Friday, December 19, 2025
Home Blog Page 763

Desi Ghee vs Butter : देशी घी की बटर? आरोग्यासाठी काय आहे Better? जाणून घ्या फरक

Desi Ghee vs Butter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Ghee vs Butter) आपण आपल्या आहारात काय खातो? याचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रत्येक घटक असायला हवेत. म्हणूनच रोजच्या थाळीत पालेभाज्या, फळभाज्या, दही, फळे असे विविध पोषणदायी पदार्थ असावेत, असे तज्ञ सांगतात. आपल्यापैकी बरेच लोक आहारात देशी घी अर्थात तूप किंवा लोणी म्हणजेच बटरचा वापर करतात. अन्न शिजवताना किंवा खातेवेळी या पदार्थांचा वापरला जातो. यामुळे अन्नपदार्थांची चव वेगळी लागतेच. शिवाय या पदार्थांमध्ये असणारे काही महत्वाचे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

पण आपल्या दैनंदिन आहारात देशी घी खाणे अधिक फायदेशीर आहे? की बटर? (Desi Ghee vs Butter) याविषयी कायम संभ्रम पहायला मिळतो. असं कन्फ्युजन तुमचंही होत असेल तर चिंता नसावी. आज आपण घी आणि बटर मधील फरक जाणून घेणार आहोत. त्यामुळे गरमा गरम भातावर घी खाणारे आणि पराठ्यावर मजबूत बटर लावून खाणाऱ्यांना कोणता पदार्थ अधिक आरोग्यदायी आहे हे ओळखणे सोपे जाईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तूप आणि बटर एकच वाटत. पण तसं नाहीये बरं का… तूप आणि बटर हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत. चला यामधील मुख्य फरक जाणून घेऊन त्यांचे फायदे पाहुयात.

देशी घी आणि बटरमध्ये काय फरक आहे?

अनेक लोकांना वाटतं की, घी आणि बटर या दोन पदार्थांमध्ये काहीच फरक नसून ते एकच आहेत. (Desi Ghee vs Butter) तर असं नाहीये. या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक नसल्यामुळे हे कन्फ्युजन होत. घी व बटरमधला सगळ्यात मोठा आणि मुख्य फरक सांगायचा म्हणजे, घी बनवण्यासाठी दह्यापासून लोणी काढतात. ते लोणी वितळवलं जात आणि त्यापासून घी तयार होतं. चवीबद्दल सांगायचं तर, तुपाची चव खमंग आणि बटरची चव किंचित आंबट असते.

घी खाण्याचे फायदे काय?

असं म्हणतात की, देशी घी खाण्याचे खूप फायदे आहेत. कारण देशी घीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. देशी घीचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या होत नाहीत. शिवाय ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांनी आवर्जून देशी घीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. देशी घीमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे देशी काही खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. इतकेच नव्हे तर आयुर्वेदानुसार, देशी घीचे सेवन त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते.

(Desi Ghee vs Butter) घीमध्ये 120 kcal कॅलरीज, 14 ग्रॅम फॅट्स, 10 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स, 3.5 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, 0.5 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि 36 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल असते.

बटर खाण्याचे फायदे काय?

बटर म्हणजे काय तर लोणी आणि लोणी दह्यापासून काढले जाते. जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. बटरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत होते. तसेच कॅल्शियमयुक्त बटरचे सेवन केल्यास हाड मजबूत होतात. (Desi Ghee vs Butter)

बटरमध्ये 102 kcal कॅलरीज, 11.5 ग्रॅम फॅट्स, 7 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स, 3 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, 0.4 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि 31 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल असते.

आरोग्यासाठी देशी घी की बटर? (Desi Ghee vs Butter)

काही आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, देशी घी आणि बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. अशात जर दोन्ही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केले तर आणि तरच शरीराला फायदा होऊ शकत. यातही अधिक फायद्यांसाठी गवत खाणाऱ्या गाईचे घी वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात.

Constipation Home Remedy : बद्धकोष्ठतेचा वाढतोय त्रास? ‘या’ घरगुती उपायाने पोट होईल साफ, मिळेल लगेच आराम

Constipation Home Remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Home Remedy) रोजच्या बिघडत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर दिवसेंदिवस वाईट परिणाम होऊ लागला आहे. एकीकडे कामाचा ताण आणि दुसरीकडे चुकीचे अन्नपदार्थ खाण्याच्या सवयी. यामुळे अपचन, पोटाच्या समस्या, आतड्यांमध्ये सूज, फूड पॉयझन, पचनाचे विकार आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात वाढती उष्णता बद्धकोष्ठतेसारखे त्रास वाढवते. तुम्हीही अशा समस्येने हैराण झाले असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे.

