ही मर्यादा रद्द करू शकते. कर्मचारी त्यांच्या बचत क्षमतेनुसार त्यांच्या इच्छेनुसार आणि कधीही ईपीएफ खात्यात रक्कम जमा करू शकतात. त्याचा उद्देश ग्राहकांना शक्य तितकी बचत करण्याचा पर्याय प्रदान करणे हा आहे. ही रक्कम सेवानिवृत्तीनंतर ग्राहकांना उच्च निवृत्ती वेतन देण्याच्या पर्यायात रूपांतरित केली जाऊ शकते. तथापि, नियोक्त्यांच्या योगदानामध्ये कोणताही बदल होणार नाही. कामगार मंत्रालय या सूत्रावर चर्चा करत आहे.

ATM मधून तुम्ही काढू शकता PF

EPFO ग्राहकांसाठी सरकार आणखी एक मोठी घोषणा करू शकते. ईपीएफ सदस्यांना डेबिट कार्डसारखे एटीएम कार्ड दिले जाऊ शकते जेणेकरून ते एटीएममधून भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले पैसे काढू शकतील. म्हणजेच सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे भविष्य निर्वाह निधीत जमा केलेले पैसे एटीएममधून काढण्याची सुविधा देण्याची तयारी करत आहे. यामध्ये ग्राहकांना भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार नवीन वर्ष 2025 मध्ये EPFO ​​चे हे नवीन धोरण जाहीर करू शकते आणि EPFO ​​3.0 मे-जून 2025 मध्ये लागू केले जाऊ शकते.

ईपीएफओची आयटी प्रणालीमध्ये सुधारणा

कामगार मंत्रालय EPFO ​​च्या IT प्रणालीमध्ये मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत आहे जेणेकरून कर्मचारी कोणताही व्यवहार सहज करू शकतील. ही सुधारणा दोन टप्प्यात करण्याची तयारी सुरू आहे. EPFO 2.0 अंतर्गत प्रणालीतील सुधारणा पुढील महिन्यात डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होतील, ज्यामुळे प्रणालीतील 50 टक्के समस्यांचे निराकरण केले जाईल. EPFO 3.0 मे-जून 2025 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामध्ये IT प्रणालींमधील सुधारणांचाही समावेश असेल. वास्तविक, ईपीएफओचे कामकाज आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

गोंदियात बसचा भीषण अपघात; 8 लोक जागीच ठार

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोंदिया तालुक्यातून एक मोठी गंभीर घटना समोर येत आहे. ती म्हणजे गोंदियातील अर्जुनी तालुक्यातील खजुरी गावाजवळ एक मोठा अपघात झालेला आहे. शिवशाही बसला हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातात आतापर्यंत 8 जण मृत्यू झाल्याची माहिती हातात आलेली आहे. तसेच या बसमधील 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.

अपघातात झालेल्या या बसमधील प्रवाशांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेले आहे. तसेच अपघाताच्या स्थळी पोलीस आणि प्रशासन देखील पोहोचलेले आहेत. आणि तेथील बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ही शिवशाही बस नागपूरच्या दिशेने गोंदियात जात होती. त्यावेळी बस रस्त्यावर पलटी झालेली आहे. खजुरी या गावाजवळ हा अपघात झालेला आहे. अत्यंत दुर्गम भागात हा अपघात झाल्याने त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकारी पोहचण्यास जरा उशीर झालेला आहे. तसेच या अपघातात आता पर्यंत 10 ते 15 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे.

आतापर्यंत अपघातात झालेल्या या शिवशाही बस मधून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. आणि मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. गोंदिया बस अपघातात झालेल्या मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत मिळावी. असे आदत आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिलेले आहेत.

ITBP Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ITBP अंतर्गत मोठी भरती जाहीर

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेला आहोत. ती म्हणजे आता इंडॉटिव्हेट सीमा पोलीस दल एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती एसआय दूर संचार, हेड कॉन्स्टेबल दूरसंचार आणि कॉन्स्टेबल संचार या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 526 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 14 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ITBP Bharti 2024

एसआय दूर संचार, हेड कॉन्स्टेबल दूरसंचार आणि कॉन्स्टेबल संचार

पदसंख्या

या भरती अंतर्गत 526 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीच्या अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

15 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | ITBP Bharti 2024

14 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • 15 नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  • 14 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpur Police Bharti 2024 | नागपूर शहर पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Nagpur Police Bharti 2024

Nagpur Police Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे नागपूर शहर पोलीस विभाग अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 8 रिक्त जागा आहेत आणि त्या करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. तसेच 9 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेला अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Nagpur Police Bharti 2024

या भरती अंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 62 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Nagpur Police Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस भवन वेस्ट हायकोर्ट रोड सिविल लाइन्स नागपूर या ठिकाणी अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • 9 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा