आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “आरक्षण द्यायचे नसेल तर स्पष्टपणे सांगा. मात्र, जबाबदारी झटकू नका,” अशा शब्दात फडणवीसांनी निशाणा साधला.

मुंबईतील नायगाव पोलीस वसाहतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर त्यांची आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तसेच त्यांनी यावेळी विविध विषयांवर तेथिल रहिवाशांशी चर्चा केली. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. मात्र, राज्य सरकार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी झटकत आहे. वास्तविक या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. मात्र, आपली जबाबदारी झटकून टाकू नये, असे फडणवीस म्हणाले.

नायगाव येथील रहिवाशांशी झालेल्या चर्चेदरम्यान फडणवीस म्हणाले की, येथील रहिवाशांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेतू निर्माण करायचा म्हणून या ठिकाणी आलो आहे. येथील रहिवाशांच्या प्र्श्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी तसेच गृहमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.

Leave a Comment