Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5720

आणि म्हणून धोनीने ‘या’ खेळाडूस मदत करण्यास दिला नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर, महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुन्हा खेळताना दिसलेला नाही. त्यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात स्थान दिलेलं नाही. विश्वचषकानंतर किमान वर्षभर तरी धोनी हा क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. मात्र आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनीचा फिटनेस आणि त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी का?? या विषयावर सतत चर्चा सुरु आहे. मात्र धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे यात शंकाच नाही. धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकारी हरभजन सिंह याने धोनीच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

“हे कर, ते करु नको असं धोनी तुम्हाला कधीच सांगणार नाही. तुम्ही जे करु शकता ते सर्वोत्तम करा अशी त्याची अपेक्षा असते. जर तुम्हाला सहाही चेंडू ऑफ स्फिन टाकता येत असतील तर तसे टाका. कित्येकदा त्याने मलाही यष्टींमागून काही सूचना केल्या आहेत. परंतू मी कशी गोलंदाजी करावी हे त्याने कधीच सांगितले नाही.” हरभजन सिंहने ESPNCricinfo या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की. “एकदा पुण्यामध्ये सामना सुरु होता आणि शार्दुल ठाकूरला समोरचा फलंदाज चांगलाच चोप देत होता. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने सणसणीत षटकार ठोकले. हे पाहिल्यावर मी धोनीजवळ गेलो आणि त्याला म्हणालो,” तू त्याला काही सांगत का नाहीस?? चेंडूची दिशा बदल किंवा फिल्डरची जागा बदलायला सांग.” यावर धोनी मला म्हणाला,” हे बघ आता मी त्याला काही सांगायला गेलो तर तो गोंधळून जाईल, त्यापेक्षा त्याला मार खाऊ देत.”

हेच तर धोनीच्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. त्यावेळी आम्ही बाद फेरीत दाखल झालो होतो म्हणून शार्दुलने कशीही गोलंदाजी केली तरी आम्हाला काहीच फरक पडणार नव्हता. ज्यावेळी त्याला वाटेल की, आता त्याच्याकडे काहीच पर्याय उरला नाहीये, त्यावेळी मी त्याची मदत करेन, “असं धोनी मला म्हणाला होता. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याजवळचे सर्व पर्याय संपत नाही तोपर्यंत धोनी तुम्हाला कर्णधार म्हणून काहीच मदत करत नाही. दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय सध्या करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 5.0 | देशातील लॉकडाउन मध्ये ३० जूनपर्यंत वाढ; अनेक गोष्टींमध्ये शिथिलता

नवी दिल्ली । लॉकडाउनचा चौथा टप्पा संपायला काही तास उरले असतांना लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाउन आता फक्त कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-5-0-mha-guidlines-to-states/

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश ३० जूनपर्यंत लागू राहतील. रात्रीची संचारबंदीही सुरूच राहील. कंटेन्मेंट झोनमध्ये रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.

याचसोबत ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल.

कुठेही जाता येणार

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसंच कुठही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही.

राज्यांकडे अधिक अधिकार

राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अहो शेलार! मोदींच्या जन्माआधीपासून पॅसेंजर ट्रेन सबसिडीवरच चालतात- सचिन सावंत

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार देत असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर भाजपची पंचाईत झाली. अशा वेळी राज्यातील सत्ताधारी भाजपला घरात आहेत. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मैदानात उतरत शुक्रवारी बचाव करण्याचा प्रयन्त केला.

एक रेल्वे चालवण्यासाठी केंद्र सरकारला ३० ते ५० लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी स्लीपर कोचचे दर हे सबसिडीनुसार असतात. रेल्वेच्या एकूण खर्चाचे गणित केल्यास राज्य सरकारला आता तिकिटांसाठी भरावे लागणारे पैसे हे १५ टक्केच आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.मात्र, शेलार यांचा हा युक्तिवाद सचिन सावंत यांनी आज खोडून काढला.

‘मजुरांचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलते असं म्हणणारे भाजपवाले आता सबसिडीचं गणित मांडू लागले आहेत. भाजपच्या नेत्यांचा खोटं बोलण्याचा मोठा अभ्यास आहे. त्यामुळंच ते आपली विधानं बदलत आहेत. सुरुवातीला खर्चाबद्दल बोलणारे आता सबसिडीपर्यंत आले आहेत. खरंतर शेलार यांच्यासह भाजपच्या नेत्यांना प्रबोधनाची गरज आहे. कारण, पॅसेंजर ट्रेनवरील ही सबसिडी नरेंद्र मोदी जन्माला येण्याच्या आधीपासून दिली जाते,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

कोविड संकटाच्या आधी स्लीपरसाठी आकारल्या जाणाऱ्या भाड्यात आता श्रमिक स्पेशलसाठी ५० रुपयांची वाढ केली गेली आहे, हा असंवेदनशीलपणा नव्हे काय? कोविडसाठी मोदी सरकारने काय दिले? हॉलिडे स्पेशल, जनता श्रेणीच्या सर्व एक्सप्रेस सबसिडीत चालवल्या जात होत्या. यूपीएने सुरू केलेली गरीबरथ ही एसी ट्रेन सबसिडी वरच चालत होती, याची आठवणही त्यांनी दिली.

राज्य सरकारनं आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मजुरांना एसटी बसमधून सोडले, पण त्यासाठी एक पैसाही घेतला नाही. भाजपसारखे सबसिडीचे गणित मांडलेले नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ असलेल्या भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे. त्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह सिद्ध करून दाखवण्याची तयारी आहे, असं आव्हानही सावंत यांनी दिलं. स्थलांतरीत मजुरांच्या हलाखीच्या परिस्थीतीला केंद्र सरकारचा तुघलकी कारभार कारणीभूत आहे. त्यातही रेल्वेमंत्र्यांना एक ट्रेनही धड नीट चालवता येत नाही. अनेक श्रमिकांचा ट्रेनमध्येच मृत्यू झाला आहे. त्यांचा आकडाही रेल्वे देत नाही. काही तासाच्या प्रवासासाठी रेल्वे पाच पाच दिवस लावते, असा आरोपही सावंत यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोना रूग्णांवर उपचार करणारा भारतीय वंशाचा डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर उपचार करणारे भारतीय वंशाचे एक डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान डॉक्टर त्यांच्या घरापासून वेगळे हॉटेलमध्ये आइसोलेशन मध्ये रहात होते.

डॉ. राजेश गुप्ता नावाचे हे डॉक्टर ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये कार्यरत होते. ते दक्षिण पूर्व इंग्लंडच्या बर्कशायरमधील वेक्सहॅम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. या आठवड्यातच ते हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

एनएचएसने दु: ख व्यक्त करणारे निवेदन जारी केले
एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की,’ आम्हांला सांगताना दुःख होत आहे कि,आमचे एक सहकारी डॉक्टर राजेश गुप्ता यांना आम्ही गमावले आहे. अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील एक निवेदन शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.

डॉ. राजेश गुप्ता वेक्सहॅम रुग्णालयात सल्लागार म्हणून काम करत असल्याची माहिती एनएचएस ट्रस्टने दिली आहे. ते सोमवारी दुपारी त्यांच्या हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. आपल्या कुटूंबाला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ते हॉटेलमध्ये आइसोलेशन मध्ये रहात होते. कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी त्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सेवा दिल्या.

डॉ. राजेश गुप्ता यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत
डॉ. राजेश गुप्ता हे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. ते एक उत्कृष्ट डॉक्टर मानले जात असे. सहाय्यकांनी सांगितले आहे की, डॉक्टरकी व्यतिरिक्त ते एक कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार देखील होते.

