शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! PM किसानचे नियम बदलले, आता त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर खात्यात पैसे येणार नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरातील करोडो शेतकर्‍यांच्या महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. तुम्हालाही पीएम किसान योजनेत नोंदणी करायची असेल, तर आता तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, म्हणजेच रेशनकार्डशिवाय तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकणार नाही. पीएम किसान योजनेतील झपाट्याने वाढणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

आता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत
तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केल्यास, अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

‘या’ तारखेला हप्ता येईल
सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत आगाऊ नोंदणी करावी जेणेकरून त्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर केले होते.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देते
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करते. तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment