Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2063

Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!

Invetment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आज पासून देशभरात गणेसोत्सव साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी गणेशाची आराधना करणे शुभ मानले जाते. हे लक्षात घ्या की, चांगला गुंतवणूकदार कसे बनावे हे आपल्याला गणपतीकडून शिकता येईल. आज आपण श्रीगणेशच्‍या जीवनाशी संबंधित अशा 7 पैलूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचा योग्य पद्धतीने अवलंब केल्‍यास गुंतवणुकदारांना मजबूत रिटर्न मिळवता येऊ शकेल.

Happy Ganesh Chaturthi 2021 Wishes: Ganpati Images, Wishes, SMS, Wallpapers, Messages, Facebook, WhatsApp Status

1- आर्थिक प्रवासाची सुरुवात

कोणत्याही कामात यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याची सुरुवात करणे होय. जर आपण मोठा फंड तयार करू इच्छित असाल तर त्याची सुरुवातही गुंतवणुकीच्या पहिल्या पायरीने होते. जर आपण अद्याप गुंतवणूक किंवा बचत करणे सुरू केले नसेल तर या दिशेने पाऊल टाकण्यासाठी गणेशोत्सवाची वेळ उत्तम आहे. Investment Tips

2 – हुशारीने गुंतवणूक करा

हे लक्षात घ्या कि, गणपतीचे डोके हे हत्तीचे आहे, जे बुद्धीचे प्रतीक मानले जाते. एक गुंतवणूकदार म्हणून आपण हुशारीने निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही पर्यायामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्यातील सर्व पैलूंचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. अन्यथा योग्य माहितीशिवाय गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकेल. Investment Tips

Ganesh Chaturthi 2021: Decoding Ganpati Bappa with numerology

3- कोणत्याही निष्कर्षा पर्यंत पोहोचण्या आधी सर्वांचे म्हणणे ऐकून घ्या

गणपतीचे कान खूप मोठे असतात म्हणून त्याला सूपकर्ण असेही म्हंटले जाते. याचा अर्थ श्रीगणेश सर्वांचे म्हणणे ऐकतो. त्याचप्रमाणे, एक गुंतवणूकदार म्हणून आपण तज्ञ आणि बाजारातील विश्लेषकांचे देखील म्हणणे काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. याद्वारे गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती गोळा करून आपल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे केव्हाही चांगले ठरेल. Investment Tips

4- ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा

असे म्हणतात कि, महर्षी वेद व्यास यांनी गणपतीसोबत महाभारताची रचना केली. क्षणभरही विश्रांती न घेता त्यांनी संपूर्ण महाकाव्य पूर्ण केले. यासाठी जवळपास तीन वर्षे लागली. यावरून गणपती आपल्या ध्येयाकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येऊ शकते. अगदी अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. याद्वारे आपल्या ध्येयानुसार योग्य धोरण आखून पैसे गुंतवले तर मोठा फंड तयार व्हायला फारसा वेळ लागणार नाही. Investment Tips

Ganpati Visarjan 2021: Why Ganpati Visarjan happens on Anant Chaturdashi, know the story behind it. Ganpati Visarjan 2021 know why ganesh Visarjan is on anant chaturdashi | PiPa News

5- संयम बाळगा

लंबोदर या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणेशाचे मोठे पोट आहे. तो आपल्याला नेहमी निवांत मुद्रेत असल्याचे दिसते. यातून आपण हे शिकू शिकतो की, आपल्याकडेही गुंतवणुकीचे मोठे लक्ष्य असले पाहिजे आणि नेहमी संयम बाळगला पाहिजे. बाजारात कितीही चढ-उतार आले तरी आपल्या लक्ष्यावर संयमाने लक्ष ठेवावे. Investment Tips

6- मोदकाप्रमाणे नफा पहा

आपल्याला गणपतीजवळ मोदकांनी भरलेले ताट नेहमी दिसते. याप्रमाणे आपणही आपल्या नफ्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. गुंतवणूक म्युच्युअल फंडात केली असेल किंवा शेअर बाजारात केली असेल. आपल्या रिटर्नवर नेहमीच लक्ष ठेवा. तरच आपण येणार्‍या नुकसानीचा अंदाज घेऊन त्यापासून संरक्षण करू शकू. Investment Tips

