डिव्हायडरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात, प्रवाशांसह कार थेट पुलावरुन खाली

0
112
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ध्यात पुलावरुन कार खाली कोसळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असताना वाशिम जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. कार चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे गाडी पुलावरुन थेट खाली कोसळली.

काय आहे प्रकरण?
वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून या भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

कशाप्रकारे घडला अपघात ?
या अपघातामध्ये कार चालकाला डिव्हायडरचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात घडला आहे. वाशीम जिल्हातील दोनद नजीक हा अपघात झाला आहे.

जखमींवर उपचार सुरु
या भीषण अपघातात पुलगांव येथील नानाभाऊ पाटेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी अमरावतीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here