देशातील कोरोमाग्रस्तांची संख्या ४४२१ वर, आत्तापर्यंत ११४ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या वाढून ४४२१ झाली आहे, तर आतापर्यंत ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३२६ लोकांवर उपचार केले गेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आले आहे. गेल्या २४ तासांत ५ मृत्यू आणि ३५४ नवीन रूग्ण झाले आहेत.सोमवारी सायंकाळपर्यंत, गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची सर्वाधिक संख्या ७०४ नोंदली गेली. यासह, कोविड -१९ मुळे प्रभावित लोकांची संख्या ४,२८१ होती. तर मृतांची संख्या १११ वर पोहोचली.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशातील २६६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिघांचा मृत्यू झाला आहे.अंदमानात १०, अरुणाचल प्रदेशात १आणि आसाममध्ये २६ कोरोना-प्रभावित लोक आहेत. बिहारमध्ये कोरोनामुळे त्रस्त लोकांची संख्या ३२ झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. चंदीगडमध्ये ते १८ वर पोहोचले आहे, तर छत्तीसगडमध्ये ही संख्या १० पर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत ही संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत ३२३ लोक या आजाराने ग्रस्त आहेत, १९ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.गोव्यात या आजाराने ७ लोक त्रस्त आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये ही संख्या १४४ वर पोहोचली आहे, जिथे २२ जणांना सोडण्यात आले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचलमध्ये ही संख्या ९०९ वर पोहोचली आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनामुळे पीडित लोकांची संख्या १०९ वर पोहोचली आहे, तर ४ लोकांना घरी सोडण्यात आले आहे. या आजाराने येथे २ लोकांचा मृत्यू झाला आहे.कर्नाटकमध्ये याची गती खूप वेगवान आहे, आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १५१ लोक या आजाराने पीडित आहेत.१२ लोकांना घरी सोडण्यात आले आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे.केरळमध्ये ही संख्या वाढून ३२७ झाली आहे तर ५८ लोकांना सोडण्यात आले आहेत आणि दोन मरण पावले आहेत. लडाखमध्ये हा आकडा १४ आहे, जिथे १० लोकांना घरी सोडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात ही आकडेवारी १६५ आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त लोक महाराष्ट्रात आहेत. येथे या विषाणूमुळे ७४८ लोक संसर्गित आहेत, तर ५६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. एकट्या महाराष्ट्रात ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये ३, मिझोरममध्ये १, ओडिशामध्ये २१ आणि पुडुचेरीमध्ये ५ असा या विषाणूचा परिणाम आहे.पंजाबमध्ये ७६ लोक या आजाराने ग्रासले आहेत, तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.आणि ४ जणांना घरी सोडण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये हा आकडा २८८ वर पोहोचला आहे तर २१ जणांना सोडण्यात आले.३ मरण पावले आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा ६२१ वर पोहोचला आहे,८ जण सोडण्यात आले तर ५ मृत्यू झाले आहे.

तेलंगणामध्ये ३२१ लोक या आजाराने ग्रस्त आहेत.३४ जणांना सोडण्यात आले तर ७ जण मरण पावले आहेत. त्रिपुरामध्ये केवळ १ जण कोरोना बाधित असल्याची नोंद आहे. ही संख्या उत्तराखंडमध्येही वाढली आहे. येथे ३१ लोक या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे, तर ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.उत्तर प्रदेशात ही संख्या ३०५ पर्यंत आहे. येथे २१ लोकांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे, तर ३ लोकांचा मृत्यू. पश्चिम बंगालमध्ये ही संख्या वाढून ९१ झाली आहे. येथे १३ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या विषाणूमुळे येथे ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर

Leave a Comment