Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5689

‘निसर्ग’ चक्रीवादळ नुकसान पाहणीसाठी शरद पवार उद्यापासून २ दिवस कोकण दौऱ्यावर

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे २ दिवस कोकण दौरा करणार आहेत. आपल्या कोकण दौऱ्यात शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्गग्रस्त रायगड जिल्ह्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी तातडीची १०० कोटींची मदत जाहीर केली.

असा असेल दौरा
शरद पवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लाॅकडाउनमध्ये SBI देतंय मोजक्या अटींवर गोल्ड लाेन; ‘अशी’ आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या या काळात जर आपल्याला रोख रकमेची आवश्यकता भासल्यास अस्वस्थ होऊ नका. घरात ठेवलेले सोने या कठीण काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल गोल्ड लोन ऑफर आणली आहे. याद्वारे आपण सोन्यावर कर्ज घेऊन आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकता. याअंतर्गत ग्राहक २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. एसबीआयच्या म्हणण्यानुसार बँकांनी कमीतकमी कागदपत्रे आणि कमी व्याजदरासह बँकेतून विकल्या गेलेल्या सोन्याच्या नाण्यांसह इतरही सोने तारण ठेवून हे गोल्ड लोन घेता येते. गोल्ड लोनबद्दल सर्व काही जाणून घ्या…

 

गोल्ड लोन कोण कोण घेऊ शकेल?
एसबीआय कडून १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्ती पर्सनल गोल्ड लोन साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. व्यक्ती एकत्याने किंवा संयुक्त आधारावर अर्ज करू शकतात आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा एखादा स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे. या कर्जासाठी आपल्याला उत्पन्नाचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नाही.

व्याज दर
एक वर्षाच्या गोल्ड लोनसाठी एसबीआय MCLR पेक्षा 0.75% व्याज दर देते. बँकेच्या वेबसाइटनुसार, 15 मे 2019 ते 15 जुलै 2020 पर्यंत बँकेचे एक वर्षाचे MCLR 7.25% आहे. याचा अर्थ एसबीआय पर्सनल गोल्ड लोन योजनेचा व्याज दर 7.75% आहे. एसबीआय कर्जाच्या रकमेच्या 0.50% आणि गोल्ड लोनसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून किमान 500 रुपये (जीएसटी दोन्हीसाठी लागू) घेते.

तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल
जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. यासाठी किमान कर्जाची रक्कम 20,000 रुपये आहे. एसबीआयकडे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या पेबॅकचा कालावधी असतो. मूळ कर्जाची परतफेड आणि गोल्ड लोनचे व्याज वितरण डिस्बर्समेंटच्या महिन्यापासून सुरू होईल. लिक्विड गोल्ड लोन आणि मासिक व्याजासह ओव्हरड्राफ्टची व्यवहार सुविधा खात्यानुसार ठरविली जाते. बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन योजनेत कर्जाच्या कालावधीआधी किंवा खाते बंद झाल्यावर कर्जाची परतफेड ही एकरकमी असू शकते. एसबीआय गोल्ड आणि लिक्विड गोल्ड लोन या दोहोंची कमाल परतफेड ही ३६ महिने आहे, तर एसबीआय बुलेट रिपेमेंट गोल्ड लोनची मुदत हि १२ ​​महिने आहे.

अर्ज कसा करावा
कर्ज मंजूर करण्याची आणि निधी वितरणाची प्रक्रिया अगदी सोपी आहे. गोल्ड लोनसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
>> दोन छायाचित्रांसह दोनप्रतींमध्ये गोल्ड लोनसाठीचा अर्ज.
>> पत्त्याच्या पुराव्यांसह ओळखीचा पुरावा.
>> अशिक्षित कर्जदारांच्या बाबतीत साक्षीचे पत्र.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

धक्कादायक! देशात केवळ ५ दिवसात कोरोनाचे ५० हजार रुग्ण वाढले

नवी दिल्ली । एकीकडे संपूर्ण देश अनलॉक होत असताना दुसरेकडे देशातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.

मागील ५ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 3 जून रोजी देशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 होती. 4 जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या 2.16 लाखांवर गेली. 5 जून रोजी रूग्णांची संख्या वाढून 2.26 लाख झाली. 6 जून रोजी रुग्ण संख्या 2.36 लाखांवर पोहोचली. 7 जून रोजी रुग्ण सख्या 2.46 लाख झाली. तर 8 जून रोजी देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 झाली आहे. म्हणजेच देशात दररोज सुमारे 10 हजार नवीन रुग्ण देशात वाढत आहे.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी सापडला होता. 7 मे रोजी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांवर गेली होती. म्हणजेच, सुमारे 96 दिवसांत प्रथम 50 हजार रुग्ण आढळले. १ मे रोजी रुग्णांची संख्या १ लाखांवर गेली होती. 27 मे रोजी रुग्णांची संख्या 1.50 लाखांवर पोहोचली आणि 3 मे रोजी ती 2 लाखांच्या वर गेली. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 आहे. आतापर्यंत 7 हजार 135 लोकांचा बळी गेला असून 1 लाख 24 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आता 1 लाख 25 हजार 381 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 975 वर गेली असून आतापर्यत 3060 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

.. म्हणून पाकिस्तानात होतंय मुख्यमंत्री योगींचं कौतुक

नवी दिल्ली । पाकिस्तानात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं जात आहे. तुम्ही म्हणालं नेहमी पाकिस्तानच्या नावाने बोट मोडणाऱ्या योगींचे पाकिस्तानात कसं काय कौतुक होऊ शकते? पण असं झालं आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यात कोरोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्याबाबत पाकिस्तानचं प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘डॉन’चे संपादक फहाद हुसैन यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

‘डॉन’चे संपादक फहाद हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान करोना हाताळण्यासाठी कसा संघर्ष करत आहे यावर हुसैन यांनी एक दिवस अगोदरच लेख लिहिला होता. त्यानंतर एका ट्वीटद्वारे त्यांनी यूपीचं कौतुक केलं. हुसैन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘पाकिस्तानचा मृत्यू दर हा यूपीपेक्षाही जास्त आहे. यूपी आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पाकिस्तानमध्ये लोकसंख्येची घनता यूपीपेक्षा कमी आहे आणि जीडीपीही जास्त आहे. उत्तर प्रदेशात कडक लॉकडाऊन पाळण्यात आलं, जे आपण केलं नाही’, असं ट्वीट त्यांनी केलं.

कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी इम्रान खान सरकार कसा संघर्ष करत आहे, यावर हुसैन यांनी अग्रलेख लिहिला होता. ते इस्लामाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी यूपी आणि पाकिस्तानची तुलना केली. दरम्यान, लॉकडाऊनवरुन यूपीतही योगी आदित्यनाथांवर टीका होत असतानाच ही प्रशंसा करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पण उत्तर प्रदेशने लॉकडाऊनचं कसं काटेकोर पालन केलं आणि पाकिस्तानला अपयश आलं, असं फहाद हुसैन म्हणाले. हुसैन यांनी रविवारी सकाळी ट्विटरवर एक आलेख शेअर केला, ज्यात उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना केली होती. या आलेखानुसार पाकिस्तानची लोकसंख्या २०.८ कोटी, तर यूपीची लोकसंख्या २२.५ कोटी आहे. पण भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये मृत्यू दर हा यूपीपेक्षा सात पट जास्त असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भारतीयांना चिनी वस्तु वापरण्याशिवाय पर्याय नाही, बहिष्कर तर दूरच – चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यापासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही कडे सीमेवर सैन्य वाढविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  हा वाद शांततेने मिटविला जावा यासाठी प्रयत्न केले जावेत अशी चर्चा शनिवारी झालेल्या बैठकीत झाली होती. मात्र चिनी माध्यमे भारतावर निशाणा साधून असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील दैनिक ग्लोबल टाइम्स ने एका लेखातून चीनच्या वस्तूंशिवाय भारताला पर्याय नसल्याचे छापले आहे. काही भारतीयांमुळे भारतात चीन च्या विरोधी भावना निर्माण झाल्याचे त्यांनी लिहिले आहे.

“सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकविण्याचे काम काही भारतीय करीत आहेत. तसेच ते चीनला कलंकित करू पाहत आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे. चीनची उत्पादने ही सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुनर्स्थित करणे अवघड आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णतः अपयशी ठरेल.” असे या ग्लोबल टाइम्स ने लिहिले आहे. सध्या भारतात चिनी वस्तुंना न वापरण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविली जात आहे.

 

यापूर्वी ग्लोबल टाइम्सने “भारतात रणनीती तयार करण्याचं आणि धोरणं ठरवण्याचा अधिकार एका छोट्या समुहाकडे आहे. तो समूह चीनविरोधातील नकारात्मक विचारांनी भरलेला आहे. चीनची प्रगती तसंच बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढती दरी यामुळे चीनविषयीचा भारताचा संभ्रम वाढत आहे,” असे ट्विट केले होते. ग्लोबल टाइम्सने या लेखात सोनम वांगचुक यांचाही उल्लेख केला आहे. सोनम वांगचुक यांनी युट्युबवर व्हिडीओ करून चिनी वस्तू देशाने बहिष्कार घालण्याआधी तुम्हीच वापरणे बंद करा असे सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये, कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होतेय. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स सरकारी असो की खासगी असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दिल्लीतील केंद्र सरकारच्या हॉस्पिटल्यमध्ये मात्र कुणीही उपचार घेऊ शकतं, असं केजरीवाल म्हणाले होते. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०-१० हजार खाटांची व्यवस्था आहे. त्यातील केंद्र सरकारची रुग्णालये बाहेरच्या रुग्णांसाठी खुली असतील. दिल्ली सरकारने त्यावर पाच तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती आणि नागरिकांचा कौलही घेतला होता. जूनअखेर दिल्लीत करोनारुग्णांसाठी १५ हजार खाटांची आवश्यकता भासणार असून, दिल्लीबाहेरच्या रुग्णांसाठी रुग्णालये खुली केल्यास नऊ हजार खाटा तीन दिवसांतच भरल्या जातील, असा अहवाल या तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे.