खास करून उन्हाळ्याच्या दिवसात बद्धकोष्ठतेचा त्रास प्रचंड वाढतो. अशावेळी त्वरित आराम हवा असेल तर कोणतीही औषधे खाण्यापूर्वी घरगुती उपायांचा अवलंब करावा. यामध्ये सब्जा खाणे अत्यंत प्रभावी मानले जाते. (Constipation Home Remedy) त्यामुळे जर तुमचीही पचनक्रिया खराब असेल आणि तुम्हाला तुमचे पोट साफ करण्यात त्रास होत असेल तर सब्जाचे बी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सब्जा बी नैसर्गिक उपचार पद्धतीने आपले पोट साफ करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. शिवाय यातील अनेक आरोग्यदायी गुणधर्म फायदेशीर आहेत. ते कसे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

सब्जा बीमधील आरोग्यदायी गूण

(Constipation Home Remedy) सब्जाच्या बियांमध्ये उच्च फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारखे चांगले घटक असतात. जे तुमची पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बी चे सेवन कसे कराल?

बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून सब्जा बी चे सेवन करायचे असेल तर यासाठी रात्री सब्जा बियाणे खाणे उत्तम ठरेल. याकरता सब्जाच्या बिया पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे त्या फुगतील. (Constipation Home Remedy) या बियांचे सेवन दुधासोबत किंवा पाण्यासोबत करता येईल. तसेच सब्जा बी रात्री भिजवून खाल्ल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही सब्जा बी सकाळी रिकाम्या पोटीही घेऊ शकता.

सब्जा बी खाल्ल्याने होणारे फायदे (Constipation Home Remedy)

सब्जाच्या बियांमध्ये असलेले फायबर हे पोटाच्या सर्व समस्यांवर परिणामकारक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय अपचन दूर करण्यास मदत होते. शिवाय सब्जा बी थंड असल्याने त्याचे सेवन केल्यास उष्णतेपासून पोटाला आराम मिळतो. इतकेच नव्हे तर आतड्यांना सुखद अनुभव मिळतो. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते.

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार!! MSRDC ने काढला ‘असा’ तोडगा

Mumbai-Pune highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) वाहतूक कोंडीची समस्या जाणवत होते. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळेच यावर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक तोडगा काढला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर राज्यातील पहिली इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) बसवली आहे. ही सिस्टिम जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) सुट्टीच्या दिवशी सरासरी 40 हजार ते 60 हजार वाहनांच्या रंगात रांगा पाहायला मिळतात. यामुळे वाहन चालक आणि प्रवासी बेजार होऊन जातात. वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठीच एमएसआरडीसी ने एआयचा वापर करण्याचे ठरवले आहे. येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एमएसआरडीसीकडून इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पुणे महामार्गावर पहिल्या टप्प्यासाठी 95 किमी अंतरापर्यंत 39 ग्रँटी बसवण्यात आल्या आहेत. तसेच 218
आर्टिफिशियल इंजेलिजेंस कॅमेरेही बसवले गेले आहेत. ज्यामुळे 17 प्रकारचे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. बसवण्यात आलेले सर्व कॅमेरे आणि टोल बूथवरील कॅमेरे वाहनांच्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळखण्याचे काम करतील. या नंबर प्लेटच्या साह्याने ई-चलन जारी करण्यात येईल.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) सर्व एन्ट्रीमध्ये वाहनांसाठी वेट-इन मोशन मशीन असेल. तर 11 ठिकाणी हवामान निरिक्षण यंत्रणा काम करेल. त्याचबरोबर, या महामार्गावर टो व्हॅन, क्रेन, 36 आपत्कालीन वाहने ट्रॅकिंग सिस्टीम, अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध असेल. इथून पुढे वाहन चालकांना वाहतुकीचे माहिती कोणते रस्ते बंद आहेत, याचे अपडेट दिले जातील. या नव्या प्रणालीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

BARC Mumbai Bharti 2024 | भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी भरती सुरु, असा करा अर्ज

BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी आम्ही नेहमी नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भाभा अनुसंशोधन केंद्र कार्लिक विभाग ट्रॉम्बे मुंबई (BARC Mumbai Bharti 2024) अंतर्गत रिक्त जागा आहेत. या भरती अंतर्गत ड्रायव्हर या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 50 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्याचप्रमाणे 24 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना 24 तारखेच्या अगोदरच अर्ज भरावे लागणार आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

महत्वाची माहिती | BARC Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – ड्रायव्हर
  • पदसंख्या – 50 जागा
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 40 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय सेंट्रल कॉम्प्लेक्स भाभा अनुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे मुंबई 400085
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यामुळे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज भरून पाठवू शकता.
  • 24 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज भरण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

MS Dhoni Temple : चेन्नईत MS धोनीचे मंदिर बांधले जाईल; माजी खेळाडूने दिली देवाची उपमा

MS Dhoni Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … फक्त नावच काफी आहे … संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात धोनीचे लाखो करोडो चाहते आहेत .. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते स्टेडियमवर गर्दी करत असतात .. मैदानावर धोनीची एंट्री होताच माही माही या गजराने संपूर्ण स्टेडियम दमदमून जाते … इतकी प्रचंड क्रेझ धोनीची आहे .. त्यातच आता धोनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे . भविष्यात चेन्नईत महेंद्रसिंग धोनीचे मंदिर (MS Dhoni Temple) बांधले जाऊ शकते, असा दावा चेन्नई सुपर किंग्सचा माजी क्रिकेटर अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने केला आहे.

रायुडू म्हणाला, “गेल्या काही वर्षांतील भारत आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याची कामगिरी पाहता, चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर बांधले जाईल. दक्षिण भारतात त्याची क्रेझ लक्षात घेता हे आश्चर्यकारक नाही. धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत एमएस धोनीचे मंदिर चेन्नईमध्ये बांधले जाईल. धोनी हा असा व्यक्ती आहे जो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्याने नेहमीच संघासाठी, देशासाठी आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी, त्याच्या बॅटिंगचा आनंद घेण्यासाठी चेन्नईचे चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर जातायत . धोनीने सुद्धा आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. भलेही धोनी फलंदाजी साठी खालच्या क्रमांकावर येत असेल मात्र तरीही त्याने आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केलं. या मोसमात त्याने अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत चौकार-षटकार मारून प्रेक्षकांना खुश केलं. एमएस धोनीने यंदाच्या आयपीएल मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांमध्ये त्याने 226.67 च्या स्ट्राइक रेटने 136 धावा केल्या आहेत ज्यात 11 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे.

दरम्यान, रविवारच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचे १३ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुण झाले आहेत. चेन्नईचा संघ साधय पॉईंट्स टेबल मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करावे लागेल. धोनीसाठी तरी चेन्नईचा संघ प्ले ऑफ मध्ये जावावा अशी भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.

CBSE 10th Result 2024 | CBSE बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

CBSE 10th Result 2024

CBSE 10th Result 2024 | इयत्ता दहावीच्या CBSE विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजे CBSE चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा निकाल बघू शकता. त्याचप्रमाणे CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल तुम्ही डीजीलॉकरवर देखील पाहू शकता. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक किंवा ओळखपत्राचा वापर करावा लागेल.

या परीक्षेत देशभरातील एकूण 93.60% विद्यार्थी पास झालेले आहेत. दहावीची परीक्षा ही 15 मार्च ते 13 मार्च यादरम्यान विविध केंद्रांवर घेण्यात आलेली होती. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील यावर्षी मुलींनीच बाजी मारलेली आहे. मुलींचा निकाल हा 94.75 टक्के लागलेला आहे, तर एकूण निकाल हा 93.60% लागलेला आहे.

अशाप्रकारे पहा सीबीएससी दहावीचा निकाल | CBSE

  • सगळ्यात आधी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा
  • त्यानंतर होम पेजवर जाऊन निकाल विभागावर जा.
  • यानंतर आता सीबीएससी इयत्ता दहावीवर क्लिक करा.
  • नंतर तुमचा रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाईप करा .
  • तुम्हाला स्क्रीनवर सीबीएससी बोर्ड निकाल 2024 असे दिसेल.
  • तिथे तुम्ही निकाल बघून तो डाउनलोड देखील करू शकता

निकाल बघण्यासाठी वेबसाईट

https://cbseresults.nic.in

https://cbseresults.nic.in

Ravana Temples In India : भारतात ‘या’ ठिकाणी केली जाते रावणाची पूजा; पहा कुठे आहेत दशानन मंदिरे?

Ravana Temples In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ravana Temples In India) रावण… भक्ती आणि शक्तीचे एक अनन्यसाधारण रूप मानले जाते. ज्याने भक्तीच्या मार्गाने स्वार्थ जपण्याचा प्रयत्न केला आणि अन्यायाचा व अधर्माचा मार्ग निवडला. त्याच्या ईर्ष्या आणि कुत्सित भावनेने उत्पत्ती झालेल्या रागातून त्याचा अंत प्रभू श्रीरामांच्या हाती झाला. रामायणात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाच्या पापी आणि अहंकारी वृत्तीचा कसा वध केला हे सांगण्यात आले आहे. लंकापती रावण हा ज्ञानी होता. मात्र अहंकाराने त्याच्या ज्ञानावर अस्पष्टता पसरली होती.

एकीकडे अवघ्या देशभरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा केली जाते. तर दुसरीकडे अन्याय, पापी, क्रूर, अहंकारी, मत्सर अशा अनेक कुत्सित भावनांमुळे खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी केले जाते. (Ravana Temples In India) पण ज्या देशात लोक रावणाला खलनायक मानतात, त्याच देशात काही भागांमध्ये रावणाची पूजा केली जाते. नुसती पूजा नव्हे तर काही ठिकाणी रावणाची अद्भुत मंदिरे आहेत. जिथे अनेक लोक श्रद्धा आणि भावनेने रावणाची पूजा करतात.

अन्याय आणि अधर्माचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रावणामध्ये देखील काही चांगले गुण होते. ज्याविषयी अनेक ग्रंथ, पुराण आणि अगदी रामायणात देखील उल्लेख केला आहे. (Ravana Temples In India) जो ज्ञानी होता, पंडित होता, त्याला अनेक कला अवगत होत्या, शिवाय तो एक सच्चा भक्त होता असेही म्हटले जाते. त्यामुळे भारतातील काही ठिकाणी रावणाच्या या चांगल्या कला गुणांचे पूजन केले जाते. चला तर भारतात रावणाची मंदिरे कुठे आहेत? याविषयी आपण जाणून घेऊया.

1. काकीनाडा – आंध्र प्रदेश

आंध्रप्रदेशातील काकीनाडा हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे. (Ravana Temples In India) येथे बीच रोडवर काकीनाडा नावाचे प्रसिद्ध असणारे मंदिर हे रावणाचे मंदिर आहे. रावण हा नाथांचे नाथ भोलेनाथ अर्थात शंभू महादेवाचा मोठा भक्त होता. त्यामुळे या मंदिरात मोठ्या शिवलिंगासह रावणाची मूर्ती पहायला मिळते. ही मूर्ती सुमारे ३० फुटाची असून येथे रावणाची पूजा केली जाते.

2. मंडोर – राजस्थान (Ravana Temples In India)

राजस्थानमधील मंडोर या ठिकाणी देखील रावणाचे भव्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, मंडोरमधील स्थायिक लोक हे प्रामुख्याने मौदगील आणि दवे ब्राह्मण आहेत. हे लोक रावणाला आपला जावई मानतात आणि म्हणूनच या ठिकाणी रावणाची विधीवत सन्मानाने पूजा केली जाते.

3. बैजनाथ – हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कांगडा या जिल्ह्यात बैजनाथ मंदिर आहे. खरंतर हे मंदिर महादेवाचे आहे. त्यामुळे या मंदिरात भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणाशी रावणाचा घनिष्ट संबंध आहे. येथे सांगितल्या जाणाऱ्या कथानकांचा काही पौराणिक ग्रंथांमध्ये समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील रावणाची पूजा केली जाते.

4. विदिशा – मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात विदिशा नावाचे एक सुंदर गाव आहे. (Ravana Temples In India) असे म्हटले जाते की, रावणाची पत्नी अर्थात राणी मंदोदरी ही मूळ या ठिकाणची होती. अर्थात विदिशा हे रावणाचे सासर आणि या गावासाठी रावण जावई आहे. म्हणूनच या ठिकाणी देखील रावणाची आदराने पूजा केली जाते.

5. मंदसौर – मध्य प्रदेश

राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर इंदूर या प्रसिद्ध शहरापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर मंदसौर नावाचे एक शहर आहे. या शहरात दशानन रावणाची १० मस्तकी मूर्ती स्थापित केलेले एक मंदिर आहे. या मूर्तीची उंची सुमारे ३५ फूट असून या मूर्तीरूपात रावणाची स्तुती केली जाते.

6. बिसराख – उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात बिसरख नावाचे एक गाव आहे. या गावी रावणाचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. (Ravana Temples In India) उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाजवळ स्थित असलेलं हे गाव रावणाचं जन्मस्थान असल्यामुळे या ठिकाणी रावणाच्या चांगल्या गुणांची स्तुती करत त्याचे पूजन केले जाते.

