“ज्यांच्यावर धाडी टाकल्या ते सध्या जेलमध्ये” ; ईडीच्या छापेमारीवरून चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईडीच्या वतीनेही मुंबईत तब्बल दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्यावर धाडी टाकल्या त्यांना जेलमध्ये जावे लागे. तुम्हाला न्याय जर हवा असेल तर न्यायालयात जावे, असे विधान पाटील यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य घटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. केंद्र सरकारने काय करावे, राज्य सरकारने काय केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्यघटनेत सांगितले आहे. तुम्हाला राज्यघटना मान्य नसेल तर तुम्ही न्यायालयात जावे. परंतु आतापर्यंत ईडीने ज्या ज्या लोकांच्यवर धाडी टाकल्या आहेत. त्या लोकांना जेलमध्ये जावे लागलेले आहे. काय जेलमध्ये आहेत तर काही जेलच्या बाहेर आहेत.

काय म्हणाले आहेत संजय राऊत

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावे लागणारअसे म्हंटले आहे. आम्ही खूप सहन केल्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात संजय राऊत यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नावे जाहीर करणार आहेत.

Leave a Comment