Monday, December 29, 2025
Home Blog Page 5732

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेण्यास जात आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्यानंतर राजकिय वर्तुळात विविध चर्चांना पेव फुटला. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या काही बातम्या आल्या. मात्र हे सर्व भाजपकडून पेरले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. आता चव्हाण यांना राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची धुरा देण्यात येऊ शकते अशा चर्चा सुरु आहेत. तर आक्रमक नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे कालच दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकलेली नाही असे समजत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सुरक्षा दलांनी ‘असा’ उधळला पुलावामधील दहशतवादी हल्ल्याचा कट

पुलवामा । सुरक्षा दलाच्या दक्षतेमुळे पुलवामामध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळून लावला गेला आहे. आज सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलानं आयईडी भरलेली एक सॅन्ट्रो कार पकडली होती. या गाडीत ४०-४५ किलो स्फोटकं असल्याची शक्यता काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी व्यक्त केली. ही कारवाई कशी करण्यात आली त्याचीही माहिती त्यांनी दिली. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी कटात ‘जैश ए मोहम्मद’चा हात होता. यात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’नंही मदत पुरविली होती. परंतु, पुलवामामध्ये तैनात पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीनं ही दहशतवादी कारवाई होण्याआधीच रोखण्यात सुरक्षा दलाला यश आलं.

गेल्या आठवड्याभरापासून या कारवाईबद्दल आम्हाला इनपूटस मिळत होते. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मिळून आत्मघातकी हल्ल्याचा कट रचत आहेत, असं समजलं होतं. यानंतर सगळ्या यंत्रणा सावध झाल्या होत्या. काल सायंकाळी ठोस माहिती हाती लागली आणि सायंकाळी पुलवामा पोलीस, सीआरपीएफ, सेनेनं कारला ट्रॅक करून जागेचा थांगपत्ता लावला.

नाक्यावर या कारला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी सुरक्षा दलानं वॉर्निंग फायरही केले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या दहशतवादी गाडी उलट दिशेने फिरवून पळण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा वॉर्निंग देण्यात आली. परंतु, चार दहशतवादी कार तिथंच टाकून सुरक्षा यंत्रणेला चुकवून फरार झाले.

या गाडीत स्फोटकं भरलेली असल्यानं पोलिसांनी सकाळपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सकाळी डिफ्युजल टीम घटनास्थळी आल्यानंतर स्फोटकांचा तपास लावण्यात आला. गाडीचे-स्फोटकांचे व्हिडिओ, फोटो घेऊन स्फोटकं सुरक्षितरित्या डिफ्युज करण्यात आले, असं पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटलंय. सुरुवातीला या गाडीत २५ किलो स्फोटकं असू शकतील, अशी माहिती समजली होती. परंतु, डिफ्युज करताना ज्या पद्धतीने स्फोट झाला आणि त्याचा मलबा ५० मीटरपर्यंत उंच उडाला त्यावरून या गाडीत ४०-४५ किलो स्फोटकं असल्याचं लक्षात येतंय, असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अजित दादांचं सगळीकडे बारकाईनं लक्ष असतं; रोहित पवारांकडून काकांचे कौतुक

पुणे । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्या तडफदार स्वभावामुळे सर्वांनाच परिचित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील अनुभवाचे एक ट्विट केले आहे. ज्याला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री कोरोना काळात सतत विविध बैठका घेऊन आढावा घेत आहेत. विविध उपाययोजनांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. याबाबतीतच रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘अजित दादांचं सगळीकडे लक्ष असतं’ असे म्हंटले आहे.

