राज्यपालांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : (सकलेन मुलाणी) हॅलो महाराष्ट्र – सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार?
या गृहस्थांनी ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल जे उद्दगार काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोपदेखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी केला.

उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे पवारांकडून कौतुक
उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कौतुक केलं आहे. “उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या