संजय राठोडांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण…; राऊतांचे मोठं विधान

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर खळबळ उडाली होती.संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. दरम्यान अखेर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक मत व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले, आम्ही लोकांचा, विरोधकांचा आवाज एकतो. मात्र, राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण अजून तपास सुरु आहे. संजय राठोड जूना कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षाचा जय झाला असे अजिबात समजू नये. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथेही असे प्रकार घडले. पूजा चव्हाणचा मृत्यू हे दुर्दैवी आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आधीच राठोडांचा राजीनामा घ्यायला हवा होता अस आता भाजप कडून सांगण्यात येत आहे. तसेच फक्त राजीनामा नको तर गुन्हा देखील दाखल करा अशी मागणी भाजप कडून करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here