“मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

thackeray somaiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून 18 बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले,” असे सोमय्या यांनी म्हंटले.

आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊन तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. त्यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे. ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतो.

ज्या सरपंचाने मे 2019 महिन्याच्या सभेत, रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 ला अर्ज केला, जमीन माझ्या नावावर झाली, घरं माझ्या नावावर करा असं पत्र लिहिलं. मे 2019 मध्ये याच सरपंचानी तो प्रस्ताव मंजूर केला. ती घरे जून महिन्यात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ती जमीन करण्यात आली. महाराष्ट्राच्या जनतेला घरं आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

कोल्हापूर, अमरावती आणि पुण्यात दगड मारण्यात आला. पुण्यात तिथं हजारो नागरिकांनी सत्कार केला होता. आम्हाला अडवलं तरी कुणीही दंगल करणार नाही, प्रशासनानं अडवलं तरी पुन्हा त्यावेळी जाईन. मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, अशी तोफ सोमय्यांनी डागली.