Sunday, April 2, 2023

तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही; राजू श्रीवास्तवचा थेट काँग्रेसला इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत थेट कॉंग्रेसलाच इशारा दिला आहे. ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जाते. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही, असे श्रीवास्तवने म्हंटले आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्याने थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. श्रीवास्तवने व्हिडिओत म्हंटले आहे की, ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जाते. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही. कारण मोदीजींवर गुरु, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशिर्वाद आहे.

- Advertisement -

तसेच श्रीवास्तवने मोदींच्या घातलेल्या या घटनेवरून पंजाबला बदनाम केले जात असल्याने त्याचाही समाचार घेतला आहे. पंजाब बद्दल नकली शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?’ असा सवाल श्रीवास्तवने काँग्रेसला विचारला आहे.

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घडलेल्या प्रकारावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.