Monday, December 22, 2025
Home Blog Page 5837

जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – हिंदूंना आपल्या धर्माबद्दल जागरुक करणारं चिंतन

पुस्तकांच्या दुनियेत | ऋषिकेश गावडे

लाहोरच्या जात-पात तोडक मंडळ नावाच्या संस्थेने सन १९३५ मधे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वार्षिक संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी निमंत्रित केलं. एका सवर्ण हिंदू संघटनेनं आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. आंबेडकर म्हणतात की सहसा ते सवर्ण हिंदू नेतृत्व करत असलेल्या चळवळीत सहभागी होत नसत. कारण सामाजिक सुधारणांबद्दलचा त्यांचा आणि अशा चळवळींचा दृष्टीकोन खूप भिन्न होता. तरीही जात-पात तोडक मंडळाच्या आग्रहाखातर त्यांनी हे निमंत्रण स्विकारलं. त्यानंतर या संमेलनासाठीचं अध्यक्षीय भाषण तयार करून त्याच्या एक हजार प्रती छापूनही झाल्या. पण ऐनवेळी या मंडळाकडून आंबेडकरांच्या भाषणातील काही भागावर हरकत घेण्यात आली. आंबेडकर आपले भाषण बदलण्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे हे संमेलनच रद्द करण्यात आलं. परंतु आधीच छापून झालेल्या त्या भाषणाच्या प्रती आंबेडकरांनी स्वतः प्रकाशित करायचं ठरवलं. आंबेडकरांचं हे कधीही न होवू शकलेलं भाषण म्हणजेच ‘Annihilation of Caste’ अर्थात जातीनिर्मुलन. फक्त पन्नास पानांचं असलेलं हे पुस्तक जातीव्यवस्थेवरचं महत्त्वाचं भाष्य मानलं जातं. 

एखाद्या कुशल सर्जनने आजारी शरीराच्या रोगाचं अचूक आणि बेधडक निदान करावं त्याप्रमाणे भीमराव आंबेडकरांनी हिंदु समाजव्यवस्थेची समीक्षा या भाषणात मांडली आहे. त्यांच्या या मांडणीत कुठेच जातीव्यवस्था संपावी म्हणून केलेल्या आर्जवांचा सुर ऐकू येत नाही. ते रोखठोकपणे या व्यवस्थेत काय चुकीचं आहे ते सांगतात. संपुर्ण व्यवस्थाच कशी या दोषांची शिकार ठरली आहे हे ते दाखवून देतात. आणि हे कसं सुधारता येईल याचा मार्ग सांगून पुढे निघून जातात. 

जातीव्यवस्थेचे दुष्परिणाम या पुस्तकात बरेच विस्तृतपणे सांगितले आहेत. पण बाबासाहेब फक्त वरवरचे दुष्परिणाम सांगून थांबत नाहीत तर या व्यवस्थेची संरचनात्मक टिकाही त्यांनी या भाषणात केली आहे. जातीव्यवस्थेमुळे फक्त एकाच वर्गाचं नुकसान झालंय असं नाही तर संपूर्ण हिंदु समाजव्यवस्थाच जातीव्यवस्थेने कशी कमकुवत करून टाकलीय हे ते दाखवून देतात. “जातीव्यवस्थेने हिंदूंचे खच्चीकरण करून त्यांना पुर्णपणे विस्कळीत करून टाकलं आहे” असंही ते म्हणतात. 

हिंदु धर्मातील प्रत्येक जातीचे हितसंबंध वेगळे आहेत. हे हितसंबंध बऱ्याच वेळा परस्परविरोधी असतात. त्यामुळे ते सर्व जातींना एकत्र येण्यापासून अडवून धरतात. जातीव्यवस्थेच्या या वैशिष्ट्यामुळे प्रत्येक जातीमधे इतर जातींबद्दल अविश्वास आणि असुरक्षितता दिसून येते. या दुरावस्थेचं कारण बाबासाहेब हिंदु समाज ज्या सामुहिक तत्वांवर उभा आहे त्या तत्वांमधे शोधतात. व्यक्तीच्या सद्गुणांना प्रोत्साहन देण्याऐवजी ही समाजव्यवस्था एका ठराविक वर्गाचे हितसंबंध जपणे महत्वाचं मानते. त्यामुळे ती प्रभावहीन झाली आहे असं ते म्हणतात. ही व्यवस्था हिंदुंना संघटीत होवू देत नाही, त्यामुळे लोक एक सक्षम समाज म्हणून किंवा एक राष्ट्र म्हणून एकत्र येण्यास असमर्थ ठरतात.

पुस्तकाच्या सुरुवातीला सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा या पारंपारिक वादाचा परामर्श आंबेडकरांनी घेतला आहे. आधी सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय सुधारणा टिकू शकणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. 

जातीव्यवस्थेबद्दल समाजवादी विचारधारेच्या मर्यादाही सुरूवातीलाच बाबासाहेबांनी स्पष्ट केल्या आहेत. “समाजवाद्यांना वाटते की संपत्ती हाच सत्तेचा एकमेव उगम स्त्रोत आहे. परंतु भारतीय समाज या बाबतीत युरोपियन समाजापेक्षा वेगळा आहे. इथे सत्तेची अनेक वेगवेगळी साधने दिसून येतात” असं ते म्हणतात. त्यांच्या मतानुसार समाजवादी चळवळ लोकांच्या मनावरील धर्माचा प्रभाव लक्षात घेत नाही. 

त्या कळात आर्य समाजाने जातीव्यवस्थेला पर्याय म्हणून “चातुर्वर्ण्य व्यवस्था” सुचवली होती. हे चार वर्ण व्यक्तीच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुणांवरून ठरतील असं आर्य समाज म्हणत असे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या भाषणात या पर्यायाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. हे करताना त्यांनी ग्रीक विचारवंत प्लेटो याच्या न्यायाच्या संकल्पनेची टीका मांडली आहे. 
जातीव्यवस्था नष्ट करून तिच्या जागी “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित असलेला समाज निर्माण करणे हेच माझ्या दृष्टीने आदर्श असेल” असं बाबासाहेब म्हणतात. त्यांनी या तीनही मुल्यांचा त्यांना अपेक्षित असलेला अर्थ सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. 

जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह हे उपाय जरी उपयोगाचे असले तरी “जातीव्यवस्थेचे निर्मुलन करण्याची खरी चावी शास्त्रांचा अधिकार नाकरणे ही आहे” असं ते म्हणतात. जातीव्यवस्था ही एक मानसिक अवस्था आहे आणि ती धर्माशी जोडलेली आहे. त्यामुळे ती नष्ट करायची असेल तर ‘तुमच्या धर्मात काहीतरी चुकीचं आहे हे हिंदूंना सांगण्याचं धाडस तुम्हाला करावं लागेल’ असं ते म्हणतात. 

भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी ‘तत्व’ (principles) आणि ‘नियम’ (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र आणि स्मृतींमधे अडकलेला हिंदु धर्म हा एक नियमांचं गाठोडं बनला आहे त्यामुळे त्याला या स्वरूपातून मुक्त करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. हिंदु धर्मामधे कशा प्रकारे सुधारणा करणं शक्य आहे याचा एक कार्यक्रमही त्यांनी इथे दिला आहे. एका सामूहिक परिक्षेद्वारे धर्मगुरूंची नेमणूक करावी हा या कार्यक्रमातला एक नाविन्यपूर्ण भाग आहे.

भाषणाच्या शेवटी, “माझ्यापुरतं विचाराल तर मला जातीनिर्मुलनाचा कार्यक्रम अशक्यप्राय वाटतो” अशी वास्तववादी आणि आव्हानाची खरी जाणीव करून देणारी भूमिका आंबेडकर मांडतात. त्याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. हिंदु धर्म सोडून जाण्याच्या आपल्या संकल्पाचा उल्लेखही आंबेडकर जाता जाता या भाषणात करतात. 