ते दयाळू आणि नम्रतेसाठी ओळखले जायचे. त्यांनी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत आणि बर्‍याच प्रकाशनांवर देखील काम केले आहे. ट्रस्टने त्यांच्या मृत्यूबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. राजेश गुप्ता यांनी जम्मूमधून शिक्षण घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमिरिकेत पोलीस कोठडीत आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळल्या दंगली

वृत्तसंस्था । अमेरिकेत पोलीस कोठडीत एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे अमेरिकेत हिंसक पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसाचार, दंगली सुरु आहेत. जॉर्ज फ्लॉयड नावाच्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. या प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर शेकडोच्या संख्येने लोकांनी व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने केली. त्यामुळे व्हाइट हाऊस बंद करण्यात आले आहे. न्यूयॉर्क, अटलांटा, डेनेवर, डेट्रॉईट आणि अन्य काही शहरात शुक्रवारी हिंसाचार झाला. अमेरिकेतील सहा मोठ्या शहरांत तुफान दंगली झाल्या. काही ठिकाणी पोलीस आणि निदर्शकांमध्ये चकमकी झाल्या.

मिनियासोटा प्रांतामध्ये मिनियापोलीस हे शहर आहे. तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. पेंटागॉनने अमेरिकन लष्कराच्या पोलीस विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांची मिनियापोलीस शहरात तैनाती केली जाऊ शकते. पेंटागॉनकडून असे आदेश येणे ही फार दु्र्मिळ बाब आहे. त्यातून अमेरिकेत किती गंभीर स्थिती आहे, ते लक्षात येते. डेनेवर, लास वेगास, लॉस एंजिलिस या शहरांमध्ये हजार आंदोलक पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. जॉर्ज फ्लॉयड यांना न्याय देण्याची मागणी त्या पोस्टरमधून करण्यात आली होती.

पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसं आहेत असे ट्रम्प यांनी सांगितले. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे. त्याला वांशिक भेदभावाची किनार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सचिन तेंडुलकरला आपल्या तालावर नाचवणारा हा गोलंदाज आता टोमॅटो विकतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट इतिहासात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या मैदानावरील अद्भुत कामगिरीने संघाला जिंकून दिले आहे. तसेच अनेक चांगले चांगले खेळाडूही त्यांच्यासमोर चाचपडत असत, पण जेव्हा ते खेळाडू निवृत्त होतात तेव्हा सर्वजण त्यांना विसरतात. अगदी कुटुंब चालविण्यासाठी त्यांना क्रिकेट सोडून काहीतरी वेगळे करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोलंदाजाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याची गोलंदाजीवर सचिन तेंडुलकर सारखा आघाडीचा फलंदाजही खुलून खेळू शकला नाही. त्याने सचिनला दोनदा बाद केले, त्याने आपल्या टीमला चार वेळा भारताविरुद्ध विजयही मिळऊनदिलेला आहे, तर आज तो गोलंदाज टोमॅटो विकतो आहे.

इडो ब्रॅन्डिसची गोष्ट
आम्ही बोलत आहोत झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज इडो ब्रॅन्डिसविषयी जो आपल्या देशासाठी १० कसोटी सामने आणि ५९ एकदिवसीय सामने खेळला आहे. ब्रॅन्डिसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि त्याने ९६ बळी घेतले. पण इतक्या कमी वेळात त्याची प्रतिमा चांगली गोलंदाजीची होती. त्याने विशेषतः भारताविरुद्ध अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. ब्रॅन्डिसने सचिनला दोनदा बाद केले आणि हा गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाने भारताविरुद्ध चार विजय नोंदवले. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वन-डे मालिकेमध्ये इडो ब्रॅन्डिसने आपल्या गोलंदाजीने भारताला नामोहरम केले होते . या सामन्यात ब्रॅन्डिसने ९.५ षटकांत ४१ धावा देऊन ५ गडी बाद केले होते.

