वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो तीन दिवसांत ई-चालान भरा, अन्यथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे ई-चालान प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शहरातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडाचे मॅसेज पाठवले जातात. या ई चालान प्रणालीद्वारे कारवाईत अनपेड ई-चालान असलेल्या वाहन धारकांना एसएमएस द्वारे सदर चालानची तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु 17 हजारांपेक्षा वाहन धारकांनी अद्याप ही दंडापायी असलेली रक्कम भरलेली नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील 17 हजार 261 वाहनधारकांनी अद्याप अनपेड ई चलान तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही. अशा वाहन धारकांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वाहतूक, अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ई चालान भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसारचा अपडेटेड संदेश वाहनधारकांना पाठवण्यात आला आहे. 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान वाहन धारकांनी अनपेड ई चालान भरणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र वाहतूक महासंचलनालयामार्फत दिलेल्या मुदत वाढीत वाहनधारकांनी ई चालान भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास वाहनधारकांना प्राप्त झालेल्या संदेशांनुसार 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा व सत्र न्यालायलय, औरंगाबाद येथे लोक अदालतमध्ये हजर रहावे लागणार आहे.

Leave a Comment