Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6767

“पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा” – वैंकय्या नायडू

thumbnail 1529661064274
thumbnail 1529661064274

बारामती : उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आज बारामती दौर्यावर आले आहेत. शरद पवारांच्या बारामतीमधे नायडू यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. “पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा आहे” असे वैकय्या नायडू यांनी बारामतीत बोलताना म्हटले आहे. ‘बारामतीचा विकास पाहण्याची माझीच ईच्छा होती’ असेही नायडू म्हणाले आहेत.

आज सकाळी ९ वाजता नायडु यांचे बारामतीमधे आगमन झाले. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नायडू यांनी माळेगाव येथील कृषी विज्ञान केंन्द्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. माजी केंन्द्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतीमधील नविन तंत्रज्ञानाबद्दल नायडू यांना माहीती दिली. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयातील शरद पवारांच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर नायडू यांनी पवार यांच्या माळेगाव येथील घरी सहभोजन केले. बारामतीचा दौरा आटपुन दुपारी वैकय्या नायडू विशेष विमानाने पुण्याकडे रवाना होणार असल्याचे समजत आहे.

“सर, तुम्ही जाऊ नका..”,म्हणत विद्यर्थ्यांनी ठेवले शिक्षकाला पकडून

thumbnail 1529613822802
thumbnail 1529613822802

टीम, HELLO महाराष्ट्र : तमिळनाडूमधील सरकारी शाळेत शिकवणारे एक शिक्षक सध्या सोशलमिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत. विद्यार्थ्यांनी मागून – पुढून गच्च मिठ्ठी मारलेला त्यांचा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. “सर, तुम्ही जाऊ नका..”, असे म्हणत विद्यर्थ्यांनी शाळेतून बदली झालेल्या त्यांच्या सरांना भावनिक आळ घातला आहे. फोटोमधे शाळेतील विद्यार्थी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांनी गच्च मिठी मारलेले त्यांचे सरही भावनिक झाले असल्याचे दिसत आहे.

तमिळनाडूमधील वेलीआगरम या गावामधे हा प्रकार घडला आहे. तेथील सरकारी शाळेमधे जी. भगवान हा २८ वर्षांचा तरुण गेली चार वर्ष शिक्षक म्हणुन काम करत आहे. इंग्रजी विषय शिकवणारे जी. भगवान हे विद्यार्थ्यांमधे भलतेच प्रिय आहेत. नोकरीच्या या चारच वर्षांत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत खूप चांगले बाँडींग बनवले आहे. सर्वच विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणार्या त्यांच्या ह्या आवडत्या शिक्षकाची दुसर्या गावी बदली झाली असल्याची बातमी वेलीआगरमवासीयांना कळाली आणि गावामधे एकच शोककळा पसरली.

तमिळनाडुमधे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील प्रमाण योग्य ठेवण्याच्या हेतूने ज्या शाळेत शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या प्रमाणाहून कमी आहे अशा शाळांमधे अतिरिक्त जादाचे शिक्षक असलेल्या शाळांतील जुनिअर शिक्षकांना पाठवले जाते. याच कारणावरुन जी. भगवान यांची तिरुत्तानी या वेलीआगरम जवळच्या गावातील सरकारी शाळेत बदली करण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांचा त्यांच्या प्रिय शिक्षकासोबतचा हा फोटो समाजमाध्यमात वायरल होऊन बदली करणार्या अधिकार्यांकडे पोहोचला आणि सरकारी अधिकार्यांनाही गहिवरुन अाले. भगवान याची बदली करणार्या सरकारी अधिकार्यांनी समाजमाध्यमांवरचा वायरल फोटो पाहिल्यानंतर जी भगवान यांच्या बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे ठरवले असल्याचे समजत आहे.

आजच्या डिजिटल जगातसुद्धा गुरु-शिश्याचे हे नाते असे इतके घट्ट असू शकते हे या घटनेने दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगणे, त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे, प्रत्तेक विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती नीट समजाऊन घेऊन त्याला त्यानुसार समजाऊन घेणे आदी गोष्टींमुळे जी भगवान त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत एक वेगळे नाते बनवण्यात यशस्वी झाले असल्याचे बोलले जात आहे. जी भगवान हे वर्गांमधे प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमधे त्यांची एक वेगळी छबी निर्मान झाली होती.

