देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस, ते सहन करतात म्हणून काहीही म्हणायचं काय- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस असून ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या आरोपावर येवेळी उपस्थित केला.

दरम्यान, माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता. खडसे यांचा हा आरोप फेटाळताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. ४ आणि ५ मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली तेव्हा पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नको का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता, नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो” असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment