‘मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचा आक्रोश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 20 दिवसापासून हे आंदोलन चालू असतानाच संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.

हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली. या दुखा:च्या प्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हट्ट सोडा आणि तात्काळ शेती कायदा मागे घ्या”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.

संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते आणि ते हरयाणा एसजीपीसीचे नेतेदेखील होते. “मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे,” असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment