Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5757

चिंताजनक! राज्यात दिवसभरात तब्बल २ हजार ९४० नवे कोरोनाग्रस्त; आजवरची सर्वात मोठी संख्या

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत आज सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार ५८२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनाने ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८५७ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४४ हजार ५८२ इतकी झाली असून त्यातील ३० हजार ४७४ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महाराष्ट्राला आंदोलनापेक्षा टेस्टिंग किटची गरज ते केंद्राकडून आणा’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा

मुंबई । कोरोना व्हायरसचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे पीपीई किट आणि टेस्टिंग किटची मागणी केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि औषधं यायला हवीत, पण मागणीच्या ३० टक्केही पुरवठा होत नाही. खरंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रात गेलं पाहिजे आणि आम्हाला पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स द्या, अशी मागणी केली पाहिजे. आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो जीएसटीचा परतावा आणि वेगवेगळ्या योजनांचे पैसे आम्हाला द्या, यासाठी केंद्राकडे जाऊन भांडलं पाहिजे. त्याऐवजी राज्याच्या कामकाजात अडचण होईल, असा त्यांचा प्रयत्न असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपचं आंदोलन फसलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. करोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने करोनाच्या संकटात सरकारला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल, परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असे थोरात म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचे खरे अंगण कोणते? पुणे की कोल्हापूर?

देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून, या ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच, पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले, असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

रेल्वे तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद; केवळ २४ तासांत २३० ट्रेनसाठी १३ लाख तिकीट बुक

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आणि स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी अतिरिक्त रेल्वेने मंगळवारी मोठी घोषणा केली होती. यानुसार २३० अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डबेही असतील. या ट्रेन रोज धावतील.

दरम्यान, रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० अतिरिक्त ट्रेनसाठी बुकींग सुरू केले आहे. काही रेल्वे स्टेशन आणि ऑनलाइनवरूनही प्रवाशांना बुकींग करता येणार आहे. रेल्वेने २१ मेपासून म्हणजे कालपासून हे बुकींग सुरू झाले. यासाठी २३० ट्रेनसाठी गेल्या २४ तासांत १३ लाख तिकीटांचे बुकींग झाले, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील विविध स्टेशनवरून सुटणाऱ्या २३० ट्रेनसाठी सर्व प्रकारच्या श्रेणींचे बुकींग आजपासून सुरू झाले. IRCTCच्या वेबसाइटवरून प्रवाशांना ऑनलाइन बुकींग करता येणार आहे. तसंच रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर जाऊनही तिकीट काढता येणार आहे. याचा शेकडो लाभ प्रवाशांनी घेतला असून आतापर्यंत १३ लाख तिकीटांचे बुकींग झाले आहे. रेल्वेने गुरुवारी बुकींग सुरू केल्यावर तासाभरातच १.५ लाख तिकीटांचे बुकींग झाले होते. तर चार तासांत ४ लाख तिकीट बुक झाले होते.

दरम्यान, भारतीय रेल्वेने प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पंतप्रधान मोदींनी वाहिली पाकिस्तानच्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली 

नवी दिल्ली । पाकिस्तान मध्ये आज एक विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये बरीच जीवित आणि वित्त हानी झाली आहे. काराचीजवळ झालेल्या या अपघातामुळे पाकिस्तान अतिव दुःखात आहे. त्यांच्या या दुःखाचे सांत्वन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून पाकिस्तानवर कोसळलेल्या दुःखाचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हांला संवेदना आहेत. तसेच जखमींचे आरोग्य लवकर सुधारो अशा प्रार्थना आहेत. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हण्टले आहे. 

आज दुपारी पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात मॉडेल कॉलनी येथे हे विमान कोसळले आहे.या विमानात एकूण ९९ लोक होते यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद होते.  

दरम्यान पाकिस्तानातील कराची हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे तसेच जिना आतंरराष्ट्रीय विमानतळ हे नेहमी गजबलेले असते. कोरोनाच्या संक्रमणामुळे पाकिस्तानात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठवल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. एअरक्राफ्ट क्रश रेकॉर्ड या संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तान मध्ये ८० विमान दुर्घटना झाल्या आहेत. २८ जुलै २०१० आणि २० एप्रिल २०१२ च्या अपघातानंतरचा हा मोठा अपघात असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1263815469145788416  

‘त्या’ मुलांना पक्षाचा झेंडा घेऊन भर उन्हात उभं केल्याने आदित्य ठाकरे भाजपवर संतापले

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. यावर महाविकासआघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत भाजपवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं कि, “हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात केलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. करोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. महाविकासआघाडी सत्तेत आल्यानंतर कोरोनाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं. त्यापासून आता राज्याला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. राज्यात वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि मृत्यू यामुळे भाजप आंदोलन करून सरकारला घेरण्याचा प्रयन्त करत आहे. सरकारवर अपयशी ठरत असल्याची वांरवांर टीका होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेटाळून लावत संपूर्ण राज्य कोरोनाचा मुकाबला करत आहे. आपापल्या परीनं जमेल तसं योगदान राज्यातील प्रत्येक नागरिक देत आहे. अशावेळी भाजप आंदोलन करून कोरोनाच्या लढाईत दिवसरात्र काम करणाऱ्या योध्यांचा अपमान करत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्याचं म्हणणं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे. लोक शेकडो किमी पायी चालत आहेत. या स्थलांतरित कामगारांसाठी सरकारने काहीही केलं नाही, असं सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या.