दरम्यान, दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या २७, ६५४ इतकी झालीय. गेल्या २४ तासांत दिल्लीत १३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या २१९ कंटेन्मेंट झोन आहेत. राजधानी दिल्लीत एक जूनपासून रोज १२०० हून अधिक करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.
देशातील करोना रुग्णांची संख्या २ लाख ५६ हजार ६११ इतकी झाली आहे. यातील ७ हजार १३५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर १ लाख २४ हजार ९५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर १ लाख २५ हजार ३८१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरविंद केजरीवालांची तब्बेत बिघडली; उद्या कोरोना टेस्ट होणार

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होते. या लक्षणांमुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये आहेत.

त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मग ती हॉस्पिटल्स सरकारी असो की खासगी.

दरम्यान, दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ६५४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत १३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या २१९ कंटेन्मेंट झोन आहेत. राजधानी दिल्लीत एक जूनपासून रोज १२०० हून अधिक करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

मान्सून वारे येत्या दिन तीन दिवसात कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील सहा राज्यात संततधार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात येत्या दोन तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ११ जूनला मुंबईत मान्सून धडकणार असून मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.

गेले दोन दिवस मुंबईत मान्सून पूर्व सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यंदा जून ते सप्टेंबर मध्ये १०२ % पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. ११ जून रोजी मुंबईत पाऊस सुरु होईल. चक्रीवादळानंतर मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र आता पुन्हा हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईचे वातावरण थंड झाले आहे. मान्सून सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत पोहोचले आहे. पुढच्या दोन दिवसात दक्षिण कर्नाटकाचा काही भाग तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातील सर्व भागात मान्सून वाऱ्यांनी प्रगती केली आहे. आता ते लवकरच महाराष्ट्रात येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी |

सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला,
खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु
झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता.
खटाव तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व विसापूर येथील 71 व 62 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26 पुरुष व 50 वर्षीय महिला
यांचा समावेश आहे.

181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणं निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. याअंतर्गत कोणताही ग्राहक फूड मेन्यू स्कॅन करू शकतील आणि त्यांच्या फोनद्वारेच ऑर्डर देऊ शकतील.

डिजिटल पेमेंट देखील उपलब्ध असेल
त्याअंतर्गत त्यांना आपले वॉलेट, कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट देण्याची सुविधा असेल. रेस्टॉरंट्स व्हाइट लेबल प्रोडक्ट म्हणून याचा वापर करू शकतील, जिथे ते त्यांचे लोगो, ब्रँड कलर इत्यादी पॅम्पलेट, होर्डिंग्ज आणि साइनबोर्डवर वापरू शकतात. यासाठीच्या पहिल्या टप्प्यात १ लाख रेस्टॉरंट्समध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.

याच्या लॉन्चिंगच्या पहिल्या टप्प्यात पेटीएम ही सुविधा १ लाख रेस्टॉरंट्समध्ये देईल. पेटीएमचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे जेव्हा केंद्र सरकारने ८ जून रोजी देशभरातील हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास मान्यता दिली आहे.

पेटीएमचे उपाध्यक्ष निखिल सिंघल म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरिंग सिस्टम अंतर्गत या व्यवसायिक संघटना आपला व्यवसाय सुरू करण्यास सक्षम होतील आणि त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करून सध्याच्या साथीला टालू शकतील.”

गेल्या महिन्यातच कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सुट्टीतील काही दिवसाचे योगदान देण्यास सांगितले होते. या संस्थांच्या बॅलन्सशीटवर या प्रणालीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि त्यांच्या नफ्यामध्ये वाढही होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, कंपनीच्या दुसर्‍या अधिकाऱ्यांचा हवाला देत असे म्हटले होते की, आमचे हे पाऊल अल्पावधीत होणाऱ्या परिणामाची भरपाई करण्यास सक्षम असेल आणि दीर्घावधीसाठी कंपनी आणि कर्मचार्‍यांसाठीदेखील हे चांगले असेल.

अलीकडेच कंपनीने आपल्या ई-कॉमर्स व्हेंचर पेटीएम मॉलचे मुख्यालय नोएडाहून बंगळुरू येथे हलविले आहे. आता कंपनी आपल्या उत्पादन आणि तंत्रज्ञान विभागात ३०० लोकांना कामावर घेण्याचा विचार करीत आहे. पेटीएम मॉलने असा दावा केला आहे की, गेल्या आर्थिक वर्षात प्रत्येक तिमाहीत तोटा १७ मिलियन डॉलर्सवरून २ मिलियन डॉलरवर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.