गावकर्यांनी आणि विद्यर्थ्यांनी भगवान सरांची बदली रोखण्याकरता केलेल्या अथक प्रयत्नांनतर शेवटी प्रशासनालाही बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागला आहे.

आणि चे म्हणतो, “येस, आय एम डेड… बट आर यु अलाइव्ह?”

thumbnail 1529565465174
thumbnail 1529565465174

सुभादीप राहा लिखित, दिग्दर्शीत आणि गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित कुमार व प्रमिती नरके आदी कलाकारांच्या उत्कृष्ठ अशा अभिनयातून साकारल्या गेलेल्या “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” या नाटकावरती भाष्य करणारा डाॅ. संजय दाभाडे यांचा लेख.

सुदर्शन हॉल, पुणे इथं अलीकडेच “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” ह्या नाटकाचा प्रयोग झाला. अगदी चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. चे गव्हेरा हा कार्यकर्त्या तरुणाईचं एक स्फूर्तिस्थान राहिलंय जगभरात. ६०, ७० च्या दशकातील तरुणाईचा हिरो होता चे.
अर्जेंटिना मधील डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेला एक तरुण..प्रवासाला निघतो, रोगराईचं मूळ कारण दारिद्र्यात असल्याचं त्याच्या लक्षात येतं..आणि मग तो मूलभूत परिवर्तनाच्या क्रांतिकारक लढाईत सहभागी होतो..पुढं त्याची भेट क्युबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो सोबत होते अन दोघे जिवलग कॉम्रेड्स होतात..चे फिडेलच्या लढाईत सहभागी होतो, क्युबन क्रांती यशस्वी होते..चे सरकार मध्ये सहभागी होतो, पण सत्तेत जीव रमत नाही म्हणून पुन्हा अपरात्री उठून सत्ता त्यागून पुन्हा तो गोरगरीब शोषितांच्या संघर्षात सहभागी होतो..आणि शहीद होतो…
हि सगळी स्टोरी मी बीजे मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असतांना मला कळली, ती अरुण साधूंच्या फिडेल, चे आणि क्रांती ह्या सुंदर पुस्तकातून..मी अक्षरशः भारावून गेलेलो चे चं व्यक्तिमत्व बघून…माझ्या ‘डावीकडे’ वळण्याची बीजे बहुधा चे वाचण्यातून व नंतर धारावीत काही काळ मुक्काम केल्यातून रोवली गेली असावीत. पुण्यातील अनेक वसतिगृहांतून ते पुस्तक फिरत राहिलं..व अनेकांवर चे ची मोहिनी पडली.

तर असा हा मला प्रचंड भावलेला चे गव्हेरा …! त्याच्यावरचं ” हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” हे नाटक पुण्यात होतंय म्हटल्यावर ते सोडणं अशक्य होतं. प्रा. हरी नरके सरांनी नाटकाच्या प्रयोगाची पोस्ट फेसबुकला टाकल्यामुळे मला हि संधी मिळाली, अन्यथा मला प्रयोगाबद्दल माहिती नसती मिळाली. त्यासाठी नरके सरांचे मनापासून आभार .

सुभादीप राहा, ह्या प्रतिभावंन्त दिगदर्शकाने व लेखकाने हे नाटक समोर आणलंय. गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित कुमार आणि प्रमिती नरके ह्यांच्या खूप खूप ताकदीच्या भूमिका झाल्या आहेत. या नाटकाला भारतातील नक्सलवादी चळवळीची पार्श्वभूमी आहे. राजश्री नावाची तरुण प्राध्यापिका नक्षल सिम्पथायझर असते, आणि ती सत्य समजून घेण्यासाठी जंगलात येते..तिथं तिची धाकटी बहिण (भूमिका प्रमिती नरके ) देखील असते व ती काही मूलभूत सवाल उपस्थित करते … प्रमितीनं खुप प्रभावीपणे तीची भूमिका बाजावलीय. नरकें सरांची मुलगी म्हणुन नव्हें तर प्रमिती तीची स्वतंत्र ओळख निर्माण करतेय हें मला मनापासून भावलं.
तिथंच राजश्री ला चे भेटतो….
तो खरंच चे असतो का..?
नाटक बघून कळेल ते…
विशिष्ट रूपात सगळ्या जगाला परिचित असलेल्या रूपातच हुबेहूब चे दिसतो…
त्याची ती दाढी, डोक्यावर विशिष्ट कॅप, सिगार…
मस्त काम केलंय गिरिशनी.
चे बद्दल व सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती असणाऱ्या अभ्यासक व कार्यकर्त्यांनाच प्रामुख्याने हे नाटक नीट समजू शकेल, हि ह्या नाटकाची मर्यादा असली तरी चे बघायला मिळणं ह्याच अप्रूप वाटतं.

“येस, आय एम डेड ….
बट आर यु अलाइव्ह ….?”
चे कडून असा भेदक प्रश्न आपल्या अंगावर येतो ….
आणि आपण खरंच जिवंत आहोत का , अन जीवंत असलो तर जिवंत असणं म्हणजे काय हे प्रश्न तात्काळ अस्वस्थ करतात आपणाला ….

चे तर शहीद झाला …हि इज डेड …
बट व्हॉट अबाउट मी …
मी तरी जीवनात कुठंय….?
हा प्रश्न आपला पिच्छा करतो ….

” डाउट एव्हरीथिंग ….”
हा आणखी एक इशारा समोर येतो….
चिकित्सा, हि चळवळीची मूळ आधार असते हे अधोरेखित होतं.

एकंदरीत परंपरागत चौकटी मोडून वेगळ्या पद्धतीनं सादर केलेलं हे नाटक आहे..चे गव्हेराच्या चाहत्यांना व समकालीन सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्यांना हे नाटक काही काळ का असेना थेट ‘चे ‘ जवळ घेऊन जातं यात वाद नाही..

डॉ. संजय दाभाडे.
संपर्क क्र – ९८२३५२९५०५
[email protected]

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ – “मी फिट तर..माझा देश फिट”

thumbnail 15295321374051
thumbnail 15295321374051

प्रत्येकाची शरीर-रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले असते. त्यात दिनचर्या, जीवनपद्धती, आहार,आजूबाजूचे वातावरण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बाह्य शरीर व अंतर्मन या विशिष्ट घटनांमूळे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नविन नविन गोष्टी आत्मसात करणे ही आता सर्वांची गरज झाली आहे. त्या गरजेला योग्य खतपाणी घालणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तुलनात्मक जगण्यापेक्षा मला कशात आनंद घेता येईल हे जास्त जरुरी आहे.

नियमितपणा व सातत्य जर असेल तर कोणत्याही समस्येवर आपण मात करू शकतो. wellness,fitness..या शब्दांचा अर्थ लिहून, वाचून व बोलून होत नाही. मनाशी ठराव, इच्छाशक्ती आणि चिकाटी असणे खूप महत्वाचे आहे. योगा करणे ,व्यायाम करणे, जीम, कथक, डान्स किंवा प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे शरीराची शाररीक हालचाल करून आपले शरीर मोल्ड करता येऊ शकते. पण या सर्व साधनेत नियमितता असेल तरच निरोगी असण्याचा मंत्र सहजगत्या मिळतो. ‘मी फिट तर कुटुंब फिट, माझे कुटुंब फिट तर माझा समाज फिट , आणि माझा समाज फिट तर माझा देश फिट’ हे आपणाला समजायला हवं.