ब्रॅन्डिस शेतकरी झाला
इडो ब्रॅन्डिसने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता आणि त्यानंतर तो कधीही क्रिकेटच्या मैदानात परतला नाही. एवढेच नव्हे तर ब्रॅन्डिसने झिम्बाब्वेलाही सोडले आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर तो ६ वर्षे एका क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होता. सनशाईन क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना त्यांनी पहिल्यांदाच ब्रिस्बेन क्रिकेट स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिली. यानंतर, ब्रान्डिसने कोचिंग देखील सोडले.

कोचिंग सोडल्यानंतर इडो ब्रॅंड्सने शेती करण्यास सुरवात केली. ब्रॅन्डिसने सनशाईन कोस्टवर टोमॅटोची लागवड केली आणि यामध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिली याने सहाय्य केले. हिलीने ब्रिस्बेनमधील अनेक ब्रँडच्या लोकांशी संपर्क साधला. आज ब्रॅन्डीस आठवड्याला १०० टन टोमॅटो उगवतो आणि ते विकून नफा कमावतो. ब्रॅन्डिस बर्‍याच लोकांना त्याच्याबरोबर काँट्रॅक्टमध्ये ठेवततो. ब्रॅंडेस आणि त्याचे कुटुंब झिम्बाब्वेमध्ये चिकन फार्म देखील चालवत असत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! श्रमिक रेल्वेमध्ये आतापर्यंत ८० मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे काळात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये जवळपास ८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. १ मे ते २७ मे पर्यंत तब्बल ३८४० विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. याद्वारे जवळपास ५० लाख स्थलांतरीत मजूर आपल्या घरी पोहचले. परंतु, श्रमिक रेल्वेने घरी निघालेल्या जवळपास ८० मजुरांचा त्याच्या रेल्वेमध्येच प्राण गेल्याची माहिती मिळत आहे.

एका वर्तमानपत्रानं आरपीएफच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ९ मे ते २७ मे दरम्यान श्रमिक रेल्वेत ८० जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लगेचच या माहितीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. श्रमिक रेल्वेत मृत पावलेल्या अनेक जण अगोदरपासूनच गंभीर आजारांशी झुंज देत होते, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यातील बहुतेक जण उपचारासाठी म्हणून शहरात आले होते परंतु, लॉकडाऊन सुरू झाल्यानं ते तिथंच अडकून पडले. विशेष रेल्वे सुरू झाल्यानंतर ते आपल्या घराकडे निघाले होते.

या अगोदर थकवा, गरमी आणि भुकेमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं होतं. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी श्रमिक रेल्वेत ८० जणांच्या मृत्यूला दुजोरा देतानाच लवकरच या व्यक्तींची अंतिम यादी जाहीर केली जाईल, असं म्हटलंय. राज्यांसोबत समन्वय साधल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली जाईल. आरपीएफच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ४ ते ८५ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. १ मे ते ८ मेपर्यंतच्या आकड्यांचा यात समावेश नाही.

नॉर्थ ईस्टर्न रेल्वे झोनमध्ये १८, नॉर्थ सेंट्रल झोन मध्ये १९ तर ईस्ट कोस्ट रेल्वे झोनमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रवासाकारतेवेळी श्रमिक रेल्वे नियोजित स्थानावर पोहचण्यासाठी घेत असलेला वेळ सुद्धा मजुरांच्या मृत्यूमागे असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक ट्रेन ९० घंटे विलंबाने चालत असल्यानं या लांब प्रवास दरम्यान जेवण आणि पाणी मिळत नसल्यानं अनेकांचे जीव गेल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे.

शोएबने आफ्रिदीला केले ट्रोल
शोएब अख्तर या व्हिडिओमध्ये काही मुलांना विचारतो की, ‘ते मोठेपाणी कोण होऊ इच्छितात. शोएब एका मुलाला आपल्या जवळ बोलावतो आणि विचारतो की,’ जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला काय व्हायचे आहे, तेव्हा मुलाने उत्तर दिले की,’ त्याला आफ्रिदी बनायचे आहे.’ त्या मुलाचे हे उत्तर ऐकून शोएब अख्तर हसला आणि म्हणाला , ‘मग तू लवकरच आउट होशील.’ शाहिद आफ्रिदी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत स्वस्तात बाद होण्यासाठी प्रसिध्द होता. वाकडे तिकडे शॉट्स खेळून आउट झाल्यामुळे त्याची बरीच बदनामी देखील झाली. शोएब अख्तरने दिलेले हे गमतीदार उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आफ्रिदी आपल्या वक्तव्यांबद्दल चर्चेत आहे
काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने पीओकेमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त विधान केल्यानंतर युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी असलेले सर्व संबंध तोडण्याविषयी सांगितले. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यास शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे दोन्ही क्रिकेटपटूंनी आवाहन केले होते. युवराज आणि हरभजनच्या संबंध तोडण्याविषयी आफ्रिदी म्हणाला होता, ‘युवी आणि भज्जीने आपल्या फाऊंडेशनच्या मदतीसाठी जे केले त्याबद्दल त्याचे आभार. पण खरा मुद्दा असा आहे की ते लोक तिथे रहात आहेत. ते असहाय्य आहेत आणि त्यांना हे ही चांगले ठाऊक आहे कि त्यांच्यावर अत्याचार होत आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रिअल लाइफ ‘रॅन्चो’ने सुचवला चीनला हरवण्याचा ‘हा’ मार्ग

लडाख । सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. चीन वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत असून सीमेलगतच्या भारताच्या रस्ते उभारणीला तो विरोध करत आहे. अशातच भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतरच भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मुळचे लडाखभागातील मॅगसेसे पुरस्कार विजेता सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनला गुढघे टेकवण्याचा एक महत्वाचा मार्ग सांगितला आहे. यूट्यूबवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारत-चीनच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. चीनच्या सामानांवर बहिष्कार करण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडिओतून केलं आहे.

सोनम वांगचुक ही तिच व्यक्ती आहे ज्यांच्या जीवनावर आमीर खानने ‘थ्री इडियट’ हा सिनेमा तयार केला आहे. ज्यात त्यांचं नाव रॅन्चो असं ठेवलं होत. वांगचुक यांनी आपल्या या व्हिडिओत सांगितलं आहे की,’एका आठवड्यात तुम्ही चीनचे सगळे सॉफ्टवेअर काढून टाकण्याचे त्यांनी सुचवले आहे. इतकेच नव्हे तर एका आठवड्यात ते स्वतः आपला चायना मेड फोन वापरण बंद करणार आहे. या वक्तव्यामागचं कारण देखील सोनम वांगचूक यांनी सांगितलं. भारतीय सैन्य चीनला बुलेटने उत्तर देईल तर एक नागरिक म्हणून आपण त्यांना वॉलेटने उत्तर देण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले.

एका बाजूला आपले सैनिक त्यांच्याशी लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपली चीनी हार्डवेअर विकत घेतो. टिकटॉक सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. यातून आपण त्यांना करोडो रुपयांचा बिझनेस देतो. ५३ वर्षीय सोनम विचारतात की,’भारत-चीन सीमा तणावाच्या यावेळी एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे असं वांगचुक यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय जवळपास झाला; उदय सामंत यांची माहिती

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत काय निर्णय घेण्यात आला याबाबत आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आपण राखून ठेवल्या होत्या. त्या घ्यायच्या कि घ्यायच्या नाहीत याबाबत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कुलगुरूंशी जवळपास दोन तास चर्चा केली. या चर्चेत उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी आणि खात्याचे मुख्य सचिव यांचाही समावेश होता. त्यानंतर आम्ही निर्णयाप्रती आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आम्ही करू. येत्या दोन दिवसांत आम्ही सदर निर्णय जाहीर करू अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. सर्व अंतिम वर्षांचे निकाल कसे लावणार याबाबतही येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू म्हणूनच सरकारकडून निर्णय घेतला जाईल. असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.