Ganesh Chaturthi 2020: Wish your loved ones this Happy Ganesh Chaturthi images photos message and whatsapp status - Ganesh Chaturthi 2020: इस गणेश चतुर्थी पर ऐसे दें अपनों को शुभकामनाएं

7-लवचिकतेने दूर होतील अडथळे

गणपतीची लांब सोंड आपल्याला लवचिकता शिकवते. एक गुंतवणूकदार म्हणून जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील लवचिकता आणली तर आपल्या देखील मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हंटले जाते कारण तो आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो. Investment Tips

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.nseindia.com/market-data/live-market-indices

हे पण वाचा :

आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

ट्वीन टॉवरप्रमाणेच चांदणी चौकातील पूल काही क्षणात जमीनदोस्त होणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यापद्धतीने स्फोटकांचा वापर करून उत्तरप्रदेशमधील नोयडा येथील अनधिकृत ट्वीन टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आला त्याच पद्धतीने पुण्यातील चांदणी चौकातील पूल अवघ्या काही सेकंदात पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनाही कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव मिळू शकतो.

वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्वीन टॉवर पाडलेली संस्था चांदणी चौकातील पूल पाडणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तसेच या पुलाची आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात दाखल होणार असल्याचंही समजतं आहे. कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात येईल त्यामुळे ट्विन टॉवर प्रमाणे हा पूल देखील 10 सेकंदात जमिनदोस्त होणार आहे.

चांदणी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल पाडून दुसरा पूल बांधला जाणार आहे. सुमारे 30 मीटर लांबीचा हा पूल पाडण्यापूर्वी वाहतूकीचं नियोजन करण्यात येईल. तसेच काही वेळेसाठी पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली होती आणि पूल पडण्याचा निर्णय घेतला होता.

आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…

GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST” ट्रेनने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. ट्रेनच्या तिकिटाचे कमी असलेले भाडे हे देखील यामागील एक कारण आहेत. ट्रेनने प्रवास करण्याची पहिली स्टेप म्हणजे कन्फर्म तिकीट खरेदी करणे. सहसा प्रवासी वेळेत तयारी सुरू करतात मात्र अनेक वेळा प्रवासातील बदलामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना तिकीट रद्द करावे लागते, ज्यावर रेल्वेकडून कॅन्सलेशन चार्ज आकारला जातो. आता या शुल्कावरही GSTलागू होणार केला जाणार आहे ??? असा प्रश्न सध्या प्रवासी उपस्थित करत आहे.

No GST on notice pay recovery - The Hindu BusinessLine

रेल्वे प्रवाशांच्या या प्रश्नावर रेल्वेने स्पष्टीकरण देताना म्हटले की, 23 सप्टेंबर 2017 रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, तिकीट रद्द झाल्यास, रेल्वे नियमांनुसार तिकीट बुक करताना आकारलेला GST देखील तिकिटाच्या किंमतीसह परत केला जातो. मात्र, प्रत्येक तिकीट रद्द करण्यावर, रेल्वे विभागाकडून काही प्रमाणात कॅन्सलेशन चार्ज आकारला जाईल. जो रेल्वेच्या रिफंडच्या नियमांनुसार लागू होईल. आता रेल्वे कडून या कॅन्सलेशन चार्जवरही जीएसटी आकारला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा जीएसटी घेतला जाईल, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हे शुल्क फक्त एसी आणि फर्स्ट क्लासच्या तिकिटांवरच लागू असेल.

Railways now offers Rs 10 lakh insurance cover for train travel - India News

कोणत्या तिकिटावर किती कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल ???

रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या 48 तासांच्या आत कन्फर्म तिकीट रद्द झाले तर एसी फर्स्ट क्लाससाठी 240 रुपये, एसी टियर 2 साठी 200 रुपये, एसी टियर 3 आणि चेअर कारसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकंड क्लाससाठीच्या तिकिटांवर 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारले जाईल. हे दर प्रति प्रवासी आकारले जातील.

हे लक्षात घ्या कि, ट्रेन सुटल्यानंतरच्या 12 तासांच्या आत तिकीट रद्द केले तर 25% तिकीट भाडे आकारले जाते,तर जर तेच कन्फर्म तिकीट ट्रेन सुटल्याच्या 4 तासांच्या आत रद्द केले तर भाड्याच्या 50% कॅन्सलेशन चार्ज म्हणून आकारले जातील. GST

GST on Railways Ticket: Tax will have to be paid on cancellation of confirmed train ticket, know how much GST will be charged by Railways - Business League

रिझर्वेशन चार्ट बनल्यानंतरचा नियम काय आहे ???

हे लक्षात घ्या कि, एकदा रिझर्वेशन चार्ट तयार केल्यानंतर ई-तिकीट रद्द करता येणार नाही. अशा वेळी युझरला TDR ऑनलाइन भरण्यास सांगितले जाते. तसेच युझर्सना हवे असेल तर IRCTC द्वारे त्याचे स्टेट्स देखील ट्रॅक करता येईल. तसेच जर ट्रेन सुटण्याच्या चार तासांपूर्वी तिकीट रद्द केले नाही किंवा TDR दाखल केला नाही तर प्रवाशांना कोणताही रिफंड दिला जाणार नाही. GST

याशिवाय, जर तिकीट RAC असेल तर ते ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द करता येते. मात्र यानंतर केल्यास कोणताही रिफंड दिला जाणार नाही. जर एखाद्या संपूर्ण कुटुंबाचे किंवा ग्रुपमध्ये तिकीट बुक केले असेल आणि काही प्रवाशांकडे RAC तिकीट असेल तर ते ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द केले जाऊ शकते. या प्रकरणी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाला पूर्ण रिफंड दिला जाईल. GST

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी ! भारत पेट्रोलियममध्ये भरती सुरु

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

पुणे- बेंगलोर महामार्गावर हुंडाईच्या धडकेने व्हॅगनार गाडी पलटी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बेंगलोर महामार्गावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर पाठीमागून धडक दिल्याने व्हॅगनार गाडी पलटी झाली. कराड जवळ असलेल्या गोटे गावच्या हद्दीत आज दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दिनांक 31/8/2022 दुपारी 12 वाजता गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत हाॅटेल महेंद्रा समोर सातारा ते कराड लेन वरती हा अपघात झाला. व्हॅगनार कार चालली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या होंडाई VENUE गाडीने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की व्हॅगनार गाडी चालकाचा ताबा सुटला अन् गाडी डिवायडरला धडकुन रस्त्यावर पलटी झाली. त्यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले व होंडाई गाडीतील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने कराड येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन व कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचार पाठवून दिले आणि महामार्गावरील वहाने बाजूला काढून रस्ता सुरळीत केला. अपघातामुळे काही वेळ महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. यावेळी काही वहाने सर्विस रोड वरून सोडण्यात आले. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, विक्रम सावंत, विशाल होवाळ व कराड शहर पोलिस स्टेशनचे खालीद इनामदार, प्रशांत जाधव यांनी जखमींना मदत केली.

इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी ! भारत पेट्रोलियममध्ये भरती सुरु

BPCL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती सुरु आहे. या अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस पदासाठी 102 जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. 13 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल
करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था– भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड
पदसंख्या– 102
भरली जाणारी पदे – पदवीधर अप्रेंटिस
वयोमर्यादा– 18 -27 वर्ष
वेतन– 25,000 रुपये

शैक्षणिक पात्रता-

इंजिनीअर पदवी ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, मेटॅलर्जी, IT, कम्प्युटर सायन्स, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, केमिकल आणि सेफ्टी )

असा करा अर्ज-

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.bharatpetroleum.com ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. (BPCL Apprenticeship 2022)

आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच मोठा नफा मिळवण्याची अपेक्षा असते. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. फार्मा कंपनी असलेल्या Divi’s Lab चे शेअर्स देखील मल्टीबॅगर स्टॉकच्या श्रेणीत मोडतात.19 वर्षांपूर्वी 9 रुपये किंमत असलेल्या हा शेअर 3613 रुपयांच्या पातळीवर आला आहे. यावेळी ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती ठेवली असेल तर आज ते करोडपती झाले असतील. Multibagger Stock

Divis Labs sheds 14% in two days, hits 52-week low post Q4 results | Business Standard News

मंगळवारी (30 ऑगस्ट रोजी) या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. तो NSE वर 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 3,613 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रात हे शेअर्स 3.41 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, गेल्या एक वर्षापासून हे शेअर्स 30 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र दीर्घ कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या शेअर्समध्ये 408 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