7. कानपूर – उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये देखील रावणाचे एक मंदिर आहे. ज्या ठिकाणी रावनातील चांगले गूण आणि त्याच्या कलांचे गुणगान केले जाते. या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.

8. अकोला – महाराष्ट्र

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा रावणाचे एकमेवा मंदिर आहे. अकोला येथील पातूर तालुक्यात सांगोळा नावाचे एक गाव आहे. या गावात नियमित स्वरूपात रावणाची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान मानले जाते. (Ravana Temples In India)

बारामतीत नेमकं चाललंय काय? EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे सकाळपासून बंद

CCTv camera Off in Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) काळात बारामती संघात मतदानाच्या दिवशी झालेल्या पैसे वाटपाच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मतदान झाल्यानंतर EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे आज सकाळपासून बंद असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया (Laxmikant Khabiya) यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तब्बल 45 मिनिटे बंद राहिलेले सीसीटीव्ही फुटेज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 7 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात मतदान पार पडले होते. यानंतर सर्व ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघ गोदामात म्हणजेच स्ट्रॉगरूममध्ये आले होते.

याचदरम्यान आज सकाळी लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या गोदामातील सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे निदर्शनात आले. यानंतर काही चुकीचा प्रकार घडू नये त्यामुळे लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची आयोगाने तातडीने दखलही घेतली. त्यानंतर, गोदामातील सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला, हे सीसीटीव्ही फुटेज काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशी बोलताना लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले की, “बारामती मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवलेले आहेत, त्या गोदामातील सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद आहेत. ज्यामुळे काही काळं बेरं तर नाही ना याची शंका येत आहे. आम्ही आधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधत आहोत. बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी टेक्निशियन्स उपलब्ध नाहीत. पोलीस म्हणत आहेत, आम्हाला काही आदेश नाहीत. त्यामुळे येथे काय चाललेय कळेना”

Mangalgraha Mandir : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे मंगळ ग्रहाचे स्वयंभू मूर्तीमंदिर; जिथे VIP सुविधा मिळत नाहीत

Mangalgraha Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangalgraha Mandir) आपल्या जन्म कुंडलीमध्ये नवग्रहांचे स्थान किती महत्वाचे आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यात मंगळ ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीवर विशेष प्रभाव टाकते. अनेकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोषाची समस्या असते. जिच्या निवारणासाठी मंगळ ग्रहाची शांती करण्याचा सल्ला दिला जातो. खरतर मंगळ ग्रह नावाप्रमाणे मंगलकारी आहे. मात्र, असे असूनही अनेकांना या ग्रहाच्या स्थितीबाबत बरेच समज गैरसमज आहेत. ज्योतिषशास्त्रात, जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ ग्रहदोष असेल तर त्या व्यक्तीचे लग्न ठरताना अनेक समस्या येतात. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीला आयुष्यात बराच संघर्ष करावा लागतो, असे सांगितले जाते.

कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबतच विवाह करावा लागतो. अन्यथा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी मंगळ दोष निवारण करण्यासाठी एक विशिष्ट पूजा केली जाते. जी मंगळ ग्रहाच्या देवालयात केल्यास अधिक लाभ मिळतो. (Mangalgraha Mandir) मात्र, अनेक लोकांना मंगळ ग्रहाचे मंदिर नेमके कुठे आहे? याबाबत माहिती नाही. तीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात एकमेव मूर्तीरुपी मंगळ देवाचे मंदिर आहे. जिथे मंगळ दोष निवारणासाठी लांबून भाविक येतात. हे मंदिर कुठे आहे? याविषयी जाणून घेऊ.

कुठे आहे मंगळ देवाचं मूर्तीरुपी मंदिर?

महाराष्ट्रात जळगावमधील अमळनेरमध्ये मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव मंगळ ग्रहाचे मंदिर (Mangalgraha Mandir) आहे. जिथे मंगळ देवाची स्वयंभू मूर्ती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भाविक येथे मंगळ दोषाची समस्या निवारण करण्यासाठी आणि विशेष पूजा विधींसाठी या मंदिराला भेट देतात. हे मंगळ ग्रह मंदिर जळगाव पासून अमळनेरमध्ये सुमारे ६० किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर हे सुमारे ३६ किमी अंतरावर आहे.

मंदिराचा इतिहास (Mangalgraha Mandir)

या मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला. मात्र, १९४० नंतर हे मंदिर दुर्लक्षित झाल्याने भग्न झाले होते. पुढे १९९९ नंतर या मंदिराचे पुन्हा जीर्णोद्धार झाला आणि या मंदिराचा कायापालट झाला. या मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर असून इथे दर मंगळवारी सुमारे ८० हजार ते १ लाखापर्यंत भाविक तथा पर्यटक येताना दिसतात.

दर्शनासाठी VIP सुविधा नाही

या मंदिराबाबत सांगायची खास बाब अशी की, इथे कुणीही VIP नसून सगळ्यांसाठी समान सुविधा आहेत. या मंदिरात कोणत्याही प्रकाराचा टॅक्स घेतला जात नाही. (Mangalgraha Mandir) शिवाय पार्किंगसाठीसुद्धा शुल्क आकारले जात नाही. मंगळदेवाच्या दर्शनासाठी इथे VIP सुविधादेखील उपलब्ध नाही आणि मंदिराबाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दरसुद्धा आकारले जात नाहीत.

या मंदिराचा भारतात दुसरा क्रमांक

उज्जैनमध्ये देखील असेच मंगळ देवाचे एक मंदिर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे मंगळ ग्रह मंदिर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील मंगळग्रह मंदिर आहे. ज्या लोकांना मंगळ ग्रह दोष आहे, असे लोक या मंदिराला आवर्जून भेट देतात. इथे येऊन पूजा केल्यानंतर मंगळ ग्रहाची पीडा, त्रास आणि समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. महाराष्ट्रातील या मंगळग्रह मंदिरात मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती आहे. (Mangalgraha Mandir) तसेच या मंदिरात श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची देखील मूर्ती आहे.

Important Documents | गाडी चालताना ‘हे’ डॉक्युमेंट्स ठेवा जवळ; अन्यथा बसेल 10 हजारांचा भुर्दंड

Important Documents

Important Documents | प्रवास करताना जर आपण स्वतःची गाडी चालवत असाल, तर गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. त्याचप्रमाणे सुरक्षित ड्रायविंग करावी लागते. तसेच काही महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवावी लागतात. जेणेकरून जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला, तरी तुम्हाला ही कागदपत्र दाखवता येईल. तुमच्याकडे जर ही कागदपत्र नसेल आणि पोलिसांनी मागितली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडे जर ही कागदपत्रे नसेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. आता ही कोण कोणती डॉक्युमेंट्स आहेत? (Important Documents ) ते आपण जाणून घेऊया.

ड्रायव्हिंग लायसन | Important Documents

मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय नियम 1989 यांच्यानुसार रस्त्यावरून जर वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लायसन असणे खूप गरजेचे आहे. या कागदपत्रातून तुमची ओळख, राष्ट्रीयत्व, वय आणि इतर सगळ्या गोष्टींची ओळख पटते. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल, तर देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला ड्रायव्हिंग करता येते. त्याचबरोबर तुमच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडली, तर ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुमचा वीमा क्लेम होणार नाही.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

जो व्यक्ती कार चालवत आहे. त्या व्यक्तीच्या नावावर कार आहे की नाही हे माहित असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा आरसी पुरावा गरजेचे आहे. त्यामुळे ही कार आरटीओमध्ये रजिस्टर आहे की नाही? याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. विमा क्लेम करणाऱ्याच्या वाहन आणि दाव्याची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी ही काही कागदपत्र खूप गरजेची आहेत. यामध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, मालकाचे नाव, कारचा प्रकार नोंदणी तारीख, अंतिम तारीख, चेसेस नंबर, इंजिन नंबर या सगळ्याची माहिती असते.

थर्ड पार्टी विमा

1988 च्या मोटार वाहन अधिनियमानुसार तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्याकडे विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. किंवा संपत्तीचे नुकसान झाले, तर त्याला आर्थिक संरक्षण दिले जाते.

पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट | Important Documents

गाडी चालवताना तुमच्याकडे पोझिशन सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे. हे सर्टिफिकेट तुमच्या वाहनातील कार्बनच्या उत्सर्जनाची लेवल किती आहे? याची माहिती देते. तुमची कार किती काळापर्यंत कार्बन उत्सर्जित करते. आणि नियम तसेच इतर मानकांचे पालन केले जाते. हे या सर्टिफिकेट मधून सिद्ध होते. तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

ओळखपत्र संबंधी कागदपत्रे

गाडी चालवताना तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड यांसारखे डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासाठी ओळखपत्र म्हणून ही कागदपत्र कामाला येतात.