कामगारांना त्यांच्या घरी जाऊ द्या. सगळ्यांच्या खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे, पण सरकारने ते केलं नाही, असा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. तसंच अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असं या केंद्र सरकारला वाटलं नाही. यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयांच्या शक्ती आपल्याकडे घेतल्याची टीकाही सोनिया गांधींनी यावेळी केली आहे.

काही भाजपशासित राज्यात कामगार कायद्यात बदल केले गेले आहेत. वास्तविक या कायद्यावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे होती, पण सरकारने ही चर्चा केली नाही. कामगार कायद्यात बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध राहील, असं सोनिया गांधी म्हणाल्या. देशाचा जीडीपी निगेटिव्हमध्ये जाणार आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे, यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असं वक्तव्य सोनिया गांधींनी बैठकीत केलं. अम्फान चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित
सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, स्टालिन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थिती लावली. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून, संजय राऊत सामना कार्यालयातून आणि शरद पवार पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमधून बसले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

.. तेव्हा का काळ्या चड्ड्या घालून आंदोलन केलं नाही? संजय राऊतांचा भाजपला बोचरा सवाल

मुंबई । कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करत आहे. भाजपचे नेते काळे झेंडे घेऊन राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता भाजपच्या या आंदोलनावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे फक्त भाजप नेत्यांचं आंदोलन होतं. जनता यात सामील झाली नाही, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत.

संजय राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांनी भाजपला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून घेरलं. संजय राऊत म्हणाले, ‘आंदोलनचं करायचं होतं तर मग भाजपने मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मोदी सरकारनं गुजरातला हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला पाहिजे होते,’ असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, भाजपचं आंदोलन म्हणजे डोमकावळ्याची फडफड, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. सामनाच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ‘दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? सत्तेची फळं खायची,त्याच झाडाची मुळं खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा!’, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं. आशिष शेलार यांच्या वक्तव्यालाही सडेतोड उत्तर संजय राऊत यांनी दिलं. भाजपचं आंदोलन अपयशी ठरल्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याने ते टीका करत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड शहर १०० % कोरोनमुक्त; तालुक्याची लढाई अद्याप सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कराड शहरातील सर्व कोरोना बाधित रुग्ण आता बरे झाले असून कराड शहर १०० % कोरोनमुक्त झाले असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र कराड तालुक्याची लढाई अद्याप सुरु आहे.

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कराड मध्ये 89 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर कराड पाटण तालुक्यात आतापर्यंत एकुण 121 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कराड तालुक्यात आता 32 कोरोना अॅकटिव पेशंटवर उपचार सुरु आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पुण्यातील मार्केट यार्ड सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

पुणे । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार प्रशासकांनी यावर विचार करून निर्णय घेऊन सोमवार पासून बाजार सुरु करू असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २५ मेला बाजार सुरु करा असा आदेश दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद राहता कामा नयेत अशा सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तातडीने बाजार पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले. बाजार समितीच्या प्रशासकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाजार बंद ठेवला असून आणखी दोन दिवस बाजार बंद ठेवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. शनिवारी बैठक घेऊन सोमवारपासून बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

दरम्यान भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. यामुळेच घाबरून येथील प्रशासनाने बाजार बंद ठेवला होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट आदेश आल्याने त्यांना सोमवारपासून बाजार पुन्हा सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून भुसार बाजार सुरु होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळून बाजार उघडला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दाट रहिवाशी वस्तीत कोसळलं पाकिस्तानी प्रवासी विमान; कराची जवळील घटना

वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विमान कोसळले असता धुराचे लोट सर्वदूर पसरल्याचे दिसून आले.

Pakistan Lahore-Karachi plane crashes, photos and videos show ...

कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात मॉडेल कॉलनी येथे हे विमान कोसळले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून काही प्रमाणात भौतिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या विमानात एकूण ९९ लोक होते यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद होते. नेमकी जीवितहानी किती झाली आहे हे अद्याप समजले नाही. आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहे. परिसरातील गाड्या जळाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. पाःकिस्तानातील सैन्याचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. घटनास्थळी अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमही पाठविण्यात आली आहे.

 

दरम्यान पाकिस्तानातील कराची हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे तसेच जिना आतंरराष्ट्रीय विमानतळ हे नेहमी गजबलेले असते. कोरोनाच्या संक्रमणामुळे पाकिस्तानात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठवल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. एअरक्राफ्ट क्रश रेकॉर्ड या संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तान मध्ये ८० विमान दुर्घटना झाल्या आहेत. २८ जुलै २०१० आणि २० एप्रिल २०१२ च्या अपघातानंतरचा हा मोठा अपघात असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.