हे भाषण १९३६ मधे पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं. त्यानंतर साधारण १५ वर्षांनी जेव्हा स्वतंत्र भारतातचं संविधान स्विकारलं गेलं तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांना संविधानात मूलभूत स्थान देण्यात आलं. बाबासाहेबांना या संविधानाचं शिल्पकार मानलं जातं. या निमित्ताने त्यांना आपल्या मनातील आदर्श समाजाची पायाभरणी करण्याची संधी मिळाली असं म्हणता येईल. आज जवळपास ८५ वर्षांनंतर या भाषणातील काही संदर्भांमधे बदल झालेला जाणवू शकतो. परंतु जातीव्यवस्था आजही तीचं अस्तित्व राखून आहे. उलट स्वातंत्र्यानंतर मतांच्या राजकारणामुळे जातीव्यवस्था जास्तच बळकट अशी मांडणी काही राजकीय विचारवंत करतात. त्यामुळे हे पुस्तक आजही तितकंच उपयुक्त आहे.

या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमधे महात्मा गांधी यांनी या भाषणावर ‘यंग इंडिया’ मधे लिहिलेल्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबत बाबासाहेबांनी गांधीजींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर दिलेलं उत्तरही आहे. या दोन महान नेत्यांमधील थेट वाद – संवाद वाचणं माहिती देणारं त्याचबरोबर मनोरंजकही आहे. 

(टीप: या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती कोलंबिया विद्यापिठाच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे.)

ऋषिकेश गावडे हे मुक्त पत्रकार आहेत. त्यांना विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण करण्याची आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9890894612

कदाचीत HIV प्रमाणे कोरोनावरही वॅक्सिन बनू शकत नाही; एक्सपर्टचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संक्रमणासह झगडत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या इलाजासाठी लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.काही ठिकाणी या लसीची चाचणीही सुरू झाली आहे.परंतु अद्यापही प्रभावी अशी कोणतीही लस सापडलेली नाहीये. अशा परिस्थितीत कोरोनावर लस सापडली नाही तर काय होईल असा प्रश्न पडतो.

सर्वात वाईट परिस्थितीत जर लस सापडली नाही तर काय होईल? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सीएनएनच्या अहवालानुसार तज्ञ म्हणतात की कोरोनावर जर लस उपलब्ध नसेल तर आपल्या समाजाला कोरोनाच्या संसर्गासह जगणे शिकावे लागेल.

जर लस सापडली नाही तर तुम्हाला कोरोनासह रहायला शिकावे लागेल
अशा परिस्थितीत शहरे हळूहळू खुली केली जातील,थोडेसे स्वातंत्र्य मिळु शकेल पण पूर्णपणे नाही.कोरोनावर लस उपलब्ध नसल्यास कोरोनाची चाचणी आणि शारीरिक ट्रेसिंग हे आपल्या आयुष्याचा एक भागच बनतील.अनेक देशांमध्ये सेल्फ आइसोलेशन देखील जीवनाचा एक भाग असेल. जर यावर लस उपलब्ध नसेल तर त्यावरचे उपचार शोधावे लागतील.परंतु नंतर दरवर्षी या साथीच्या रोगाचा एक युग येईल आणि यामुळे जगभरात कोट्यावधी लोक मरण पावतील.

बरेच देश या लसीच्या चाचण्यामध्ये गुंतले आहेत.परंतु तज्ञ सांगत आहेत की इतक्या लवकर काहीही होणार नाही. सीएनएनशी बोलताना लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्रोफेसर डॉ. डेव्हिड नाबरो म्हणतात की अद्यापही असे बरेच व्हायरस आहेत,की ज्यांच्या लस आपल्याला सापडलेल्या नाहीत. म्हणूनच,यावर लस उपलब्ध होईल असे आपण म्हणू शकत नाही.आणि ती सापडल्यास त्याला अनेक स्तरांच्या चाचण्या पार कराव्या लागतील.

काही तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूची लस लवकरच सापडेल. कारण, एचआयव्ही आणि मलेरिया प्रमाणेच,त्याचे विषाणू हे जास्त वेगाने बदलत नाहीत.

