Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5765

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष चुकीची माहिती पसरवत असल्याची तसेच पीएम केअर फंडाच्या बाबतील काँग्रेस पक्ष घेत असल्याच्या भूमिकेबद्दल तक्रार केली आहे.

११ मे रोजी काँग्रेस ने पीएम केअर फंडाबाबत ट्विट केले होते. या ट्विट द्वारे त्यांनी केंद्र सरकार वर चुकीचे आरोप केले असल्याचे या वकिलांचे म्हणणे आहे. काँग्रेस ने भाजपा ला पीएम केअर फंडाच्या तपशीलाची मागणी केली होती. तसेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस चे सरकार आहे अशा राज्यांमध्ये भाजपा भेदभाव करत असल्याचे आरोप काँग्रेस ने केले आहेत. हा मुद्दा अनेकदा काँग्रेस ने धरून ठेवला आहे. भारतीय दंड कलम १५३ आणि ५०५ द्वारे भाजपा वर चुकीचे आरोप करण्याची एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर ही एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्यांची बैठक होऊनही केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचा मुद्दा काँग्रेस कडून उठवला गेला होता. भाजपा च्या अनेक निर्णयाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कोरोना संकटकाळातही आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सात वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खुन; शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्रीकांत पिंगळे, पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पथकासह धाव घेतली. श्वान पथकाला आणि फॉरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण केले. एका सात वर्षीय चिमुरडीचा खून झाल्याच्या घटनेने तुंग गाव हादरून गेले आहे.

तुंग गावापासून एक किलोमीटर अंतरावर विठलाईनगर ही चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीतील पहिलीत शिकणारी सात वर्षाची चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानातून खायला आणायला जातो म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री उशिर झाला तरी घरी परतली नाही. त्यामुळे आई-वाडीलांसह परिसरातील ग्रामस्थ तिचा शोध घेऊ लागले. रात्री आठच्या सुमारास वसाहतीमध्ये तिचा शोध सुरू झाला. परिसरातील नागरिक देखील शोधकार्यात गुंतले. जवळच्या शेतात देखील शोध घेतला. तरी देखील ती कोठे सापडली नाही. उशिरा शोधकार्य थांबवले.

आज सकाळी पुन्हा चिमुरडीचा शोध सुरू केला. तेव्हा गावातील वासू पाटील यांच्या ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह दिसला. ग्रामस्थांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकासह फॉरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक देखील तातडीने घटनास्थळी आले. ऊसाच्या शेतात चिमुरडीचा मृतदेह पडला होता. प्राथमिक तपासात तिचा लेगिन्सने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच डोक्यात एक छोटीसी जखम आहे. श्वान पथकाच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दंडीले, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे ही घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान धरणग्रस्तांच्या वसाहतीतील चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पसरताच नागरिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी गर्दी हटवून तपासकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले असले तरी लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पहिलीत शिकणाऱ्या एका सात वर्षीय चिमुरडीच्या खुनाच्या घटनेनं गावात मात्र खळबळ उडाली
आहे. आपल्या सात वर्षीय मुलीच्या खुनाची घटना उघडकीस येताच कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे रोजी काँग्रेस पक्षाने खोटे दावे करत केंद्र सरकारवर खोटे आरोप केले गेले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित काही आरोप केले होते. या आरोपांचा उल्लेख करत हे आरोप चुकीचे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३, ५०५ अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘पीएम केअर्स ‘ फंडाबाबत काय म्हणाली होती काँग्रेस
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केअर फंड अंतर्गत जमा होणाऱ्या निधीच्या पारदर्शकतेवर प्रश्न केला होता. या फंड अंतर्गत किती रक्कम जमा झाली आणि किती खर्च केली याबाबत मोदी सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसनं केली होती. पंतप्रधान केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणीही सतत काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्द्यावर सतत टीका केली जात आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेसच्या वतीने पत्रही लिहिले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पुण्यातील ‘हि’ महाविद्यालये १ जून पासूनच होणार सुरु

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २ महिन्यापासून संचारबंदी सुरु आहे. विषाणूचा वाढत संसर्ग पाहता यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट पासून करण्याचे नियोजन होते. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या संस्थेची सर्व महाविद्यालये १ जून पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची सुरुवात बुधवारपासून झाली असल्याची  माहिती सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी दिली आहे. ही माहिती देण्यासाठी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती.

कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. स्थिती कधी आटोक्यात येईल हे सांगता येत नाही म्हणूनच संस्थेचे प्रायमरी पासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु होते. पण सध्याची स्थिती पाहता महाविद्यालयीन वर्ग ऑनलाईन पद्धतीने नियमित सुरु केले जातील. यामध्ये संस्थेच्या पुण्यासहीत मुंबई आणि सांगली येथील कला,वाणिज्य, विज्ञान, विधी, व्यवस्थापन, नर्सिंग अशा सर्व शाखांचा आणि महाविद्यालयांचा समावेश असेल याची माहिती कुंटे यांनी दिली.

आतापर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरते ऑनलाईन वर्ग घेतले गेले आहेत. पण लवकर महाविद्यालये सुरु होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे आता हे वर्ग नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दोन महिने अधिक फायदा होणार आहे. सर्व विषयांचे वर्ग घेतले जाणार असून एका विषयाची लेक्चर १ तास असेल अशी माहिती ऍड. नितीन आपटे यांनी दिली. यासाठी मायक्रोसॉफ्ट चे लायसन्स घेतले असून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या ऑनलाईन साधनांचा वापर करण्यात येणार आहे. या परिषदेत विद्यार्थ्यांनी आणखी कोणत्या उपक्रमात सहभाग घेतला याचीही माहिती देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रामजन्मभूमी परिसरात सापडले मंदिराचे अवशेष; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राम जन्मभूमी अयोध्या येथे सध्या पूर्वीच्या गर्भगृह स्थळाचे सपाटीकरण करून नवे भव्य राममंदिर बांधण्याची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान कपड्याचे मंदिर हटवून, हळूहळू पूर्वतयारी २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात येत आहे. दिनांक ११ मे पासून सर्व शासकीय परवानगीसह खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती. या खोदकामात जमिनीमध्ये काही पुरातन दगड सापडले आहेत. हे दगड म्हणजे मंदिराचे अवशेष सापडले आहेत अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे महासचिव चंपत रे यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करीत हे काम सुरु आहे. सामाजिक अलगाव आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. काम सुरु करण्यापूर्वी सर्व कामगारांचे शारीरिक तापमान देखील तपासण्यात आले होते.  या कामासाठी ३ क्रेन, १ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि १० मजूर यांना तैनात करण्यात आले आहे. दर्शनरांगांसाठी लावण्यात आलेले बॅरिकेटिंग हटविण्याचे तसेच सूत्रबद्ध रित्या सर्व सपाटीकरण करण्याचे काम सुरु आहे. हे सर्व सपाटीकरण करून झाल्यावर मंदिर बांधकामाचा मुहूर्त केला जाईल. मात्र हे सर्व देशाच्या स्थितीवर अवलंबून असल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

११ मे पासून सुरु झालेल्या या खोदकामात अनेक प्राचीन अवशेष सापडले आहेत. यामध्ये मंदिराचे खांब, विविध नक्षीदार दगड, प्राचीन कुआँ मंदिराची चौकट, ७ काळे दगडाचे खांब, ८ लाल मातीच्या दगडाचे खांब, मेहराब चे दगड, देवी-देवतांच्या खंडित मूर्ती, पुष्प, नक्षीदार खांब, कलश आणि शिवलिंग सापडले आहेत. या प्राचीन अवशेषांचे जतन करण्याचाही ट्रस्ट विचार करत आहे. दरम्यान मंदिरनिर्मितीच्या प्राथमिक तयारीचे काम पूर्णतः शासकीय नियमांचे पालन करत सुरु असल्याची माहिती महासचिवांनी दिली आहे.

तडाखा! अम्फानमुळे कोलकाता विमानतळाचे मोठं नुकसान, रनवे पाण्याखाली

कोलकाता । अम्फान वादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना बसला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावर या वादळाचा मोठा परिणाम दिसतोय. 6 तासांच्या अम्फान वादळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळावर पाणी भरलेलं आहे. रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाच्या दृशांवरून काही विमानांचे नुकसान झाले आहे. अम्फानमुळे विमानतळावरील सर्व कामकाज आज पहाटे 5 वाजेपर्यंत बंद होती, जी अजूनही बंद आहेत.

कोलकाता विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 25 मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहेत. वंदे भारत मिशनला जाण्यासाठी फक्त मालवाहतूक आणि उड्डाणे सुरू होती. त्यांनाही आता थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंगालमधील समुद्रकिनार्‍यावर धडक देताना अम्फानच्या वादळाची गती ताशी 180 किमीपेक्षा अधिक होती. ताशी 160 ते 180 किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे 10 ते 12 जण ठार झाल्याची माहिती आहे. कित्येक तास कोलकाता शहरात ताशी 130 किमी वेगाने वारे वाहत राहिले. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना, मिदनापूर आणि कोलकाता येथे अम्फानचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. वादळाचा तडाखा इतका होता की उभे राहणेही शक्य नव्हते.

पश्चिम बंगालमधील वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असे म्हणत आहेत की कमीतकमी 10-12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू झाडे पडल्याने झाले आहेत. त्याचवेळी ओडिशामध्ये ३ लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही राज्यात मदत व बचावकार्य सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अनुराग कश्यपचा मोठा निर्णय, कोरोना किटच्या मदतीसाठी फिल्मफेअर अवॉर्डचा करणार लिलाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होते आहे. सध्या आरोग्य विषयक गोष्टींची कमतरता देखील जाणवते आहे. त्यामुळे देशातील कोरोना टेस्टिंग किटच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बॉलीवूड दिगदर्शक अनुराग कश्यपने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यप आता आपल्या फिल्मफेअरच्या ट्रॉफीचा लिलाव करणार आहे आणि ज्यातून मिळाणारे पैसे तो कोरोना टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. हॉलिवूडमध्येही यापूर्वी असे केले गेले होते पण बॉलिवूडमध्ये अनुरागचा हा उपक्रम कॊतुकाचा विषय ठरतो आहे. अनुराग कश्यपसमवेत वरुण ग्रोव्हरनेही त्याचा पुरस्काराचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुराग कश्यप का ट्वीट

अनुराग कश्यपने एका ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘त्याच्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटासाठी मिळालेल्या सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर समीक्षक पुरस्काराच्या ट्रॉफीचा लिलाव करायचा आहे आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला ही ट्रॉफी मिळणार आहे. एका महिन्यात १३,४४,००० रुपयांचा निधी गोळा करण्याचा त्याचा उद्देश आहे.

वरुण ग्रोवर का ट्वीट

 कोरोना टेस्टिंग किटची ही किंमत १.२ लाख + जीएसटी अशी आहे. सध्याच्या परिस्थितीत त्याचे लक्ष्य असे आहे की कमीतकमी ते ५ टेस्टिंग किट खरेदी करू शकतील, १०० लोकांची एका किटद्वारे चाचणी करता येईल. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेल्या किटमधून किमान ५०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ही १ लाखांच्या पुढे गेली आहे तसेच ही संख्या सातत्याने वाढतच आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटलांनी हाणला चंद्रकांतदादांना आंदोलनांवरून टोला

मुंबई । राज्यात कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली असून त्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापू लागलं आहे. या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं असून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरुद्ध आंदोलनाची हाक दिल्यानंतर या आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करणारं एक पत्रक जारी केलं आहे. आंदोलन करताना ‘दो गज की दूरी’ राखा असे सांगताना आंदोलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याबाबतही खास सल्ला पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. याव्यतिरिक्त या पत्रकात भाजप कार्यकर्त्यांनी कोणत्या घोषणा द्यायच्या याबाबत घोषणांसहित नमूद केलं आहे. दरम्यान, आता या घोषणांवरूनच हे पत्रक आता वादाचं कारण बनत चाललं आहे. भाजपने प्रसिद्ध केलेलं हे पत्रक जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. या पत्रकातील आक्षेपार्ह बाबी जयंत पाटील यांनी अधोरेखित केल्या आहेत.

”चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्र धर्म’ पाळण्याचे आदेश दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!’ असा टोलाही पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

ह्याचं ‘त्या’ पत्रकातील घोषणा
आंदोलनादरम्यान कोणत्या घोषणा द्यायच्या, हे सांगताना, ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’ ही घोषणा मुख्यत्वे द्या, असे आदेश चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात’, ‘उद्धव मात्र भाषण ठोकतो डरोना डरोना पण रोखता येईना तुला करोना करोना’, ‘हातात वाडगे-केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट’ अशी घोषणांची यादी पाटील यांनी पत्रकात दिली आहे. आंदोलन करताना ‘दो गज की दूरी’ राखा असे सांगताना आंदोलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याबाबतही खास सल्ला पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, पत्रकातील घोषणांवरून जयंत पाटील यांनी हे आंदोलन महाराष्ट्र बचाव पेक्षा केवळ राजकारणसाठी करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आंदोलनाच्या पत्रकावर आक्षेप घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

उपाशी जनतेची स्वस्त धान्य दुकान चालकांकडून लूटमार; पावत्या न देता दरपत्रकाशिवाय कारभार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाच्या संकट काळात लोकांना धान्य मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्यामाध्यमातून हे धान्य पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र या स्वस्त धान्य दुकान चालकांनी संकटकाळात सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. याबाबतचा एकप्रकार सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंडमध्ये समोर आला आहे.

लाॅकडाऊनमुळ लोकांच उत्पन्न थांबल आहे. त्यात लोकांची अडचण होऊ नये म्हणून शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्यामाध्यमातून लोकांपर्यंत कमी दरात धान्य पोहचावे म्हणून योजना आखल्या आहेत, मात्र या संकटात लोकांची फसवणूक करून स्वस्त धान्य दुकानदार फायदा घेत असल्याचंसमोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंड येथील विकास सेवा सोसायटी क्रमांक 2 यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून लोकांना पावती देण्यात येत नसल्याच उघडकीस आले आहे. त्यामुळे नेमकं धान्य किती रूपयाला विकले जात आहे हेच लोकांना कळत नाही, पावती देत नसल्याबाबत स्वतः दुकानातील कर्मचारीच कबुली देत आहे.

तर धान्य किती आले आहे. किती लोकांना द्यायचा आहे याबाबत माहिती देणारा कोणताही फलक लावण्यात येत नाही. सध्या लाॅकडाऊनमुळे सोशल डिस्टसिंग पाळावं अस आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नियमही करण्यात आले आहेत, मात्र ओंडच्या या दुकानचालकांनी तेही पाळण्याची तसदी घेतली नाही, दुकानासमोर लोकांनी किती अंतरावर उभं राहवं यासाठी चिन्ह नाहीत. या दुकानचालकांवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारयांकडे तक्रार केली आहे.

सध्या लोकांना या धान्याची खूप गरज आहे. अनेक गोरगरिबांना या दुकानांचाच आधार आहे, मात्र अनेक दुकानदार गर्दीत काळा पैसा चालवून स्वतः चे खिसे भरत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Satara

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/244614643475875/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लोकं आमच्यावर थुंकतात; पश्चिम बंगालच्या ३०० नर्स नोकरी सोडून मणिपूरला माघारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाताच्या अस्टपल्समध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३०० नर्सेसनी लोकांच्या वागणुकीमुळे दुखावल्यामुळे राजीनामा दिला आहे. आता त्या सर्व नर्सेस मणिपूरला रवाना झाल्या आहेत. आणखीही काही नर्सेस आता कोलकाता सोडण्याच्या तयारीत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नर्सेसनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोलकातास्थित मणिपूर भवनचे उप निवासी आयुक्त जे.एस. जोयूरिता यांनी बुधवारी ही माहिती दिली.

नर्सेसना कोलकाता सोडायचे आहे
वृत्तसंसंस्था एएनआयच्या माहितीनुसार त्या म्हणाल्या की, ‘उद्या जवळपास ६० नर्सेस कोलकाता सोडतील. लोकं आम्हाला कॉल करीत आहेत आणि आम्ही मणिपूरला परत यावे अशी त्यांची इच्छा आहे. ‘ यापूर्वी असे सांगितले गेले होते की, कोलकाता रुग्णालयांमधील १८५ नर्सेसनी आपली नोकरी सोडून इम्फाळला परत गेल्या आहेत.

भेदभाव केल्याचा आरोप
क्रिस्टिला नावाची नर्स म्हणाली, ‘आम्हांला नोकरी सोडल्याचा आनंद नाही, मात्र कामाच्या ठिकाणी आमच्यात भेदभाव केला जातो. काहीवेळा लोक आमच्याबद्दल वर्णद्वेषी उद्गार काढतात. रुग्णालयांमध्ये पीपीई किटची कमतरता आहे. आपण जिथेही जाऊ तिथे लोक आम्हाला प्रश्न विचारू लागतात.

कोलकाता आहे कोविड -१९ च्या जाळ्यात
पश्चिम बंगालमधील कोविड -१९च्या स्थितीबद्दल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या राज्यात संसर्ग होण्याची २९९६ घटना घडल्या आहेत. यातील १०७४ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत तर २५० जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत देशात कोविड -१९ च्या ११२२५९ घटना घडल्या आहेत. यापैकी ४५३०० लोक उपचारानंतर बरे झाले आहेत तर ३४३५ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे.

अलिकडच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांवर झाला आहे हल्ला
येथील कोविड -१९ शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यां विरुद्ध गेल्या काही दिवसांत अनेक गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत तर अनेक ठिकाणी पोलिसांनाही लक्ष्य केले गेले आहे. हे झालेले हल्ले पाहता राज्य सरकारानेही कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कोरोना वॉरियर्सच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल केला आहे. रासुका अँड गँगस्टर कायद्यांतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.