Divis Laboratories Announces Rs 80 Crore Bonanza For Employees

कंपनीविषयी जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, लार्ज कॅप फार्मा कंपनी Divi’s Lab ची मार्केट कॅप 96,000.24 कोटी रुपये आहे. कंपनी Active Pharma Ingredients (APIs) बनवते. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत, Divi’s Lab चा निव्वळ नफा 702 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत ते 557 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा (करासह) 4.5% ने वाढून 851 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 814 कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत Divi’s Lab च्या एकूण उत्पन्नात 17% वाढ झाली आहे. Multibagger Stock

Making more money is also a goal | Scripbox

1 लाख रुपयांनी 19 वर्षात 4 कोटी कमावले

13 मार्च 2003 रोजी Divi’s Lab चे शेअर्स 9 रुपयांवर होते. तर आज 30 ऑगस्ट 2022 रोजी या शेअर्सची किंमत 3613 रुपये आहे. जर एखाद्याने 19 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याला 4.014 कोटी रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, 5 वर्षांपूर्वी जर एखाद्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 5.07 लाख रुपये मिळाले असते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.divislabs.com/

हे पण वाचा :

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा

कमी मार्क्स दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षकांनी कमी गुण दिले म्हणून थेट त्या शिक्षकालाच आंब्याच्या झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या शनिवारी निकाल लागला. ज्यामध्ये 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी श्रेणी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेचे मुख्याध्यापक रामदेव प्रसाद केशरी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. पण, ‘कुमार सुमन पूर्वी प्राचार्य होते, त्यांनी गुण दिले आहेत, याबाबत आम्हाला माहीत नाही’, असे सांगून मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कुमार सुमन यांची भेट घेऊन प्रात्यक्षिक विषयाचे मार्क्स दाखविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली, परंतु कुमार सुमन यांनी दाखवण्यास साफ नकार दिला, त्यानंतर कुमार सुमन यांच्याशी हुज्जत घातली आणि शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. त्यांच्यावर सामुदायिक आरोग्य केंद्र गोपीकंदर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

शिक्षक कुमार सुमन यांनी त्यांना जाणूनबुजून प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण दिले आहेत, त्यामुळे 11 विद्यार्थी नापास झाले आहेत. असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोपीकंदर ब्लॉकचे बीडीओ अनंत कुमार झा, ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र हेमब्रम आणि स्टेशन प्रभारी नित्यानंद भोक्ता पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाण केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन लक्ष ठेवून असून, या प्रकरणाच्या खोलात जाऊन लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.

काजू खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का??

Cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’.. काजू एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर अशी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

काजू खाण्याचे फायदे-

काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. काजमूध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट असते. हे बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हृदय स्वस्थ राखण्यास काजूच्या सेवनामुळे मदत मिळते. त्यामुळे ह्रदयविकाराच्या आजारापासून तुम्ही दूर राहता. पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे गरजेचे असते.

नियमिपणे काजूचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. काजूच्या खाल्ल्याने पोट भरते आणि दुसरं काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात.

काजूमध्ये असलेले व्हिटॅमिन E हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूगर करतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची हानीला संरक्षण मिळते त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजू गराचे सेवन करावे.

भिजवलेले काजू मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूचे कार्य वाढवण्यास आणि तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात. काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. काजूमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ??

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ? असा चर्चाना उधाण आले. मात्र त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. मी उमेदवार असणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच जर फॉर्म भरला तर सर्वाना ते कळेलच ना असेही त्यांनी म्हंटल. पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच गुलाम नबी आझाद यांची दिल्लीत भेट घेतली होती. मात्र ही शिष्टाचाराची भेट होती, त्यात दुसरं काहीही नाही असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसुचना निघणार आहे. त्यानंतर 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे.

लालबागच्या राजाच्या मंडपात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनानंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यातच मुंबईचा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर संपूर्ण राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे लालबाग म्हंटल की गर्दी आलीच. पण याच दरम्यान, दर्शन घेणारी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेन काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्याच दरम्यान, मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी सदर महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आज संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव पार पडत आहे. कोरोना मुळे २ वर्ष गणेशोत्सवासाठी काही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता तब्बल २ वर्षांनी सर्वत्र गणेश भक्तांनी अत्यंत उत्साहाने गणपतीचे स्वागत केलं आहे. प्रसिद्ध असलेल्या लालबाग राजाच्या दर्शानासाठीही दोन वर्षांनंतर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.