एचआयव्ही लस अद्याप सापडली नाही
मात्र,यापूर्वीही असे झाले आहे की एखाद्या व्हायरसवरची कोणतीही लस सापडली नव्हती.अशाच एका घटनेत १९८४ मध्ये अमेरिकेचे आरोग्यमंत्री मार्गारेट हेकलर यांनी वॉशिंग्टनच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की वैज्ञानिकांनी या व्हायरसचा एक नवीन प्रकार ओळखला आहे. नंतर त्या विषाणूला एचआयव्ही हे नाव पडले.

त्यावेळी असे म्हटले होते की येत्या दोन वर्षांत या विषाणूवरची लस तयार होईल. परंतु सुमारे दोन दशकांनंतर आणि सुमारे २० दशलक्ष लोकांच्या मृत्यूनंतरही एचआयव्हीवरची लस सापडली नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विद्यापीठ आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET ) 20 ते 30 जुलै 2020 दरम्यान घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर करून दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजर दिवस (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावे एम.फिल व पी.एचडीचा मौखिकी (vivo) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी संगितले.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.

सीईटी परीक्षेसंदर्भात समिती गठीत
बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असंही उद्य सामंत यांनी संगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला राज्यातील सर्व विद्यापीठांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या आकस्मित निधीतील काही रक्कम आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभारही उदय सामंत यांनी यावेळी मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महिला पत्रकाराची राहत्या घरी आत्महत्या; भिंतीवर लिहिले ‘या’ नेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील एक स्वतंत्र पत्रकार रिझवाना तबस्सुम तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह ताब्यात घेतला.रात्रीच तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रिझवानाने आपल्या खोलीत असलेल्या नोटिस बोर्डवर लिहिले की – ‘शमीम नोमानी जबाबदार आहे.’

कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्थानिक सपा नेते शमीम नोमानी यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. रिजवाना तबस्सुम वाराणसीची रहिवासी होती. ती २५ वर्षांची होती.

२५ वर्षीय रिझवाना तबस्सुमने राहत्या घरीच आत्महत्या केली
वाराणसीचे सीओ सदर अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की,आम्हाला कुटुंबियांनी कळविले. त्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. रिझवानाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा खटला दाखल केला गेला आहे. आरोपींच्या अटकेसाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्थानिक नेते शमीम नोमानी यांच्याविरूद्ध एफआयआर
बातमीदाराच्या म्हणण्यानुसार, रिझवानाच्या कुटूंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनारसच्या लोहटा पोलिस स्टेशनमध्ये स्थानिक नेते शमीम नोमानीविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.तबस्सुम ही तिच्या सहा भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती. गेली कित्येक वर्षे पत्रकारितेमध्ये सक्रिय असलेल्या तबस्सुमने स्वतंत्र पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. खबर लहरीया आणि इतर वृत्तपत्रे यासारख्या वृत्तवाहिन्यांसाठी ती लिहायची. ती प्रिंटसाठीही लिहायची.

वडील म्हणाले – आतून आवाज आला नाही
रिझवानाच्या वडिलांनी सांगितले की,सकाळी त्यांनी मुलीला आवाज दिल्यावर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. जेव्हा आम्हाला शंका आली तेव्हा आम्ही खोलीचा दरवाजा तोडला आणि आत गेलो तेव्हा तिने आत्महत्या केल्याचे पाहिले. तिने शमीम नोमानी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. शमीम नोमानी आमच्याकडे आले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यात 11 वर्षीय मुलासह ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे । महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला तरी अजूनपर्यंत राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहेत. कोरोनाचे केंद्र बनलेल्या पुणे जिल्ह्यात आज मंगळवारी 99 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत एकूण 2हजार202 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे पुण्यात आज 11 वर्षीय मुलासह ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 119 इतकी झाली आहे. मृतांची वाढणारी संख्या प्रशासनाच्या चिंतेत दररोज भर टाकत आहे. पुणे विभागातील पुणे 102, पुणे मनपात 1 हजार 796 तर पिंपरी-चिंचवड मनपामध्ये 120 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. कोरोनामुळे अनेक वसाहती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग अनेकांना होत आहे. त्यात काळजीची बाब म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यातील मृतांची संख्याही आता दिवसेंदिवस वाढ लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी ‘युवा स्पंदन’चा पुढाकार

पुणे प्रतिनिधी | सर्वसामान्य परिस्थिती असो वा कठीण परिस्थिती रिक्षावाले काका कायम सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धावत असतात. ऊन असो वा पावसाळा ते कायम लोकांना आपल्याला कायम वेळेत इच्छित स्थळी पोहोचवत असतात. सध्या कोरोनाच्या कठीण प्रसंगात रिक्षावाल्या काकांची रिक्षा थांबली आहे. सामान्य नागरिकांसह आर्थिक समस्येला या वर्गालासुद्धा मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. ‘रिक्षावाले काका’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील ‘युवा स्पंदन संस्था’ मदतीला धावून आली आहे. पुण्यात स्पंदनकडे नोंदणी केलेल्या शंभरहुन अधिक रिक्षाचालकांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

या कठीण प्रसंगी रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावून जाणं हाच महाराष्ट्रधर्म मानून युवा स्पंदनने हा उपक्रम काही दिवसांपूर्वी सुरू केला आहे. येणाऱ्या काळात अजून काही रिक्षावाल्या काकांच्या खात्यात मदत जमा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं चेतन धोत्रे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून सधन नागरिकांनी ऐच्छिक मदत करावी असं मत धोत्रे यांनी व्यक्त केलं आहे.

अधिक सहकार्यासाठी चेतन धोत्रे 9881288558 आणि प्रशांत पाटील 9637480757 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गर्दी करू नका! आता दारू खरेदीसाठी मिळणार टोकन

मुंबई । राज्यात दारू विक्रीची दुकान सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाली आहे. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या सर्वात दारुच्या दुकानांसमोरील प्रचंड गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग काढला असून, आता टोकन पद्धतीनं राज्यात दारू विक्री केली जाणार आहे. त्यासाठीची नियमावली राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केली आहे.

आता अशी करावी लागेल दारू विक्री
१)दारू विक्री दुकानासमोर ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात यावं. त्यामध्ये किमान ६ फुटाचं अंतर असावं.

२)दारू विक्री सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना मार्किंगमध्ये उभं राहण्याच्या सूचना द्याव्यात.

३)रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा, ज्यामध्ये ग्राहकांचा नंबर, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि मद्याच्या मागणीचा माहिती (ब्रँडचं नाव व किती मागणी) असावी.

४)ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा.

५)अशा पद्धतीनं एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येईल. त्यानंतर दुसऱ्या तासात ५१ ते १०० असे क्रमांक घेण्यात यावे. अशा प्रकारे ८ तासात ४०० लोकांना दारू विक्री केली जाऊ शकते. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगावं. यामुळे गर्दी नियंत्रित करता येईल.

६) दारू विक्री करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं काटेकोटरपणे पालन करण्यात यावं. यासाठी दारू विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.

पाहणीसाठी भरारी पथकाची नेमणूक 

दरम्यान, राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टसिंग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असं विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आलं आहे. गर्दी होणाऱ्या विशिष्ट भागातील पाहणीसाठी भरारी पथक नेमण्यात यावं. त्याचबरोबर उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनीही मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जिल्ह्याबाहेर जाण्याऱ्या व्यक्तीस आरोग्य तपासणी बंधनकारक; परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुुंबरे

देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विविध जिल्ह्यातील कामगार, पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती इतर शहरांप्रमाणे परभणी जिल्ह्यातही अडकले आहेत. आता त्यांना परभणी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. ही आरोग्य तपासणी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणी जावून करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर सध्या नागरीक पासची मागणी करत आहेत. परंतु आरोग्य तपासणी केल्या शिवाय व या प्रमाणपत्रा शिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी नोंदणीकृत डॉक्टर्स, दवाखाने यांचे प्रमाणपत्र ई- पास प्रक्रियेसाठी वैध असेल असेही यावेळी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