काही अधिकाऱ्यांनी दादांच्या एकूण कामाच्या बाबतीत आपले अनुभव सांगितले आहेत. तेच रोहित पवार यांनी ट्विटमधून शेअर केले आहे. “अजित दादांचं सगळीकडं बारकाईनं लक्ष असतं.आज कोरोनाच्या संकटातही राज्यातील लोकांना व पालकमंत्री म्हणून पुणेकरांना कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचं ते सांगतात.त्यांची झटपट निर्णय क्षमता व आश्वासक शब्द हे आम्हाला खूप बळ देतात.’ असे शब्द या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका चांगलीच गाजली आहे. सर्व सुरळीत झाल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले होते. रोहित पवार यांच्या ट्विटवर दादांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहीनी सहामहिन्यापूर्वी त्यांचे झटपट निर्णयही देशाने बघितले असल्याच्या प्रतिक्रिया देत चांगलाच टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

देशातील ‘ही’ ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची शक्यता

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे ४ दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. पुढच्या टप्प्यात देशभरात ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली जाण्याची विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या शहरांत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशभरातील या शहरांमध्येही लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

.. म्हणून SpaceX अंतराळयानाचे प्रक्षेपण पुढे ढकलले, आता प्रक्षेपण शनिवारी

केप कॅनावरा । खराब हवामानामुळे खासगी कंपनी स्पेस एक्सच्या (SpaceX) स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. हे यान नासाच्या दोन अंतराळवीरांना अंतराळ कक्षाकडे घेऊन जाणार होते, परंतु ढगाळ आकाश आणि वादळासह पाऊस कोसळत असल्याने या मिशनचे प्रक्षेपण होण्याच्या १७ मिनिटांपूर्वीच थांबवावे लागले. आता या मोहिमेची सुरुवात शनिवारी होईल. इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी खासगी कंपनी पहिल्यांदा मानवाला अंतराळात नेईल.

स्पेस एक्स कंपनीने हे अंतराळ यान तयार केले आहे. बुधवारी दुपारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून त्याचे प्रक्षेपण होणार होते. पण खराब हवामानामुळे असे होऊ शकले नाही. हे खाजगी मालकीचे अवकाशयान अंतराळ वाहून नेण्यात यशस्वी ठरल्यास ते व्यावसायिक अवकाश उड्डाणांच्या दिशेने नव्या युगाची सुरुवात करेल. हे अभियान पुढे ढकलण्यात आल्याचे नासा प्रशासनाने ट्विट केले. नासाने ट्वीट केले की आज लॉन्चिंग होणार नाही. आमच्या क्रू मेंबरची सुरक्षा उच्च प्राथमिकता आहे

अमेरिकेने खराब हवामानामुळे आपल्या ह्युमन स्पेस मिशनला स्थगिती दिली आहे. उड्डाण घेण्याच्या १६ मिनिटे ५४ सेकंदाला हा निर्णय घेण्यात आला. रात्री २ वाजून ३ मिनिटांनी उड्डाण घेणार होते. नऊ वर्षानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणार होते. नासाच्या कॅनेजी स्पेस सेंटरवर यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली होती. रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले या दोन अंतराळवीरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी या दोघांनी जोरदार तयारी केली होती. मात्र खराब हवामानामुळे मिशनला स्थगिती द्यावी लागली. आता तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा यावर काम होणार असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना रुग्णांच्या आयसोलेश वाॅर्डमध्ये कन्स्ट्रक्शन काम; नितेश राणेंनी शेयर केला व्हिडिओ

सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉंटवरून सिंधुदुर्ग येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागातील एक व्हिडीओ शेअर करून प्रत्येकाचा जीव धोक्यात असल्याचे ट्विट केले आहे.

संचारबंदीच्या सुरुवातीपासून गेले अनेक दिवस महाराष्ट्रातील राजकारणाने जोर धरला आहे. वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. चर्चाना उधाण आले आहे. आणि रोज एक नवा मुद्दा घेऊन सरकार कसे अपयशी आहे हे विरोधी पक्ष सिद्ध करू पाहत आहे. यामध्ये राणे कुटुंबीय ही मागे नाहीत. नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये Covid च्या आयसोलेशन वार्ड मध्ये सुरु असणारे कन्स्ट्रक्शन दिसते आहे. वार्ड मध्ये रुग्ण असताना काम सुरु आहे. सर्वांचेच जीव धोक्यात आहेत असे ट्विट त्यांनी यासोबत केले आहे.