योगा कसा,केव्हा,कधी चालू करायचा? हे प्रश्न मनाला सतावत असतात. त्यात वयाचा विचार ….. इतके वर्ष केले नाही तर आता या वयात जमेल का? व्यायाम केला तर काही शरीराला त्रास होईल का? वेगळाच त्रास…मग डॉक्टर …पटकन परिणाम मिळण्यासाठी आहार तंज्ञ… असे प्रश्न भेडसावतात. कोणतीही कला वा योग साधना शिकण्यासाठी वयाची अट नसते. हे अनुभवातूनच उमजते. सर्व प्रथम आपले वय,शरीर,आकार,पूर्वी असलेला त्रास,औषध उपचार यांचा एक चार्ट तयार करुन नंतर त्याचे नियोजन करणे सोपे होते. योगासाठी वेगळा विशेष खर्च न करता पण थोडा वेळ काढून शरीराला निरोगी ठेवता येते.सुरुवातीला रोज एक एक आसन १०-१५ मिनिट सातत्याने असे एक आठवडा करणे. कोणत्याही प्रकारे अतिताण शरीरावर येऊ न देता सहजतेने व्यायाम करणे. एका आठवड्यानंतर तुम्ही आपापल्या क्षमते नुसार वेगवेगळे आसन वाढू शकतात. त्यानंतर शरीर सक्षम झाले आहे ही सूचना आपल्याला नकळत मिळत असते. आपला उत्साह द्विगुणीत होतो. मग आपणच आपले उत्कृष्ठ डॉक्टर होतो.
दुसऱ्याला सल्ले न देता आपली योग साधना चालू ठेवणे. व्यायामाचा वेळ वाढून, जर विशिष्ठ अतिताण इतर कोणत्याही अवयांवर जाणवत असेल तर दुसऱ्या दिवशी तो व्यायाम न करणे. रोज चालणे यात कोणताही तोटा वा नुकसान नाही तसेच योगासने करणे यात तर फायदाच फायदा !
हल्लीच्या युगात तुम्हांला हवे ते आसन, हवी ती कला आत्मसात करता येते. त्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत. उदा.video,CDS,BOOKS,T.V. CHANNELS वर तर खूप माहिती जमा करता येते.
सर्वांनी एक मुद्दा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजेल, कोणती कला शिकतांना /जोपासंताना गुरु यांच्या मार्गदर्शना खाली शिकणे गरजेचे आहे. तुमचे शरीर मुद्रा, श्वास कुठे घेयचा, कुठे सोडायचा? याचे प्रशिक्षण मिळणे आवशक्य असते. आता तर योग शिक्षण पूर्ण करून बरेच स्वयंसेवक योगाचा प्रचार करत आहेत. २१ जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा करतात.
काही कारणाने योगा करणे जमले नाही तरी चालू शकते. पण हेच कारण रोज कॅरी करणे योग्य नव्हे. परत २-३ दिवसांनी आपले दिनक्रम चालू ठेवणे. तो/ती खूप छान योगा करतात, रामदेव बाबांचे शरीर तर खूप लवचिक आहे……..मलाच का जमत नाही? असे प्रश्न मनात नक्कीच घर करतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले गुण असतातच, तसेच चांगले योग शरीर पण असतेच असते. अपंग लोक त्यांचा अवगुणांवर ही विजय मिळवतांना आपण बघितले आहे. ‘योगा’ स्व:ताला परमाआनंदकडे नेणारे शस्त्र आहे. ‘योग आनंद’ हे मनाच्या शांततेचे एक उत्कृष्ठ साधन आहे.

सौ.सरिता संदीप चितोडकर
कोथरूड ,पुणे
[email protected]

(लेखिका कंप्यूटर इन्फोटेकच्या संचालिका असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ – पतंजली मुनींनी सांगीतलेले हेच ते आठ योग, ज्यांची साधना केल्यावर माणुस बनतो सुखी आणि शांत..

thumbnail 15295329802631
thumbnail 15295329802631

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ निमित्ताने योगशास्त्राचे अभ्यासक श्रीकृष्ण शेवाळे यांचा विशेष लेख

योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर सांगीतले आहे. पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्या अंगांचे कटाक्षाने पालन केले असता किंवा त्या अंगांना केंन्द्रबिंदू ठरवून साधना केली असता ज्या व्यक्तीला जी गोष्ट साधावयाची आहे किंवा नकोशी आहे, काढावयाची आहे ते या आठ अंगांच्या माध्यमातून प्राप्त करता येते.ती आठ अंगे/पायर्या पुढीलप्रमाणे आहेत.

