खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांनी पत्नी रश्मी ठाकरेंशी गद्दारी केली?; कोर्लईत भेटीनंतर किरीट सोमय्या यांची टीका

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून 18 बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्यामुळे हे १९ बंगले पडले कि पाडले, याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोर्लईत गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. तसेच सरपंच व ग्रामसेवकांबरोबर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले कि, रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेले बंगले कसे काय गायब झाले. ते गायब झाले कि पाडले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही याची चौकशी व्हावी म्हणून आज या ठिकाणी पोलीस ठाण्यात आलो.

या ठिकाणी पोलिसांशी फेटून त्यांनी गायब झालेल्या बंगल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. एक मात्र खरे आहे की, सरपंच अगोदर सांगतात कि बगळे होते आणि नंतर सांगतात कि बंगले गायब झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नवे असणारे बंगले गायब झाले आहेत कि पडले, याची चौकशी होणे गरजेची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच खुर्चीसाठी रश्मी ठाकरे याच्याशी गद्दारी केली आहे काय? याची चौकशी करावी, रश्मी ठाकरे याना न्या मिळवून द्यायचा आहे, अशी मागणी आम्ही आज केली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here