एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं पक्षातील ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाचे मंत्रिपद जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मागील ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाचं स्थान दिलं जाईल.एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे. एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवण्यात येईल, पण त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना हे पद देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरं खातं द्याव लागणार आहे.

जितेंद्र आव्हाड कि, दिलीप वळसे पाटील
राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप लागले. त्यामुळे ते वादात सापडले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल असं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला राजीनामा द्यावा लागू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment