भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून बारा आमदारांच्या निलंबनावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने बारा निलंबित आमदारांच्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला. बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले.

महाराष्ट्राच्या विधानसभेट भाजपच्या 12 आमदारांचे विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते. अधिवेशनादरम्यान भाजपच्या बारा आमदारांनी गोधळ घेतला होता. दरम्यान वर्षभरापासून बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आज याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यात बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय कोर्टाने दिला.

तालिका अध्यक्षांशी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची केली होती. या कारवाई विरोधात सर्व १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान कोर्टाने आज याबाबात निर्णय दिला.

कोण होते ते 12 आमदार-

सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.

Leave a Comment