१) यम
यामधे सार्वभौमिक वा नैतिक आचरणाचे नियम सांगितले आहेत. यामधे अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिगृह म्हणजे अवाजवी वस्तुंची साठवणूक न करणे हे यम म्हणजे समाज आणि व्यक्ती यांच्यासाठी नैतिक नियम असून ते मोडले असता सामाजिक आणि मानसिक व्यवस्था बिघडण्यास सुरवात होते.

२) नियम
नियम हे वयक्तीक आचरणासाठी आहेत. यामधे पतंजलींनी पाच प्रकार सांगीतले आहेत. पतंजलींनी सांगीतलेले प्रकार खालीलप्रमाणे –
१. शौच (स्वच्छता) – शरीराची निर्मलता.
२. संतोष – समाधान, संतुष्टता.
३. तपस – प्रकाशमान, तपश्चर्या. (कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या नियमाचा उपयोग होतो.)
૪. स्वाध्याय – स्वत: अभ्यास करणे.
५. ईश्वर प्रणिधान – स्वत: केलेल्या कर्मावे फळ ईश्वराला अर्पण करणे. (अर्पण करणे म्हणजे स्वत:मधे असणारा मी पणाचा भाव काढून टाकणे होय.)

३) आसन
हे योगाचे तिसरे अंग/पायरी आहे. याच्या सतत अभ्यासाने स्थिरत्व, आरोग्य, शरीराचा लवचीकपणा, शरीराचा डौलदारपणा प्राप्त होतो. आसनांच्यामुळे ज्या व्यक्तीला शरीराची जी स्थिती ठेवणे आवश्यक आहे किंवा हवी आहे ती स्थिती मिळवता येते. जवळजवळ ८૪ दशलक्ष इतके आसनांचे प्रकार अस्तित्वात अाहेत असे म्हटले जाते. परंतु त्यातील व्यक्तीला ज्या आसनांची उपयुक्तता आहे त्या अासनांच्या अभ्यासातून, साधनेतून व्यक्तीचे वयक्तीक जीवन सुखकर बनवता येते. आसनांच्या अभ्यासासाठी बी. के. एस. अय्यंगार यांचे ‘योगदीपिका’ हे पुस्तक उत्तम आहे.

૪) प्राणायाम
प्राण म्हणजे श्वास, श्वसन. आयाम म्हणजे लांब, विस्तार, नियंत्रक करणे. प्राणायाम म्हणजे श्वास लांबवणे व नियंत्रीत करणे. प्राणायामाच्या विविध क्रियांच्या माध्यमातुन शरीरातील प्राण नियंत्रीत ठेवला जातो. जर का प्राण म्हणजे श्वास व्यक्तीच्या एकाच नाकपुडीतून उदाहरनार्थ उजव्या नाकपुडीतून जास्त होत असेल तर त्या व्यक्तीस भुतकाळाचे विचार जास्त येतात आणि डाव्या नाकपुडीतून जास्त श्वसन होत असेल तर भविष्यकाळाचे विचार जास्त येतात आणि व्यक्तीच्या दोन्ही नाकपुड्यांतुन समांतर श्वसन होत असेल तर तेव्हा तो व्यक्ती वर्तमानाशी अधिक समरस होतो. त्यामुळे आसनानंतर प्राण नियंत्रण करणे म्हणजे संतोष, समाधान, संतुष्टता मिळवणे होय.

५) प्रत्याहार
बाह्य विषयांच्या आणि इंद्रियांच्या प्रभावापासुन मनाला मुक्त करणे म्हणजे प्रत्याहार. या पायरीवरती साधक आत्मपरिक्षण करण्यास सुरवात करतो.

६) धारना
चित्ताला एकाग्र करण्याची साधना धारणेमधे साध्य होते.

७) ध्यान
मनाची निर्विचार स्थिती म्हणजे ध्यान होय. ध्यान ही एक अशी सातवी पायरी आहे की तेथे पोहोचले असता किंवा योग्य गुरुच्या सानिध्यात शिकले असता बाकिच्या इतर सहा पायर्या आपोआप कार्यरत होतात. त्या पयर्यांवरुन चालत येण्याची गरज भासत नाही.

