औरंगाबाद-मुंबई प्रवास होणार दुहेरी रेल्वे मार्गावरुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण फास्टट्रॅकवर आले असून अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी काल निविदा प्रक्रिया सुरू झाली. यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण रेंगाळले. मात्र, किमान औरंगाबादहुन मुंबईचा रेल्वे प्रवास दुहेरी मार्गावरून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद अंकाईच्या दुहेरी करण्यासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला मंजुरी दिली. अवघ्या काही दिवसातच सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यास सुरुवात झाली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने काल या सर्वेक्षणासाठी निविदा प्रसिद्ध केली 28 रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

Leave a Comment