राहुल गांधींचं मोदींनी ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली” महाराष्ट्र काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दररोज हजारोंच्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. देशात सध्या करोनाची दुसरी लाट आलेली आहे. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून कोरना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर्ससह मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचं मोदींनी ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली, असं ट्विटद्वारे महाराष्ट्र काँग्रेसने म्हंटल आहे.

 

“करोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी” हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते!” असं महाराष्ट्र काँग्रसेने ट्विटद्वारे म्हटलं आहे. याचबरोबर उशिरा का होईना मोदी सरकारला अक्कल आली! असा टोला देखील लगावला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये एकीकडे राहुल गांधी यांनी ८ एप्रिल रोजीच, मापदंडानुसार परदेशी लसींना त्वरित मान्यता दिली जावी, असं केंद्र सरकारला सांगितलं होतं असं दर्शवलं आहे. तर दुसरीकडे १३ एप्रिल रोजी मोदी सरकारने परदेशी लसींना मान्यता दिल्याचं दाखवलं आहे.

या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर या मुद्यावरून जोरदार टीका केली होती. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असं राहुल गांधी म्हणाले होते.

Leave a Comment