८) समाधी
योगाची शेवटची पायरी/अंग यामधे मणुष्याला अंतिम ध्येयाची सिद्धी होते.

योग साधकाने या आठ पैकी फक्त एका पायरीचा जरी अभ्यास, साधना केली असता त्या व्यक्तीला आपले जीवण सुख शांतीमधे घालवता येईल.

श्रीकृष्ण शेवाळे

(लेखक योगशास्त्राचे अभ्यासक असून अंयंगार इन्स्टिट्युट, पुणे येथे अध्ययन करत आहेत.)

पेशवाईच्या पगडीला आमचा विरोधच – डाॅ. प्रकाश आंबेडकर

thumbnail 1529509933309
thumbnail 1529509933309

पुणे : सद्या फुले पगडी आणि पेशवाई पगडी यावरुन महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात शरद पवार यांनी पेशवाई पगडी न स्विकारता फुले पगडीला प्राधान्य दिले होते. सध्या महात्मा फुलेंच्या विचांराची महाराष्ट्राला गरज आहे असेही प्रतिपादनही पवार यांनी केले होते. फुले पगडी आणि पेशवाई पगडी संदर्भात आपले मत काय? असा प्रश्न भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता “पेशवाई पगडीला आमचा विरोधच आहे” असे ते म्हणाले. शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी पहिल्यांदाच स्विकारली आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीला बहुजन आघाडीमधे येण्याची संधी आहे काय असे विचारले असता “मी शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही, परंतु त्यांच्या काही कृती प्रतिगामीच आहेत. त्यांनी त्यांच्या काही कृतींमधे सुधारणा करण्याची गरज आहे. शरद पवारांनी त्या सुधारणा केल्या तर त्यांचे वंचित बहुजन आघाडीमधे स्वागत असेल असेही आंबेडकर म्हणाले.

डाॅ. प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडीची घोषणा

thumbnail 1529507218619
thumbnail 1529507218619

पुणे : भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. जे जे स्वत:ला पुरोगामी विचाराचे समजतात अशा सर्वांना आमच्या आघाडीची दारे उघडी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले अाहे. काॅग्रेस – राष्ट्रवादी आदी पक्षांना आमच्या अटी मान्य असतील तर त्यांचे आघाडीत स्वागत असेल असे ते यावेळी म्हणाले. रामदास आठवलेंना तुम्ही या आघाडीत घ्याल काय असे विचारले असता जे लोक प्रतिगामी विचाराच्या पक्षांना आपले मित्र मानतात त्यांना आम्ही पुरोगामी समजत नाही असे म्हणत आठवलेंना आघाडीत नो ऐंन्ट्री असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेने नुकतीच स्वबळाची निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने त्यांचा बहुजन आघाडीत येण्याचा प्रश्नच येत नाही असेही ते म्हणाले. “आम्ही कोणत्याही पक्षाकडे स्वत:हून जाणार नसून ज्यांना आमचा विचार पटतो आहे अशांनी स्वत: आम्हाला अपिल व्हावे” असे म्हणुन आंबेडकरांनी पुरोगामी विचारसरणीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीत सामिल होण्याचे आवाहण केले आहे. “जो जो समुह स्वत:ला वंचित समजतो अशांना आम्ही बैठकीला बोलावले आहे. आलुते बलुतेदारांची मोट बांधण्याचा आमचा प्रयत्न असून राजकारणातील घराणेशाही मोडण्याचा आमचा मनोदय आहे” असे डाॅ. आंबेडकर म्हणाले. “लोकशाहीचं सोशलायझेशन होणे गरजेचे आहे. वंचित समाजातील घटकांना संसदेत प्रतिनिधीत्व मिळावे अशी आमची इच्छा आहे. भटक्या विमुक्त जमाती, धनगर समाज, माळी समाज, मुस्लिम समाज आदीं समाजांतील प्रतीनिधींना प्रत्तेकी दोन उमेदवार्या देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी ने घेतला आहे” असेही आंबेडकर यांनी यावेळी नमुद केले.

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू

thumbnail 1529469323493
thumbnail 1529469323493

दिल्ली : भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मु – काश्मिरमधे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. भाजपने पी.डी.पी. चा पाठिंबा काढुन घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष अल्पमतात आला होता. परिणामी मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. जम्मु काश्मिरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील इतर पक्षांसोबत सरकार स्थापणेबाबत चर्चा केली. परंतु कोणताही पक्ष पी.डी.पी. सोबत सत्ता स्थापण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले. परिणामी राज्यातील सद्य परिस्थितीबाबतचा अहवाल राज्यपाल वोहरा यांनी राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांना पाठवून दिला होता. जम्मु काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू करण्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींकडे शिफारसही केली होती. राष्ट्रपती कोविंद यांनी आज जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवटीस लागु करण्यास परवानगी दिली आहे. संविधानाच्या कलम ९२ नुसार जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

तमिळनाडुची अनुकृती वास मिस इंडिया २०१८

thumbnail 1529447833489
thumbnail 1529447833489

मुंबई : फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली असणार यात वाद नाही. यंदाच्यावर्षी मिस इंडियाचा मुकुट कोणाला मिळणार याबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील सौदर्यजगतामधे फेमिना मिस इंडिया स्पर्धा सर्वोच्च मानली जाते. फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेची अंतिम फेरि मंगळवारी संध्याकळी मुंबई येथे पार पडली. अतिशय रंगतदार झालेल्या या अंतिम फेरिमधे तमिळनाडूच्या अनुकृती वास हीने बाजी मारत फेमिना मिस इंडिया २०१८ चा किताब मिळवला आहे.

फर्स्ट रनरअप म्हणुन हैदराबादच्या मिनाक्षि चौधरी हिला तर सेकन्ड रनरअप म्हणुन आंध्र प्रदेशच्या श्रेया राव कामावारापू हीला गौरविण्यात आले आहे. करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी होस्ट केलेल्या या स्पर्धेदरम्यान बोलिवुड कलाकार माधुरी दिक्षित, करिना कपुर आणि जेकलीन फर्नांडीस यांनीही आपली आदाकारी दाखवली.

पंचांच्या पॅनेलमधे मलायका अरोरा, बोबी देओल, कुणाल कपुर आदी बोलिवुड कलाकार होते तसेच माजी क्रिकेटपटू इर्फान पठान हासुद्धा होता. मिस वर्ड २०१७ चा किताब मिळालेली मानुशी चिल्लर, मिस युनायटेड कौन्टिनंट्स साना दुआ यांचाही पंचांच्या पॅनेलमधे समावेश होता.

मिस इंडिया स्पर्धेत एकुण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. मिस इंडियाचा किताब मिळालेली अनुक्रीथी वास आता मिस वर्ड स्पर्धेमधे भारताचे प्रतिनिधीत्व करेल तर फर्स्ट आणि सेकन्ड रनरअप म्हणुन गौरवण्यात आलेल्या उर्वरीत दोघी मिस ग्रेंड इंटरनेशनल २०‍१८ तसेच मिस युनायटेड कौन्टिनंट्स २०१८ मधे भारताचे प्रतिनिधीत्व करतील.

राहुल गांधी “त्या” व्हिडीओमुळे अडचणीत

thumbnail 1529433148283
thumbnail 1529433148283

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. जळगावमधे अल्पवयीन मुलांना विहीर पोहोल्याच्या कारणावरुन नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. जामनेर तालुक्यातील वाकडी गावामधे हा प्रकार घडला होता. त्या घटणेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी सदरील घटनेचा निषेध करत तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. परंतु राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्या मुलांचे चेहरे दिसत असून त्यांची ओळख उघड होत आहे असा आरोप करत महाराष्ट्र बालहक्क आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. बालहक्क कायद्यातील कलम ७૪ नुसार आणि पोक्सो कायद्याच्या २३ व्या कलमानुसार राहुल यांनी कायद्याचे उल्लंखन केले असल्याचे नोटीसीत म्हणले आहे. तसेच दहा दिवसांव्या कालावधीत नोटीसीला उत्तर देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.