त्यांच्या या आणखी एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. ज्या बेडवरुन रुग्ण उतरवला जातो तो पुन्हा बेडवर जात असताना बेडचे निर्जंतुकीकरण केले जात नाही म्हणजे लागलीच वाट अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर आली आहे. तर दुसरीकडे हे वार्ड साठी महत्वपूर्ण आणि रुग्णांसाठीचे काम असण्याची शक्यता आहे. विनाकारण लोकांमध्ये असे व्हिडीओ शेअर करून भीती निर्माण करू नका अशा प्रतिक्रियाही येत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण या काही दिवसात अधिकच रंजक झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #DhoniRetires, साक्षीचे चाहत्यांना चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी विश्वचषक २०१९ पासून भारतासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. याच कारणास्तव बीसीसीआयनेही त्याला आपल्या वार्षिक करारामधून वगळले आहे. बर्‍याच काळापासून क्रिकेटमध्ये धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या बातम्या येत आहेत. मात्र यादरम्यानच सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर बुधवारी धोनीच्या निवृत्तीचा #DhoniRetires हा हॅशटॅग ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. हा हॅशटॅग ट्रेंडिंग होत असल्याचे पाहून धोनीचे काही चाहतेही या कॅनमध्ये उतरले, तर काहींनी याची मजा घेतली. या हॅशटॅगचे ट्रेंडिंग सुरू होताच, महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी स्वत: हून पुढे आली आणि तिने यावर आपली प्रतिक्रिया दिली.

साक्षीने ही फक्त एक अफवा आहे असे म्हणून ट्विट केले, ती म्हणाली की, ‘ही एक अफवा आहे, मी समजू शकते की लॉकडाऊनने लोकांना मानसिकरित्या अस्थिर केले आहे’. मात्र त्यानंतरच लगेचच साक्षीने तिचे हे ट्विट डिलिट केले.

धोनीच्या रिटायर्टमेन्टच्या हॅशटॅगनंतर त्याच्या चाहत्यांनी अशा प्रकारच्या काही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, ट्विटस पहा

 

 

 

 

 

 

 

कोरोनाव्हायरसच्या विध्वंसमुळे आयपीएल २०२० चा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. धोनीने या स्पर्धेसाठी तयारीही सुरू केली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासह काही दिग्गज खेळाडू म्हणाले होते की,’धोनीच्या संघात पुनरागमन करण्याचा मार्ग आयपीएल २०२० मधील त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा  मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक ५० अंश सेल्सियसच्यावर वर तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ परिसरातही सध्या लोक उष्माघाताशी झुंजत आहेत. अमरावती जिल्ह्यात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून  ऊन्हाचा पारा ४६ डिग्री च्या वर गेला असतांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील डेहनी शेतीशिवारात एका ५८ वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना उघडकिस आली आहे. डेहनी येथील साहेबराव मोहोड वय ५८ वर्ष असे मृत वृद्धाचे नाव आहे ते नेहमीप्रमाणे डेहनी येथे शेतशिवारात जनावरे चराईसाठी गेले होते. उन्हाचा पारा वाढला असल्याने त्याना मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसून त्यांचा मृत्यू झाला आहे.  शिवारातील एका  झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. तिवसा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसापासून नागपूर मध्ये ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत आज ४३ अंश सेल्सियस तापमान आहे. उन्हाने चांगलाच जम बसविल्याचे दिसून येत आहे. कोरोना आणि उष्मा या दोन्ही गोष्टींमुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे नागरिकही चिंतेत आहेत. दरम्यान पुढचे किमान ३-४ दिवस हवामानात कोणताच बदल होणार नसून तापमान वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महारष्ट्रासोबत वरील इतर राज्यातही उन्हाची तीव्रता कायम राहणारं असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शाळा सुरु कधी होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली तरी विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वपूर्ण आहे. त्याबाबतीत कोणताच धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे १५ जूनपासून शाळा सुरु होतील की नाही याबद्दल सध्यातरी प्रश्नचिन्हच असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले आहे.

सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि आपत्ती निवारण यंत्रणा एकत्रित आपापल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतीतील निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी शाळेला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी सध्या बोलत आहेत. सर्व घटकांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. जर एखाद्या जिल्ह्यात एकही रुग्ण नसेल तर त्या ठिकाणचे विद्यार्थी शाळेत येऊ-जाऊ शकतात. पण तो निर्णयही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपत्ती निवारण यंत्रणा यांनी एकत्रित आढावा बैठक घेऊन घेऊ शकतात. असे सोळंकी यांनी सांगितले.

परंतु शाळा कधी सुरु करायच्या हा निर्णय अचानक किंवा अगदी ८-१० दिवस आधीही जाहीर करता येणार नाही. चुकून एखादा रुग्ण आढळलाच तर निर्णय मागे घ्यावा लागेल. त्यामुळे संपूर्ण विचारांती निर्णय घेतला जाईल. अशी माहिती मिळाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पेपरला लेखी परीक्षेच्या एकूण सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कुणालाही समाजशास्त्रात नापास करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संचारबंदीमुळे भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यावर हा तोडगा काढण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवण्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो, कोणता आहार घेऊ शकतो अशा प्रकारची माहिती ते या काळात देत आहेत. तसेच ते यावर उपचारही करत होते. आता पतंजली मार्फत प्रत्यक्ष मैदानात उतरून अर्थात वैद्यकीय चाचण्या करत या युद्धात सहभाग नोंदवला गेला आहे.

कोरोनाचे संकट अधिक प्रमाणात पसरते आहे. अशावेळी पतंजली ने नियामक मंडळाच्या मान्यतेने वैद्यकीय चाचण्या सुरु केल्या आहेत. “आम्ही केवळ रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोलत नाही आहोत, तर आम्ही कोरोनाच्या उपचारांबद्दल सांगत आहोत. गेल्या महिन्यात नियामक मंडळाची मान्यता घेऊन पतंजली कंपनीने इंदूर आणि जयपूर येथे कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरु केल्या आहेत.” अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली आहे. गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाईन या कंपन्यांसोबत पतंजलींचेही नाव आता कोरोनाच्या उपचारांमध्ये जोडले जाणार आहे. ही नक्कीच कंपनीसाठी फायद्याची आणि महत्वाची बाब असणार आहे.

फेब्रुवारी महिन्यापासूनच पतंजली ने कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले होते. साधारण मार्चपर्यंत त्यांनी अनेकांवर उपचार केला. पण अद्याप ते चाचणीचा भाग नव्हते. त्यामुळे संशोधनाला उपचारांचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी चाचणीची मान्यता नियामक मंडळाकडून मिळणे आवश्यक होते. पण मान्यता मिळणे इतके सोपे नव्हते. आयसीएमआर ने हे संशोधन पुढे नेण्यास काही रस दाखवला नाही. म्हणून पतंजली समूहाने क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलर ऑफ इंडियाकडे याची नोंद करून जयपूर विद्यापीठांतर्गत एका विभागात चाचण्या सुरु केल्या आहेत. तसेच आमच्या प्रयोगशाळा उत्तम असल्याचा दावा बाळकृष्ण यांनी केला आहे. तर त्यांच्याकडे ५०० संशोधक आणि १०० पोस्ट डॉक्टरेट संशोधक आहेत अशी माहिती दिली आहे. २०१९ च्या माहितीनुसार या कंपनीचा टर्नओव्हर ८ हजार ५०० कोटी इतका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.