विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत त्यांना अध्यक्ष निवडीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रियाच घटनाबाह्य आहे, असे पत्राद्वारे राज्यपालांनी म्हंटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. मला राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया तपासायची आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

दरम्यान, दरम्यान महाविकास आघाडी सरकारकडून उद्या घेतल्या जाणाऱ्या नवीन अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, आता पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवून निवडीबाबत राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार असून निवड हि घटनाबाह्य आहे की नाही हे पाहून उद्या निवडणूक करणारच असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Leave a Comment