Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5693

हुश्श! मुंबईतील बेस्ट बससेवेला सरकारकडून ग्रीन सिग्नल; पण…

मुंबई । तब्बल दोन महिन्यानंतर आता मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बस सेवा सुरू होणार आहे. सोमवार पासून मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावणार असून या बसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं बोललं जात आहे.

राज्य सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करत राज्यातील अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलॉक प्रक्रियेचा उद्या तिसरा टप्पा असून या टप्प्यात अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत बेस्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या नियमावलीनुसार बेस्ट बसमधून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे एका बसमधून फक्त ३० प्रवासी प्रवास करू शकणार आहे. यापूर्वी बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, उद्या सोमवारपासून पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं बंधन पाळणं आणि तोंडाला मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

बसमधून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा होती. आता मात्र इतरांनाही प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयातील १५ टक्के कर्मचारी, खासगी कार्यालयातील १० टक्के कर्मचारी, प्लंबर, पेस्ट कंट्रोल करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन आणि सरकारने मुभा दिलेल्या इतर व्यावसायिकांना या बसेसमधून उद्या प्रवास करता येणार आहे. उद्यापासून इतरांनाही बेस्ट सेवेचा लाभ घेता येणार असल्याने बेस्ट प्रशासनानेही उद्यापासून अधिकच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील भवानी पेठेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश

पुणे ।  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ हजारच्या घरात गेली आहे. मात्र जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. हळूहळू जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरातील स्थिती सुधारत आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरातही रुग्णसंख्या आता कमी होत आहे. आतापर्यंत या परिसरात ८६५ रुग्ण आढळले होते. पण आता येथे केवळ १२१ रुग्ण उपचार घेत आहेत. ही माहिती पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे.

“भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय हद्दीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश मिळत असून ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत भवानी पेठ आता दहाव्या क्रमांकावर आहे. आजवर या भागात ८६५ रुग्ण आढळले होते, पैकी केवळ १२१ रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. हे सर्व सामूहिक यश असून राबणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद !” असे ट्विट मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून केले आहे. दरम्यान आता जिल्ह्यात हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ८,९६५ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५,६३७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आणि जिल्ह्यात हळूहळू दैनंदिन व्यवहाराला सुरुवात होते आहे. प्रशासनाच्या वतीने सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गर्भवती गायीला चारली स्फोटके; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला अननस मधून स्फोटके खायला दिल्याची घटना अजून ताजी आहे. यामध्ये त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केरळ सरकारने एकाला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तोवर हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यातून स्फोटके दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ याची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या गायीच्या मालकाने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. गायीच्या जबड्याला जबर दुखापत झाली आहे, तिच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त येत असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. बिलासपूरच्या जनदत्ता परिसरातील गुर्दील सिंह यांच्या गायीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. याबाबत गुर्दील सिंह यांनी त्यांचे शेजारी नंदलाल यांच्यावर या कृत्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान नंदलाल फरार असल्याची माहिती गुर्दील सिंह यांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. असले प्रकार राज्यात खपवून घेतले जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

‘अनलॉक’मुळे भारतात कोरोना आणखीन फोफावण्याचा धोका: WHO

मुंबई । भारतात केंद्र सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलली असून लॉकडाउनची निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. भारतात लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तवली. रेयान यांनी सांगितले की, भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव वेगवेगळा आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक आहे. दक्षिण आशियात भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही परिस्थिती अद्याप स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

महासाथीच्या काळात आजार लोकांमध्ये पसरल्यानंतर कोणत्याही क्षणी अधिक व्यापकपणे फैलावण्याचा धोका असतो. याआधीदेखील अशाच प्रकारे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग मंदावला आहे.

मात्र, त्यात आता शिथिलता देण्यात येणार असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरात लोकसंख्येची अधिक घनता असणे, हातावर पोट असणाऱ्यांना दररोज कामावर जाण्याशिवाय पर्याय नसणे आदी काही गोष्टींमुळे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे रेयान यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कुणाची किती लोकप्रियता आहे हे समजतं..’त्या’ सर्वेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातल्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये गणल्या गेल्याचा एक सर्व्हे काही दिवसांपूर्वी समोर आला होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं एका सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? असा सवाल विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, ”मी हा सर्व्हे पाहिला नाही. सर्व्हे कुणी केला मला माहीत नाही. मात्र सोशल मीडियावर नजर टाकली तर मुंबईसह महाराष्ट्राची काय दैना झालीय हे पाहायला मिळतं. त्यामुळे कुणाची किती लोकप्रियता आहे हे समजतं. तरीही एखाद्या सर्व्हेत उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा,” असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन:श्च हरी ओम ही संकल्पना चांगलीच आहे. सगळ्या राज्यांना सुरुवात करावी लागेलच. जमिनीवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. खुल्या दिलाने पुन:श्च हरी ओम करावं लागेल, तरच उद्योग सुरू होतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. महाविकासआघाडी सरकारच्या तीन पक्षांमध्ये संवाद नाही. अधिकाऱ्यांबरोबरही संवाद नाही. अधिकाऱ्यांचा मंत्र्यांशी संवाद नाही, असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार यांना माढा येथे लोकसभेच्या उमेदवारीसाठी विरोध केला होता. तसेच सुशीलकुमार शिंदे यांना जिल्ह्यातील नागरिकांनी दोन वेळा पराभूत केले होते. याचा हे दोन्ही नेते सूद घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संतोष पवार म्हणाले, “सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नाही. कारण माढा लोकसभेच्या वेळी शरद पवारांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील लोकांनी केलेला विरोध होय. याचाच सूड म्हणून पवार कुटुंबांने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेत २ वेळा येथील नागरिकांकडून पराभूत केले गेले म्हणून त्यांनी जनतेच्या विरोधात सूड उगवला आहे. या दोन्ही नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणूनच सोलापूरची वाताहत झालीआहे. आता या दोघांनी एकत्र येऊन सोलापूरचे प्रशासन हातात घेऊन सोलापूरची व्यवस्था करायला हवी आहे.” संतोष पवार यांनी या दोन्ही नेत्यांना जिल्ह्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन या दोघांच्या मागे रेटा लावावा की, दोघांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्याला वाचवा. सोलापूर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या शंभरी पार करून आता हजाराच्या वर गेली आहे. असाही उल्लेख त्यांनी केला. या दोन्ही नेत्यांना उद्देशून ते म्हणाले, या जनतेनेच तुम्हांला सार्वजनिक रित्या निवडून दिले आहे. त्यांनीच तुम्हांला मुख्यमंत्री केले आहे. कधी काळी तुम्ही इथले पालकमंत्री होता. आता एकत्र येऊन या जिल्ह्याचे प्रशासन हातात घ्या म्हणजे लोक सुटकेचा श्वास घेतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मोदी सरकारचं धोरणं सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मारून टाकण्यासारखं- भारतीय मजदूर संघ

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फूट पडल्याचं समोर येतं आहे. आर्थिक सुधारणांच्या नावावर सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण आणि गुंतवणुकीच्या निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) शी संबंधीत श्रमिक संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाकडून देशव्यापी ‘सेव्ह पब्लिक सेक्टर सेव्ह इंडिया’ आंदोलन सुरू करण्यात येतं आहे. भारतीय मजदूर संघ (BMS) कडून पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या निर्णयांना जोरदार विरोध दर्शवला गेला आहे.

येत्या १० जून रोजी संपूर्ण देशभर विरोध प्रदर्शन आणि धरणं आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भारतीय मजदूर संघाच्या या आंदोलनात देशातील आणखीन १० मोठ्या मजूर संघटनाही सामील होणार असल्याचं समजतं आहे.सुधारणांच्या नावावर मजूरविरोधी निर्णय देशाच्याही हिताविरोधात आहेत. सरकारचं धोरणं सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मारून टाकण्यासारखं असल्याची टीका भारतीय मजदूर संघानं केली आहे.

मोदी सरकारनं श्रमिक संघटनांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्याशी संवाद न साधता सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरण आणि गुंतवणुकीचा निर्णय जाहीर केला आहे, असं भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मोदी सरकारीची ही नीती देशातील मजूरांच्या हितविरोधी अस्लयाचंही त्यांनी म्हटलं आहे. याविरुद्ध आवाज उचलण्यासाठी आपण देशव्यापी आंदोलन करत असल्याचं भारतीय मजदूर संघानं म्हटलं आहे.

‘सेव्ह पब्लिक सेक्टर, सेव्ह इंडिया’ मोहीम फायद्यात असणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीविरुद्ध देशभरात राबवण्यात येणार आहे. रेल्वे, डिफेन्स ऑर्डिनन्सस फॅक्टरीमध्ये खासगी गुंतवणुकीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. कोळसा सेक्टरमधलं व्यवसायिकरणंही मजुरांच्या हिताचं नाही. तसंच संरक्षणासाख्या स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये एफडीआयचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचं भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निसर्गग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी; राज्य सरकारने ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी- फडणवीस

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना अधिक मदत करण्याची मागणी केली. राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, असं ते म्हणाले.

चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही अत्यंत तुटपुंजी असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के मदत करावी, अशी मागणी करतानाच नुकसानग्रस्तांना तातडीने रोखीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने कर्ज काढून पैसा उभा करावा याचा पुनरुच्चार केला. राज्यातील जनता अडचणीत असताना सरकारने व्यावहारिक निर्णय घ्यायला हवेत. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असंही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या कामाचं गुणगान
आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्या टर्ममधील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात कठोर निर्णय घेतले आहेत. जे आयुष्यात कधी पाहू शकलो नसतो असे निर्णय पंतप्रधान यांनी घेतले आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. ३७० कलम रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय यापैकी आहे. यामुळे या भागात आमूलाग्र बदल होत आहे. CAA मध्ये सुधारणा करत निर्णय घेतला. ट्रिपल तलाक वर बंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला. करतापूर कॉरिडॉर, बोडो बाबत निर्णय, राफेल निर्णय, आयुष्यमान भारत मध्ये एक कोटी लोकांना लाभ मिळत आहे, प्रधानमंत्री किसान योजना असे निर्णय घेतले असं सांगत फडणवीसांनी मोदी सरकारचं गुणगान गायलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण

अहमदनगर । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परजिल्ह्यातून आपल्या गावात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसारच ही कार्यवाही होत असली तरी ग्रामीण भागात यावरून तंटे सुरू झाले आहेत. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास संबंधित महिला सरपंच या स्वतःच्या घरातून सांडपाणी बाहेर टाकण्यासाठी आलेल्या असताना आरोपी युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे तेथे आले व ‘तू जाणीवपूर्वक आमच्या भावकीतील लोकांना मिरजगाव येथे क्वारंटाइन केले आहे,’ असे सरपंचाला म्हणाले. यावेळी ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे तसेच आदेश आहेत,’ असे सरपंच यांनी आखाडे व वाघमारे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे यांनी संबंधित महिला सरपंचाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेचा पती सोडवण्यासाठी मध्ये गेला असता, त्यालाही आरोपींनी मारहाण केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात यासाठी समितीही स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये गावच्या सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. मात्र, ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करताना वाद उद्भवू लागले असून मारहाणीचे प्रकारही घडू लागले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LIC ची पॉलिसी खरेदी केलेल्यांसाठी मोठी बातमी; पैसे काढण्याचा ‘हा’ नियम ३० जूनपर्यंत शिथिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशनने कोरोनाच्या या संकटात ग्राहकांना दिलासा देताना आपल्या मॅच्युरिटी क्लेमचे नियम अगदी सुलभ केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता कोणत्याही ग्राहकांना मॅच्युरिटी क्लेम मिळण्यासाठी एलआयसीच्या शाखेत जाण्याची गरज नाही. ग्राहक आता त्यांची पॉलिसी, केवायसी कागदपत्रे, डिस्चार्ज फॉर्म आणि इतर कागदपत्रे ईमेलद्वारे स्कॅन करुन संबंधित शाखेत पाठवून आपला हक्क मिळवू शकतात. या संदर्भात एलआयसीने आपल्या वेबसाइटवर नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी सांगितले आहे की, ३० जूनपर्यंत ग्राहकांना ही सुविधा मिळेल.

क्लेम करण्यासाठीचा नियम
एलआयसीच्या नियमांनुसार यासाठी आपली पॉलिसी सुरु असणे आवश्यक आहे, आपली पॉलिसी ज्या ब्रँच ऑफिस मधून दिली गेली आहे, तिथेच भरली जावी तसेच या पॉलिसीवर कोणत्याही प्रकारची थकबाकी असू नये.

तसेच कोणतीही डुप्लिकेट पॉलिसी जारी केलेले नसावी. सर्व्हायवल बेनिफिट क्लेमच्या बाबतीत, सर्व्हायवल क्लेमचा एकूण लाभ हा ५ लाखांपर्यंतचा असावा. मॅच्युरिटी क्लेम असल्यास पॉलिसीची विमा रक्कम ५ लाखांपर्यंत असावी.

एलआयसी पॉलिसीमधून पैसे काढण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत

एलआयसीनुसार पॉलिसीधारकांना ईमेलद्वारे आपल्या क्लेमची रिक्वेस्ट पाठवावी लागेल.

>> यासाठी claims.bo<Branch code>@ licindia.comवर मेल करू शकतात. येथे ब्रँच कोड म्हणजे तुमची सर्विसिंग ब्रँच आहे. जर सोप्या शब्दात सांगायचे तर समजा तुमचा ब्रँच कोड ८८३ असेल तर मग आपल्याला [email protected] वर मेल पाठवावा लागेल.

>> याकरिता सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे ही जेपीईजी किंवा पीडीएफ स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्यांची साइज ही ५ एमबीपेक्षा जास्त नसावी.

>> अटॅचमेंटची साइज ही ५ एमबीपेक्षा जास्त असल्यास एकापेक्षा जास्त ईमेल पाठवावे लागतील. हा मेल आयडी फक्त क्लेमच्या गरजेसाठी पाठविला पाहिजे.

>> विमाधारकाला पॉलिसी चालू असल्यास आणि सर्व प्रीमियम भरले गेले असल्यासच मॅच्युरिटी बेनिफिटचा क्लेम करण्याचा हक्क असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.