यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव वामन खोके (२८) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. काल घरच्या मंडळींना शेतात जाऊन येतो असे सांगून नागोराव घरातून निघाला होता. संध्याकाळ होऊन तो घरी न परतल्याने … Read more

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या

नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील कोमल लोखंडे ही फार्मसी विभागाच्या तीस-या वर्षात शिक्षण घेत होती. तीने काही वेळा पुर्वी महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महात्या केली.

धक्कादायक! दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या

आजच्या काळात माणसाला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटू लागला आहे. आयुष्यात जगण्यासाठीची धडपड करण अवघड वाटू लागल की आत्महत्या हा पर्याय बाकी राहतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या आत्महत्येची बातमी कळातच पत्नीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट

रुपाली ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. शहरातील बियाणी चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉल हा लोकांची वर्दळ असणारा मॉल आहे. रुपालीने या मॉलच्या पाचव्या माळ्यावरून रूढी घेतली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रुपालीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.पदवी परीक्षेत नापास झाल्याने, आलेल्या नैराश्यामुळं तीने ही आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडलाय. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष … Read more

दारूच्या व्यसनाला कंटाळून इसमाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरा लगत असलेल्या पोहचदार बगीच्या जवळील तलावात उडी घेऊन एका ५० वर्षीय इसमान आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तलावात प्रेत तरंगत असल्याचे नागरीकांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिलीप म्हैसकर असं या इसमाचा नाव आहे. या इसमाचा मृतदेह हा तलावावर तरंगत असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी … Read more