अन्यथा, शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत द्यायची असेल तर द्या, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय. चेष्टा कराल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी हसुर येथील महेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तेथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रीय पथक व राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी येथे केंद्रीय पथक येत आहे. या अगोदर आलेल्या महापुरात उध्वस्थ झालेल पीक काढुन शेतकऱ्यांनी आता दुसरे पीक घेतले. त्याचेही नुकसान झाले आहे.

आता अगोदरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले नसल्याने त्यांना काय नुकसान झाल्याचे समजणार आहे. त्यांना त्यावेळचे नुकसान आता कसे दिसणार? असा सवाल शेट्टींनी यावेळी उपस्थित केला. तसेच केंद्रीय पथकाला यावेळी इशाराही दिला.

Leave a Comment