त्यामुळे आरोग्य तपासणीची सुविधा परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील साकला प्लॉट, इनायत नगर , खंडोबा बाजार , सय्यद तुराबुल हक़ दरगाह येथील नागरी प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्रात व परभणी शहर महानगरपालिका रुग्णालयात तसेच तालुकास्तरावर, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील संबंधित उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात तर ग्रामस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय आहे. आता मात्र आपण सगळे जण कोरोनाच्या फेज थ्री च्या जवळ पोहोचलो आहोत. त्यामूळे आता पुढील १० दिवस सगळ्यांनी काटेकोर पणे घरातच रहा व कोणत्याही परीस्थीतीमधे घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तू आणायला म्हणुन बाहेर जाल आणि कोरोनाच घरी घेऊन याल. तेव्हा पुढील १० दिवस काळजी घ्या. घरात जे काही असेल त्यावर दिवस काढा असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग आता मोठ्या झपाट्याने पसरत असल्याची बाब तज्ञांकडून समजली आहे. तर येणारे १० दिवस हे अतिशय धोकादायक असून संसर्ग वाढण्यासाठी अनुकूल असल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे. तेव्हा आता प्रत्येक नागरीकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही इतर कारणासाठी बाहेर नीघू नका कारण आता प्रत्येक ठीकानी कोरोना चा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामूळे आपण कोणतीही मग ती जिवनावश्यक वस्तू असो की आणखी काही आणण्यासाठी बाहेर पडाल तर कोरोनाच घरामधे घेऊन येणार इतकी भीषन परीस्थीतीमध्ये आपण सद्या येऊन पोहोचलो आहोत. नेमके काय म्हणालेत ना. बच्चू कडू बघूयात

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2283904541917791

सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणुन घ्या १० ग्राम सोन्याचे आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालेली आहे.मंगळवारी सोने स्वस्त झाले.आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमती या झपाट्याने खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव हा ३३५ रुपयांनी खाली आला आणि बर्‍याच दिवसानंतर सोन्याची किंमत हि १० ग्रॅम साठी ४५,५०० रुपयांवर आली. मंगळवारी सोन्याची किंमत घटून प्रति १० ग्रॅम ४५,४७२ रुपये झाली.

सोने झाले स्वस्त
मंगळवारी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झाली.एमसीएक्सवरील सोन्याचे दर हे प्रति १० ग्रॅम ४५,५२७ रुपयांवर राहिले, तर चांदी ही १३२ रुपयांनी घसरून ४१,११२ रुपये प्रति किलो झाली.आता देशातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीचे सरासरी दर घेणाऱ्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर ५ मे २०२० रोजीच्या सोन्या-चांदीच्या किंमतीवर नजर टाकली तर ९९.९ टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत ही १७० रुपयांनी कमी करण्यात आली.प्रति १० ग्रॅम ते ४५७४३ रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी,९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती या १० ग्रॅम प्रति घसरून ४५५६० रुपयांवर आल्या.याशिवाय ते प्रति किलो ४०७१० रुपये होते.

सोने दहा ग्रॅम ८०००० रुपयांवर जाईल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार सोन्याच्या किंमती यंदा प्रचंड वाढतील.२०२१ पर्यंत सोन्याचे दर हे १० ग्रॅम साठी ८०,००० रुपयांच्या जवळपास असतील. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज तज्ज्ञांच्या मते, सन २०२१ च्या अखेरीस जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे औंस ३००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. जर आपण ही किंमत १० ग्रॅम सोन्यासाठी पाहिली तर याची किंमत ८०,७५३ रुपये इतकी असू शकेल.

सोने ही सुरक्षित गुंतवणूक
सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव येत असतानाच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.या जागतिक पेचप्रसंगी गुंतवणूकदार आपले सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून निवडत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ होणार आहे.लॉकडाऊनमुळे सध्या सराफा बाजार बंद आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.