“भाजपाच खरी ‘टुकडे टुकडे गँग”; शशी थरूर यांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. “भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे. त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केली आहे. भाजपा हे विभाजन करत आहे,” अशा शब्दात थरूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शशी थरूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये केवळ काँग्रेसवर टीका केली. त्यांचे हे भाषण राजकीय स्वरूपाचे होते. माझ्या मते आम्हाला आनंद झाला पाहिजे की ते आम्हाला या नजरेने पाहतात. हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केली असल्याचा आरोपही थरूर यांनी केला आहे.

काय केली होती मोदींनी टीका

काल आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकसभेत भाषण केले. यावेळी देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी टीका केली.

Leave a Comment