महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा ; चंद्रकांतदादांची राज्यपालांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप असा संघर्ष  पहायला मिळत आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळच बरखास्त करावे, अशी थेट मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्यासमवेत राज्यपाल भगतसिह कोश्यारी याची भेट घेतली. राज्यपालांची चर्चा करीत त्यांना निवेदनही दिले. त्यामध्ये अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, असे निवेदनात म्हंटले आहे.

ज्यावेळी सरकार स्थापन केले जाते. त्यावेळी सरकारमधील मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते. मात्र, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे.

या प्रकरणी राज्याच्या अर्थखात्याने अनेक आक्षेप घेतले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment