औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे.

अपघातात मृत्यु पावलेल्या आणि जखमी असलेल्या मजुरांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी एका मजूराशी माध्यमांनी संवाद साधला.तेव्हा हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

दरम्यान जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1385425101641246/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment