Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5688

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची राजकारणात पुन्हा एंट्री! लढवणार राज्यसभा निवडणूक

बेंगळुरू । माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीयरित्या दिसणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहाखातर ते आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाय, त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचेही दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधी यांनी त्यांना सक्रीय राजकारणात पुन्हा पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

उद्या मंगळवारी एचडी देवेगौडा हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या ४ जागा आहेत. १९ जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ जून आहे. अंदाज वर्तवला जात आहे की, जेडीएसचे सद्याचे खासदार कुपेंद्र रेड्डी हे देवेगौडा यांच्यासाठी आपली जागा सोडू शकतात. तर दुसरीकडे कडे खुद्द सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या असल्याने, कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच देवेगौडा यांना पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, काँग्रेस कर्नाटकमधून आपल्या एका उमेदवाराला सहज राज्यसभेत पाठवू शकते. यासाठी अगोदर काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. खर्गे यांना पाठिंब्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांशिवाय अतिरिक्त १४ आमदारांची मत राहणार आहेत. या आमदारांच्या मतांचा वापर काँग्रेस देवेगौडा यांच्यासाठी करू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

१ ऑक्टोंबरपासून BS 6 वाहन‍ांवर हे ग्रीन स्टिकर लावणे अनिवार्य; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आता स्टेज-सिक्स (बीएस -6) उत्सर्जनचे मानक असलेल्या वाहनांना १ सेमी लांब ग्रीन स्टिकर (१ सेमी हिरवी पट्टी) लावावे लागेल. अशा वाहनांवर सरकारने ग्रीन स्टिकर लावणे आता अनिवार्य केले आहे. हा आदेश १ ऑक्टोबर २०२० पासून लागू होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, बीएस -6 उत्सर्जन मानकांचे पालन करणार्‍या वाहनांना तिसर्‍या रजिस्ट्रेशन प्लेटच्या वरच्या भागावर हिरव्या रंगाचा पट्टा लावावा लागेल. हा आदेश मोटार वाहन (हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) आदेश, २०१८ मध्ये दुरुस्तीद्वारे जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी सरकारने असे म्हटले होते की,१ एप्रिल, २०१९ पासून सर्व मोटार वाहनांवर हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसविल्या जातील, ज्यामध्ये कोणतीही छेडछाड होणार नाही. याअंतर्गत अशी वाहने स्वतंत्रपणे सहज ओळखता येतील, अशी व्यवस्था करावी. इतर देशांमध्येही असेच घडते. त्याला थर्ड नंबर प्लेट देखील म्हटले जाते, जे ऑटोमेकर प्रत्येक वाहनाच्या विंडशील्डमध्ये बसवतात.

टॅम्पर प्रूफ HSRP सक्तीचे मोटर वाहन आदेश (हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट), २०१९ मध्ये बदल करून हा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने असे म्हटले होते की १ एप्रिल २०१९ पासून सर्व मोटार वाहनांवर टॅम्पर प्रूफ, हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसविल्या जातील. HSRP किंवा थर्ड नंबर प्लेट प्रत्येक नवीन वाहनाच्या विंडशील्डच्या आतमध्ये त्यांच्या उत्पादकांद्वारे बसविल्या जातात.

HSRP सिस्टम
HSRP अंतर्गत, क्रोमियम-आधारित होलोग्राम दोन्ही बाजूंच्या नंबर प्लेटच्या डाव्या कोपर्यात ठेवला जातो. त्याशिवाय रजिस्ट्रेशन प्लेटवरील डाव्या बाजूला तळाशी असलेल्या प्रतिबिंबित पत्रकात किमान १० अंकासह परमनेंट आयडेंटिफिकेशन नंबरची लेसर ब्रँडिंग करणे देखील बंधनकारक केलेले आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या प्लेटमध्ये वाहनात वापरल्या जाणार्‍या इंधनानुसार कलर कोडिंग देखील असेल. कलर कोडिंग प्रदूषण कारणीभूत असलेल्या वाहनांची ओळख पटवेल. त्यांनी सांगितले की पेट्रोल किंवा सीएनजी वाहनांवर हलका निळा रंगाचा कोडिंग असेल तर डिझेल वाहनांवर हे कोडिंग भगव्या रंगाचे असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जावेद अख्तर ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय

मुंबई । प्रिसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना (Richard Dawkins Award) रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षतेवर तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारानं सन्मानित केलं गेल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मानवी बौद्धीक विकासाला प्रोत्साहन देणं, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी कार्य करणं आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.’माझे विचार इतक्या दुरवर पोहोत आहेत याचं मला आश्चर्य वाटतं. धर्मनिरपेक्ष आणि माझ्या विचारांशी जगातील अनेक जण सहमत आहेत ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रिया जावेद अक्खर यांनी पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर दिली.यापूर्वी अमेरिकीचे कॉमेडियन बिल माहेर आणि तत्त्ववेत्ते ख्रिस्तोफर हिचेन्स यांना या पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.

देशातील राजकीय, सामाजिक अनेक मुद्द्यांवर जावेद अख्तर त्यांचं मत रोखठोक मांडतात. हे मत मांडत असताना थेट मुद्द्यावर ते हात घाततात. विषायाला धरून ते त्यांचं मत मांडत असतात. सध्या देशात सुरू असलेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांचं मत अत्यंत परखड पणे व्यक्त केलं. धार्मिक रूढी-परंपरा, धर्म चिकित्सा, राजकीय, सामाजिक तसेच सीएए, तबलिगी जमात यासारख्या विषयांवर त्यांनी त्यांची मतं जाहीरपणे तसेच ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आम्हाला शाळेतच जायचंय; मुलांची मागणी, ऑनलाईन शिक्षण पालक आणि मुलांना रुचेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे शक्य होईल का? काय आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहुयात स्पेशल रिपोर्ट

शाळेच्या मैदानात बागडणारी मुलं ही त्या शाळेचे वैभव असते. शाळेत सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, साहित्य, वैज्ञानिक यासह अनेक विषयांचे धडे मिळतात. विद्यार्थी खेळतो, नाचतो, खोड्या करत मोठा होतो. “छडी लागे छम छम , विद्या येई घम घम” या वाक्याप्रमाणे अभ्यास केला नाही अथवा काय खोडी केली तर शिक्षक मारतात हे माहिती असताना छडीचा मार खावून देखिल तो आवडीने न चुकता शाळेत जातो. त्यामुळे काहीही झाले तर शाळा सुरुच व्हाव्यात अशी मागणी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व्यक्त करताहेत.

मात्र शहरी भागात हे शक्य असले तरी ग्रामीण भागात हे स्विकारले जाणार का ? अशी यंत्रणा ग्रामीण भागात आहे का? यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. शाळेत ४० ते ६० विद्यार्थ्यांवर एक शिक्षक काय स्वरूपात लक्ष देण्यासाठी असतात. ग्रामीण भागात आई-वडील कामानिमित्त बाहेर जाणार. मग घरी एकटा विद्यार्थी अभ्यास करु शकणार नाही असे पालकांना वाटत आहे. तर शिक्षणाचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन टप्प्यात विभागणी करुन ऑनलाईन शिक्षणाचा विचार व्हावा.असे मत काही शिक्षण तज्ञ मांडताहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे ७ एकर जमीन असून धोनी आता शेती करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीने आर्मी जॉईन केली होती. आता हाच पठया शेती करणार का हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. नवीन ट्रॅक्टरची सवारी करतानाचा त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

यावर महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनन्द महिंद्रा यांनी ट्विट करत ‘धोनी नेहमी अशा योग्य निर्णयांसाठी ओळखला जातो’ म्हणत आपल्या कंपनीचंही ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही चाणाक्ष उद्योजक म्हणून रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आज जागतिक महासागर दिन; ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही यंदाची थीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे महासागरांमध्ये सामावलेलं असल्याची माहिती शालेय शिक्षणातून मिळाली होती. महासागरांचा विचार करत असताना या पाण्यामध्ये अधिवास करणारे जलचर, या पाण्याचं सांडपाणी आणि घातक कचऱ्यापासून करावं लागणारं संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात.

युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण आणि विकास या विषयावर १९९२ साली झालेल्या जागतिक परिषदेत ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बहुतांश देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही, परंतु २००८ साली पुन्हा झालेल्या परिषदेत युनायटेड नेशन्सने २००९ पासून सर्वत्रच ८ जून हा जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं.

हा दिवस साजरा करण्यासाठी जगातील अनेक संघटना एकत्र येतात. यंदा मात्र कोरोना संकटाच्या धास्तीने ऑनलाईन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. समुद्रांचं प्लास्टिक कचऱ्यापासून संरक्षण करणे, दूषित पाण्याचं प्रमाण कमी करणे, कमी होणाऱ्या पाण्याच्या साठ्यांवर गांभीर्याने विचार करणे, समुद्री जैवविविधतेचं रक्षण करणे हा उद्देश केंद्रस्थानी मानून यंदाच्या वर्षीची थीम ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही ठेवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच पर्यटनस्थळांना खुले करण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे स्पष्ट केले असून बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संचारबंदीचे नियम शिथिल करून जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार हळूहळू सुरु करण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. मात्र सर्वच ठिकाणी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. पुण्यात मावळ. मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. याठिकाणी विविध धरणे आहेत. जिल्ह्यात या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणे, गड-किल्ले, आहेत. नागरिक दरवर्षी पावसाळ्यात येथे जाऊन पावसाचा आनंद घेत असतात. मात्र जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी अद्याप या स्थळांना खुले करण्यास मनाई केली आहे.

मुळशी तालुक्यात मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर, हवेली तालुक्यात खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण तसेच या सर्व ठिकाणचा निसर्ग अनुभवण्यासाठी नागरिक आतुर असतात. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. यावर्षी कोरोना तसेच इतर कोणत्याच घटना घडू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी वर्षापर्यटनाचा अनुभव पुण्यातील नागरिकांना घेता येणार नाही असेच दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

…म्हणून अमित शहांनी घेतला ‘हा’ तडकाफडकी निर्णय

नवी दिल्ली । केंद्रीय गृह विभागाची प्रिसिद्धीविषयक काम पाहणाऱ्या मीडिया विंगवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कमालीचे नाराज झाले आहे. यामुळे त्यांनी संपूर्ण मीडिया विंग बदलली आहे. या बदलामध्ये या टीमच्या प्रमुख वसुधा गुप्ता यांची बदली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) सत्यशोधन विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. तर, भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) वरिष्ठ अधिकारी नितीन वाकणकर यांच्या नेतत्वाखालील नव्या टीमची नियुक्ती करण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहा गृह विभागाच्या मीडिया विंगच्या वारंवार झालेल्या चुकांमुळे नाराज होते. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय वादात सापडून तो चर्चेचा विषय बनला होता. ही टीम बदलण्यामागील हेच कारण असल्याचे ‘द टेलिग्राफ’ने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामगिरीच्या यादीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मुद्दा वगळण्यात आला. प्रसिद्धी टीमचा हा हलगर्जीपणा अमित शहांसह इतर अधिकाऱ्यांना जराही रुचला नाही असं ‘द टेलिग्राफ’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या प्रसिद्धीबाबत मीडिया विंगवरील नाराजी ताजी असतानाच गेल्या आठवड्यात, मंत्रालयाच्या ४ सदस्यांनी बंगालमधील चक्रीवादळाच्या वेळी व्यस्त असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांची छायाचित्रे व्हिस्कीच्या बाटल्यांसोबत अपलोड केली होती. त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये येणाऱ्या किराणा मालाच्या सामानाची यादी सार्वजनिक केल्याबद्दलही गृहमंत्री अमित शहा गृह विभागाच्या मीडिया विंगच्या कामावर कमालीचे नाराज झाले होते. या प्रकारांनंतर गृह मंत्रालयाने हा कठोर निर्णय घेण्याचे पाऊल उचलल्याचे ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत.

आजपासून खाजगी कार्यालये १०% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कार्यालयांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ असणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये १५% मनुष्यबळासह उघडली जाणार आहेत. सर्वाना सामाजिक अलगाव चे नियम पाळावे लागणार आहेत.  जिल्ह्यांमधील बस आणि एसटी सेवा या जिल्ह्यांतर्गत सुरु होणार आहेत. क्षमतेच्या ५०% प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

हॉटेल्स, रेस्टारंटस, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडता येणार नाहीत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था तसेच प्रशिक्षण संस्था बंदच राहतील. सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील. विमानसेवा, मेट्रो सेवा पूर्णतः बंद असणार आहेत. धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. तसेच रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी राहणारच आहे. वय वर्षे ६५ च्या वरील आणि १० च्या खालील नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना पहिल्या टप्प्यात परवानगी देण्यात आली होती.  सामूहिक ठिकाणी गर्दी करण्यास परवानगी नव्हती. लहान मुलांसोबत पालकांनी असणे अनिवार्य असणार आहे. सामाजिक अलगाव पाळणे बंधनकारक आहे. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा अशा तंत्रज्ञानी सामाजिक अलगाव, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून काम करावे असे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत एक दिवस आड एका बाजूची याप्रमाणे उघडली जातील. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे याला परवानगी नसणार आहे. सामाजिक अलगाव पाळण्याची जबाबदारी ही त्या त्या दुकानांची असणार आहे. खरेदीसाठी जाताना वाहनाने जाणे टाळण्यास सांगितले आहे. टॅक्सी, कॅब, रिक्षा यासारख्या तसेच चारचाकी वाहनातून केवळ २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दुचाकीवर केवळ चालक जाऊ शकेल असे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आज जागतिक ब्रेन ट्युमर दिवस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीशी सर्व जग झुंजत असताना इतर आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीच. मेंदूच्या आजाराशी संबंधित असलेला ब्रेन ट्युमर हा आजारही त्यातीलच एक. जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनने २००० सालापासून ८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आजाराच्या पेशंटप्रति सहानुभूती दाखवणे, यांना आजारातून बाहेर पडायला मदत करणे हा मुख्य हेतू हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

काय आहे ब्रेन ट्युमर? – मेंदूची गाठ म्हणजे मेंदूच्या पेशींची असामान्य वाढ. या गाठी हानीरहित (सौम्य) किंवा कर्करोगास कारणीभूत  (घातक) होऊ शकतात. मेंदूच्या आत ज्या गाठी बनतात त्यांना प्राथमिक मेंदूची गाठ म्हटले जाते. दुस-या प्रकारची गाठ किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर, जे शरीराच्या इतर भागामध्ये कर्करोग होऊन मेंदूच्या भागाकडे सरकल्याने होतो. मेंदूतील गाठीची लक्षणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात उदा. गाठीचा आकार, गाठीच्या वाढीची गती आणि गाठ असलेले स्थान. मेंदूतील गाठीच्या काही प्रारंभिक आणि सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखीचे बदलते व्यवहार, वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, बोलण्यातील समस्या आणि शरीराचा संतुलन राखण्यात अडचण यांचा समावेश होतो.

याची लक्षणं नक्की काय – लक्षणांचा विचार करता तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अनेक गोष्टी लक्षात ठेवता न येणे म्हणजेच विस्मृती आणि स्मृतिभ्रंशाचा त्रास, निराशा येणं, मूडमध्ये सातत्याने बदल होणं, चक्कर येणं, एकाग्रता कमी झाल्याने विचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येणं याचा प्रामुख्याने समावेश होतो.

उपचार काय आहेत? – ब्रेन ट्युमरवर अत्याधुनिक पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया करुन मेंदूमध्ये वाढलेल्या गाठी काढून टाकता येतात. बऱ्याचदा रुग्णाची प्रतिकारशक्ती आणि शरीररचना पाहून लेझर उपचारांद्वारे मेंदूतील ट्युमर नष्ट केला जातो. रेडिओसर्जरी आणि केमोथेरपी करून, अलोपॅथीच्या विशिष्ट भागावर परिणाम करणाऱ्या गोळ्या वापरूनही ट्युमरवर इलाज करता येतो. एकूण काय आजाराचं स्वरूप गंभीर असलं तरी योग्य माहिती घेऊन त्यावरील इलाज करता येणं शक्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.